-
Manaswini (मनस्विनी)
वास्तविक पाहता शून्याचं अस्तित्वही नगण्यच ! माझ्या सावली सारखंच ! जेव्हा ते कोणाबरोबर तरी असतं तेव्हा त्याची किंमत वधारते. जशी सावली माझ्या बरोबर असते तेव्हा ती ओळखली जाते. कोणत्याही आकड्याच्या पुढे आलेलं शून्य त्या आकड्याची किंमत वधारतं. शून्याला देखील किंमत असते हेही मला समजलं ते आजच्याच दिवशी.... माणसानं ही शून्यासारखं जगावं. आपण कुठं कोणा सोबत उभ्या आहोत याचं भान ठेवावं. त्यावर आपली किंमत ठरते. Tell me your friends I will tell you what you are.... हे ते आणखीन एक तत्त्वज्ञान ! शून्यामुळं असण्याला अर्थ आहे. शून्यातून जग निर्माण करता येतं या त्रिकालाबाधित सत्यावरून शून्याची किंमत माझ्या ठायी वधारली. माझी सावळी सावली मोठ्या गुणाची! मला हळुवार मोठं तत्वज्ञान सांगून गेली.
-
Rahile Dur Desh-Ghar Mage (राहिले दूर देश-घर मागे)
सध्या काळ सहजगत्या परदेशगमनाचा आणि जमल्यास तेथेच वास्तव्य करण्याचा आहे. खूप आर्थिक लाभ, उच्च दर्जाचे राहणीमान, उत्तम सुखसोयी आणि व्यावसायिक बढती या कारणांनी चालू पिढी परदेशात जावून तेथे वास्तव्य करायला उत्सुक असते. याचा परिणाम असा हातो की परदेशात गेलेली पिढी भारतात मागे राहिलेल्या देशा विषयी आणि त्यांच्या घरातील माणसांबद्दल थोडी काळजी आणि बराच दुरावा बाळगून परदेशात राहत असते. इकडे मागे भारतात त्यांचे आईवडील एकटेपणाचे दुःख भोगत असतात आणि देश त्याचे प्रश्न सोडवत असतो. परदेशी गेलेले लोक त्यांचे ज्ञान आणि कौशल्य वापरून परदेशात खूप पैसा मिळवू शकतात, पण त्यांचे ज्ञान आणि कौशल्य स्वदेशाला उपयोगी पडत नाही. यातून Brain Drain चा प्रश्न निर्माण होतो. परदेशी स्थलांतर करणारे आणि त्यांच्या मागे राहिलेला त्यांचा देश व त्यांचे घर अशा या प्रश्नाला दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू या पुस्तकात मनोरंजक कादंबरी रूपात विचारात घेतल्या आहेत.
-
Chatroom (चॅटरूम)
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आंतर विद्या शाखेत अर्थशास्त्र या विषयाचे वाढते महत्व तसेच बदलते प्रवाह याचा ओघ लक्षात घेता संपूर्ण अर्थव्यवस्थेतील राबविण्यात येणाऱ्या विविध धोरणाचा अभ्यास अर्थशास्त्र करते. त्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकार यांच्या मार्फत राबविण्यात येणारे राजकोषीय धोरण, करप्रणाली, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, उत्पन्न, तसेच अंदाजपत्रक इ. घटकांचा अभ्यास या पुस्तकात करण्यात आलेला आहे. विविध विद्या शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि पीएचडी चे संशोधन व लेखन करणाऱ्या अभ्यासकाना हे पुस्तक उपयुक्त ठरेल हि अपेक्षा.
-
Wireless (वायरलेस)
'वायरलेस' हा माझा आणखी एक कथासंग्रह प्रसिद्ध होत आहे. वास्तविक प्रकाशकांना माझे एकूण तीन कथासंग्रह प्रसिद्ध करायचे होते. परंतु माझ्याकडून थोडा आळस झाला, खेरीज इतर महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली नाही. हा कथासंग्रहात 'पापी वासनेची बळी' या शीर्षकाची एक कथा देण्यात आली आहे. वर्तमानपत्रात खोट्या जाहिराती देऊन आणि नोकरीचे आमिष दाखवून किंवा अत्यंत सभ्यतेची वागणूक दर्शवून एखाद्या तरुण मुलीला पाशवी जाळ्यात कसे अडकवले जातं, याचे चित्रण या कथेमध्ये केलेले आहे. ही कथा जरी तपासकथा असली, आणि ती तशी आहेच, तरीही या शहरात तरुण मुलीच्या संदर्भात हे धोके काही कमी नाहीत. नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा एखाद्या ठिकाणी नोकरी करीत असलेल्या तरुणींना सावध करण्याचा उद्देश या कथेमागे आहे.
-
Center Page (सेंटर पेज)
सेंटर पेज' हे मध्यम मार्गाच्या जवळचे 'उम्र पेज' राहिले आहे. त्यात काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट, समाजवादी, राष्ट्रवादी आणि तशा एकूणच सगळ्या पक्षांवर व त्यांच्या नेत्यांवर अनुकूल आणि प्रतिकूल असे सारेच लिखाण आले.या पक्षांनी घेतलेल्या मध्यवर्ती भूमिका त्यात अधोरेखित झाल्या, त्यांचे खरेखोटे असणे आणि त्याचवेळी त्यांचे टोकावर असणेही स्पष्टपणे सांगितले गेले. त्याचमुळे हा स्तंभ कोणाला गृहीत धरता आला नाही. त्याच्यावरच्या रागलोभाचे एक कारण हेही आहे.
-
Udhvasta Aashiyana (उद्ध्वस्त आशियाना)
या कादंबरीचा मराठीतून अनुवाद करणारे कमलाकर धारप हे मराठीतील कथालेखक व पत्रकारही आहेत. त्यांचे दोन कथासंग्रह, दोन कादंबर्या, तीन बालसाहित्याची पुस्तके, आणि पाच अनुवादित पुस्तके एवढे प्रकाशित साहित्य आहे. सय्यद सलीम हे हैद्राबाद येथे वास्तव्यास असलेले तेलगु लेखक आहेत. त्यांच्या २५ कादंबर्या, २५० लघुअकथा आणि १०० हून अधिक कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
-
Explaining Life Through Evolution (एक्सप्लेनिंग लाईफ थ्रू इव्हॉल्युशन)
उत्क्रांतीची तत्त्वे आणि प्रक्रिया या विषयावरील हे अतिशय वाचनीय पुस्तक आहे. या पुस्तकात उत्क्रांतीविषयीचे मार्गदर्शन अगदी सोपेपणाने आणि हसत खेळत केले आहे म्हणजे ते काय आहे आणि काय नाही, ही प्रक्रिया कशी काम करते, खास करून सध्याच्या काळात तिचे महत्त्व काय आहे हे लेखक विषद करतात. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि ज्या कुणाला या पृथ्वीवरील जीवसृष्टी कशी निर्माण झाली, याबद्दल आश्चर्य वाटते त्या सर्वांनी वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे. उत्क्रांती या विषयाचे खरे मर्म समजून घेताना ऐतिहासिक काळात तसेच सध्याच्या काळातही येणार्या समस्यांवर या ठिकाणी लेखकाने उत्तम विश्लेषणामुळे प्रकाश टाकला आहे. त्याचप्रमाणे जे लोक या क्षेत्रातील ताज्या घडामोडींवर काम करतात, त्यांच्याबद्दलही आपल्याला जागृत केले आहे. जागतिक रोगराईची संकटे आणि सामाजिक बदल यांच्यातून मार्ग काढण्यासाठी हे पुस्तक आपल्यासाठी आवश्यक आहे, तसंच ‘वंश’ ही संकल्पना जनुकीय की सामाजिक आणि कोविड 19 ही जागतिक साथ हे सध्याच्या काळातील अतिशय महत्त्वाचे विषय लेखकाने घेतले आहेत.
-
Mi HIndu Stri Ka Nahi : Majha Ladha, Majhi Kahani (मी हिंदू स्त्री का नाही : माझा लढा, माझी कहाणी)
वंदना सोनाळकर या स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाद्वारे त्यांनी राजकीय हिंदुत्व आणि व्यापक हिंदू धर्म या दोहोंची चिकित्सा करताना एक स्त्री, त्यातही महाराष्ट्रातील उच्चजातीय स्त्री म्हणून जन्माला येऊनसुद्धा स्वतःची धार्मिक ओळख आपण का नाकारली, याची तर्कसंगत अशी मांडणीही केली आहे. वैयक्तिक अनुभव तसेच लिखित आणि अनुभवजन्य पुराव्याआधारे त्यांनी या पुस्तकात जातकेंद्री परंपरा आणि व्यवहारांचे समीप दर्शन घडवले आहे. तसे ते घडवताना पुसरुषसत्ताक व्यवस्था आणि ब्राह्मणवाद हे हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यांच्या मते, ही व्यवस्था आणि त्याआधारे प्रभाव राखत आलेला ब्राह्मणवादी धर्म मुळातूनच जातभेदी आणि स्त्रीद्वेष्टा राहिला आहे. ब्राह्मणवादी धर्माने लादलेले नियम आणि आज्ञा या दोन्ही गोष्टी प्रथा-परंपरांचे पालन करण्याकामी तसेच राजकीय हिंदुत्वाच्या विस्तारासाठी आवश्यक ठरत आले आहेत. याच रुढीकेंद्री रिवाजांचे पुढे जाऊन मुस्लिमांवरही आक्रमण होत आले आहे. वंदना सोनाळकर या पुस्तकाद्वारे हेदेखील जोरकसपणे सांगितले आहे की, भेदभाव आणि विषमता ही दोन वैगुण्ये हिंदू धर्मात अशा रीतीने आत्मसात झालेली आहेत, ज्यायोगे दैनंदिन परस्परव्यव्हारात या वैगुण्यांचे नकळत पालनही होत आले आहे आणि त्यास मान्यता मिळून ही वैगुण्ये समाजात खोलवर मुरलेलीसुद्धा आहेत.
-
Dardpur (दर्दपूर)
सन १९४७ मध्ये भयानक दंगली, जाळपोळ, अमानवीयता आणि क्रूरतेचे दर्शनहोऊन अखंड देशाचे दोन तुकडे झाले. त्यानंतर भारतातील शांतता नष्ट झाली. काश्मीर प्रश्न सतत धुमसत राहिला. सन १९८९ मध्ये याची जऊण पुनरावृत्ती झाली. श्रीनगरमधील पंडितांना हाकलले गेले. आपले घरदार, जमीनजुमला, सफरचंदाच्या बागा, गाई,गुरे सगळे काही सोडून रात्रीच्या वेळी गुचूप जम्मूला निर्वासित कॅम्पमध्ये यावे लागले. ’दर्दपूर’ कादंबरीत या सगळ्याचा वृत्तान्त लिहिला आहे.
-
Savat Adnyatache ( सावट अज्ञाताचे)
प्रत्येक कथा वाचताना तुम्हाला जाणवेल की कथेतील पात्रांवर कुठल्या तरी एका अज्ञात शक्तीचे सावट पडले आहे आणि त्यातूनच ती कथा पुढे सरकायला मदतच झाली आहे. जरी ह्या कथा गूढ, अमानवी विषय धरून लिहिल्या असल्या तरी त्यात अंधश्रद्धेला मुळीच वाव नाही. मला स्वतःला ठाऊक नाही की, कथा लिहिताना मी हा गूढ, अमानवी कथांचा बाज का निवडला ? खरे तर सर्वजण अशा कथा वाचतील की नाही, हा ही विचार मी केला नव्हता. पण लिहायला बसले की, बाप्पांच्या कृपेने आणि सरस्वती देवीच्या आशीर्वादाने मी कित्येक कथा ह्या एकटाकी लिहिल्या. म्हणजे मला सुचत जायचे आणि मी लिहित जायचे. अर्थात मी हे माझे कौतुक म्हणून सांगत नाही आहे. सतत लिहित बसल्यामुळे कंबरेचा काटा कुठे असतो ते चांगलेच कळले मला त्या दिवसात. कथा लिहून झाल्यावर ती मी माझ्या मोठ्या बहिणीला- ज्योतीला, आणि माझ्या शाळेतील दोन मैत्रिणी-तेजस्विनी कोटियन आणि अनामिका थिटे ह्यांना वाचायला द्यायचे. त्यांनी हिरवा बावटा दाखविला की, मी दुसऱ्या कथेकडे वळायचे. ह्या तिघींचे किती आभार मानू? की आभार मानून त्यांना परके का करू ? तिघीही माझ्या हक्काच्याच पण त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय मला राहवत नाही. माझ्या 'घुमर' कथेसाठी राजपूती लहेजाची ओळख करून घेताना, माझ्या माहेरच्या दोन राजपूती शेजारणींनी- किर्ती व बेन म्हणजेच ज्योतीबाला ह्यांनी मला बरेच मार्गदशन केले, त्यामुळे त्यांचेही मनःपूर्वक आभार!