-
Mansachya Goshti (माणसाच्या गोष्टी)
माणूस हां, निरिक्षकाला खुपच गोंधळात टाकणारा प्राणी आहे. तो विसंगत वागातोच, पण कधी कधी अनपेक्षितपणे सुसंगिताही वागतो. कधी खूप प्रेमाने वागतो, टार कधी अकारण आकास ठेवतो. गर्दी जमा करथो, पण गर्दीतही एकटाच असतो. जगण्याची उमेद ठरतो, पण आयुष्यभर कसली ना कसली खान्ताही बाळगतो. माणूस आणि जगाने, माणूस आणि मरण, माणूस आणि स्पर्श, माणूस आणि प्रेम, आशा माणसाशी संबधित नानाविध गोष्टींच्या या कथा आहेत. या माणसाच्या गोष्टी आहेत.
-
Jadu (जादू)
एकच शब्द सारे काही बदलून टाकणारा गेल्या सुमारे वीस दशकांहून अधिक काळ एका पवित्र धर्मग्रंथामधील वचनांचे ज्यांनी वाचन केले, त्यांचापैकी बहुसंख्य लोकांनी त्याचाभोवती एक गुढतेचे वलय निर्माण केले. त्यांचा अर्थाबाबातही गोंधळ आणि गैरसमज निर्माण झाला. इतिहासातल्या काही थोडया लोकांना याची जाणीव झाली. त्यांना कळले की त्यातले शब्द हे एक कोड आहे, आणि एकदा का तुम्हाला ते सोडवता आले - त्याचे गुढ उकलता आले - की एक नवे जग तुम्हाला दिसू लागते. असे हे जीवनच बदलून टाकणारे जग रॉन्डा बर्न त्यांचा जादू या पुस्तकातून खुले करतात. मग सुरु होतो २८ दिवसांचा एक अविश्वसनीय, आश्चर्यचकित करून टाकणारा प्रवास. या प्रवासात तुमच्या रोजच्या आयुष्यात प्रत्येक दिवशी या ज्ञानाचा कसा वापर करायचा हे त्या तुम्हाला शिकवतात. तुम्ही कोणीही असाल, कोठेही असाल, सध्या कोणत्याही परिस्थितीत असाल तरी ही जादू तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा आहे!
-
Aamche Karve Sir (आमचे कर्वे सर)
प्रत्येकाला आपण शिकत असताना ज्या ज्या शिक्षकांनी आपल्याला शिकवले त्या त्या शिक्शांबद्दल निश्चितच आदर असतो. परंतु काही ठराविक शिक्षक अगदी सर्वांच्याच लक्षात राहतात. याचे मिख्या कारण त्यांनी आपल्या मनावर केलेले, आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे संस्कार! शिक्षकाचे समजावून देऊन शिकवाणे, त्याचे वागणे-बोलणे, अड़ीअड़चणीला स्वतं:हुन मदत करणे हे शिष्याच्या मनावर खोल ठसा उमटाविते. या सर्वांमध्ये मुख्य गोष्ट असते ती शिक्षकाच्या मनातील भाव! तो भाव जार उपकारात्मक अथवा स्वार्थपूर्ण असेल टार त्याबद्दल तिताकिशी जवालिक मनात रहात नाही. कर्वेसरांचे हे पुस्तक तैयार करताना मला जाणवले की त्यांनी अत्यंत प्रेमाने, निस्वार्थी भावनेने, गरज पडेल तेंव्हा पदरमोड करूनही आणि प्रत्येकाच्या प्रगतीला पूरक असे विचार मनात बाळगले आणि तेच कृतिताही आणले. हे तेंव्हाच होउ शकते जेव्हा माणूस सच्चा असतो. शिक्षकाची शिश्याशी नाळ जुळायलाशिवाय विचारांचे संक्रमण होत नाही. शिक्षक-शिष्य या नात्यात 'शिक्षा' म्हणजे शिक्षित करणे हां मूलमंत्र आहे, मग ती प्रत्यक्ष शिकावान्यातुं असो वा नजरेच्या जराबेतुं! त्यानी प्रत्येकालाच 'शिक्षित केले' म्हणजेच त्यांचे विचार समोरच्यापर्यंत पोहोचतील याची पूर्ण दक्षता घेतली. त्यांचे ते विचारही समाजाभिमुख व सन्मार्गावर नेणारे असल्यामुळे आज त्यांचे हजारो विद्यार्थी दृढ़ निश्चयाने मार्गकरमणा करताहेत व कर्वेसरांच्या पाउलखुणा आपापल्या परीने उमटवून विविध दिशांनी पुढे नेताहेत; आणि यातच कर्वेसरांचे यश आहे. माणसाला अंत असू शकतॊ पण विचारांना नाही. तेंव्हा कर्वेसरांचे सद् विचार, सत्कार्य व नैतीकतेचे शिक्षण असेच निरंतर समाजमनात टिकून राहो व त्याचा सुगंध प्रत्येकाला शिक्षित व प्रेरित करूँ अनंत कालपर्यंत दरवळत राहो, हीच सद्गुरुचरणी प्रार्थना!
-
Ek Hoti Aaji (एक होती आजी)
कोकणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिचित्रे साकार करण्यात ख्यातकीर्त असलेले महान कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ही कादंबरी. आजीचे लग्न तिच्या पंधराव्या वर्षी, तिच्याहून पस्तीस वर्षांनी वयाने मोठया असलेल्या बिजरावाशी होते. तेव्हापासून तिला, नातवंडे, पणतवंडे होईतोपर्यंतच नव्हे तर ती अखेरचा श्वास घेईतोपर्यंतचा आजीचा अवघा जीवनपट या कादंबरीत उलगडून दाखविलेला आहे. ती प्रेमळ, परोपकारी, निःस्वार्थी, निःपक्षपाती होती, हे तर खरेच. या तिच्या स्नेहार्द स्वभावामुळे ती सर्वांच्या सदैव स्मरणात कशी राहिली याचे अनेक चित्ताकर्षक घरेलू प्रसंग लेखकाने नवरा, दीर, भाऊ, भावजय, दिराची मुले, सुना, जावई आदी नातेसंबंधांभोवती मोठ्या तन्मयतेने गुफलेले आहेत. तरीसुद्धा मनात प्रश्न येतोच आजी कशी होती-? लग्नापूर्वी ओढवलेल्या `त्या’ प्रसंगामुळे आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तर्हने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `ते’ अमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध प्रत्येक वाचकाला घ्यावासा वाटेल-
-
Vishayantar (विषयांतर )
...वास्तव सलगपणे बघू नं शकाणं किंवा अनुभवाची एकसंधाता न साधू शकाणं हेच महानगरी लेखकाचं वास्तव आहे. खोत त्याचाशी प्रमाणिक राहिले आहेत आणि सतत अनुभवांचा गुंतवळा मांडत राहण्याचा प्रयत्न करत राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या कादंबर्यांत कथानप्रधानतेला पूर्णपणे फाटा आहे... त्या वास्तावाशिच नाळ ठेवून आहेत. पण त्यातली असंगतता, अतार्क्यता जशी आहे तशी स्विकारातात... त्या कुठलाही पवित्रा घेत नाहीत. उलट पवित्रा घेणार्यांशीच दावा मांडतात. त्यांचं अंत:सूत्र पक्कं असलं तरी वरकरणी तय विस्कळीतपणे व्यक्त होतात. हा विस्कळीतपणे एका गरजेतूनच येतो. अनेकदा कथेचा मुख्या प्रवाह सोडून ते असंबन्ध गोष्टीत घुसतात. कुठल्यातरी पूर्वीच्या आठवणींचे किस्से, कोणाचे तरी विनोद, दृष्टांत कथा, सुभाषितवजा वाक्यं, कवितांच्या ओली असे तुकडे अधुनमधुन पेरत रहातात. मूळ गोष्टीशी तादात्म्य होऊ डेट नाहीत. 'विषयांतर' मध्ये तर गोष्टही नाही, नुसतेच मुद्दे आहेत... जणू एक अनुभांचं अराजक खोत निर्माण करतात. त्यामुळे आधुनिकतावाद्यांच्या कालात लेखन करणारे खोत मला उत्ताराधुनिकतावादी वाटतात. खोत गिरणगावातले. मीही गिरणगावातलाच. त्यामुळे त्यांच्याविषयी मला आदर आणि आत्मीयता तर आहेच, पण इतका महत्वाचा लेखक आपल्या अवतीभवती होता, जी हवा मी छातीत भरुन घेतली तीच हवा त्यांचाही फुफ्फुसांतुन वाहत होती आणि आम्हा दोघांच्या दिक्यावर एकच आसंमत छत्री धरून होता याचं अप्रूप माला आहे आणि ते कायम वाटत राहणार आहे.
-
Janhavi Teeri (जान्हवी तीरी )
जय मंदाकिनी उत्तर रंगे दक्षिणी गोदावरी माने! सुजलाम् सुफलाम् भूमि कराया अवतारालिस येथे! जान्हवी नदीच्या तीरी घडत गेलेली निझामी अत्याचारांविरुध्दच्या संघर्षापासून ते आधुनिक युगातील आव्हानांना सामर्थ्यपाने तोंडं देणार्या साध्या पण असमान्यत्व सिध्ह करणार्या एका छोट्या गावातील सामान्य माणसांची ही कहाणी...
-
Kimayagar (किमयागार)
सामान्य माणसातील असमान्यत्व त्यांचे जमिनीवर रोवलेले पाय कुठल्याही परिस्थितीत मुळांन पासून फारकत न घेण्याची वृत्ती अदम्य जीजीविषा मनात सतत झंकारत असलेली नि:स्पृहतेची तार निरंतर 'एकला चलो रे' चे अभियान आणि खांद्यावर निरंतर समाजिक जाणिवेच्या बांधलीकीची चिरंजीव पताका हीच या पुस्तकातील 'किमयागारां' ची किमयागारी आहे. यांच्या बाबतीत सांगयाचं तर एवढचं सांगता येईल. ये तो अकेले हि चले थे जानीबें मंजिल मगर लोग मिलते गये, कारवां बनत गया// मला विश्वास आहे, त्यांच्या हे जीवनातील सारतत्व आपल्याला या पुस्तकाच्या शब्द चिंतनातून सतत जाणवत राहील.
-
Vibhram (विभ्रम)
व्यक्तिमत्वाप्रमाणं ज्या-त्या लेखकांचे रंग ललितलेखनामधे आपोआपच मिसळले जातात; आणि हे गहिरं, अधिक पारदर्शक होत राहतं. त्या लेखनाची मंडनरचना (desing) घडत रहते. ललितलेखनाला जीवनानुरूप कथनशैलीचा नि विषयमांडणीचा एक वर लाभलेला आहे. वीणा देव ह्यांच्या 'विभ्रम' मधील लेखान्विशायांकडे पहिलं की ह्या गोष्टीची प्रचिती येते. अनुभवाची तीव्रता कमी आणि आविर्भाव किंवा अभिनिवेश अधिक असं लेखन कधीच कसदार किंवा परिणामकारक ठरत नाही. अनुभवाला त्याची म्हणून काही धार किंवा तीक्ष्णता नसेल तर ते लेखन बेगडी ठरतं. वीणा देव ह्यांनी ह्या संग्रहासाठी निवडलेल्या अनुभवांना रसरूपगंधाचा काही अनोखा स्पर्श जात्याच प्राप्त झाला आहे. पण अनुभव कितीही श्रेष्ठ वा आगळावेगळा, दिपवून टाकणारा असला, तरी तो मांडण्याचं लेखकाचं कौशल्या वा हातोटी शिल्लक राहातेच. एरवी 'अनवट'रागांतल्या चीजांसारखं अप्रचलित रूपबंधाचं ललितलेखनही कधीकधी आस्वाद्य ठरतं ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण मांडणीमुळे आणि कथनशैलीमुळे.
-
Manasi (मानसी )
१९८० च्या दशकात जोमाने विस्तारु लागलेली औद्योगिक साम्राज्यं... शिवाय नव्याने उभारू लागलेले कारखाने...त्यामुळे व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाची गरज निर्माण झाली.हे ओलखून डॉ.देवबागकर मॅनेजमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरु करतात. एकीकडे सर्व सुखयोगिनी समृद्ध असलेल्या भागत, भरगच्च फी घेउन उच्चभ्रू वर्गासाठी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चालणारे देवबागकर तर दुसरीकडे आडगावात राहून दुर्लक्षित पण अत्यावश्यक असे प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक सिक्षनाचे आव्हान पेल्नरी द्वारका... कर्तृत्ववान देवबागकरांना उतारवयात पंचविशीच्या गिरिजाबद्दल वाटणारे आकर्षक आणि विवाहित असल्याचे माहित असूनही त्यांच्या मोहत पदानारी गिरिजा... द्वारका आणि देवबागकर या दोन विरुद्ध व्यक्तिमत्वामाधाला टकराव... सार्याच व्यक्ति प्रगल्भ आणि कर्तृत्ववान... त्यांचा परस्पर्विरुध रंगांमधे विणलेला गोफ...'ज्यांच त्यांच आभाळ'!
-
Mahatma Gandhi Aani Bhartiya Rajyaghatna (महात्मा
महात्मा गांधीनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व तर केलेच; पण स्वतंत्र भारताची राज्यघटना कशी असावी, याबद्दलही वेळोवेळी ते मार्गदर्शन करीत होते. स्वतंत्रपूर्व काळात राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनामद्धे समंत झालेल्या अनेक ठरवांमध्ये गांधीजीच्या विचारांचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळते. प्रत्यक्ष स्वतंत्र मिळाल्यानंतर आपली जी राज्यघटना तयार करण्यात आली, ती मात्र गांधीवादी विचारसरनिशी फारशी सुसंगत आहे. असे म्हणता येत नाही. असे का झाले. असावे? महात्मा गांधी आणि त्यांचे वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्येच मुलभुत मतभेद का असावे? महात्मा गांधी आणि वारसदार असणारे पंडित जवाहरलाल नेहरू या दोघांमध्ये मुलभुत मतभेद का होते? ती मतभिन्नता कशा बाबतीत होती? आशा विविध प्रश्नाची उत्तरे देता देता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या इतिहासही उलगडून दाखवणारे एका जेष्ट न्यायविदाचे हे पुस्तक.... गांधीजींच्या व्यक्तमत्वाचे एका आगळ्या पैलुवर अधिक प्रकाशझोत तर टाकतेच. पण काही मुलभुत राष्ट्रिय प्रश्नाची पुनर्विचार करण्यास वाचाकांना प्रवृतही करते.
-
Mothe Lok Chote Hote Tevha
`नोबेल पुरस्कारप्राप्त बंगाली कवी-लेखक रवींद्रनाथ टागोर, चित्रकार पिकासो, शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, आल्बर्ट आइन्स्टाइन, चार्ल्स डार्विन, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, स्वामी विवेकानंद, युरी गागारीन, मार्क ट्वेन, पं. जवाहरलाल नेहरू, नेपोलिअन, कार्ल मार्क्स, स्वा. सावरकर, मार्टिन ल्यूथर किंग, म. धोंडो केशव कर्वे, नेताजी सुभाषचंद्र बोस, लिओ टॉलस्टॉय, राजा राममोहन रॉय, जॉर्ज बर्नार्ड शॉ, हेलन केलर, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार्ली चॅप्लिन, रामकृष्ण परमहंस... या जगद्विख्यात व्यक्तींच्या थोरत्वाच्या चाहूलखुणा बालपणीच्याच पाऊलवाटेवर उमटू लागल्या. सर्व शक्तिनिशी ते धडपडले, अनेक आघात सहन केले, संघर्ष झेलला, गरिबी सोसली, अथक जिद्दीने, ध्यासाने, ध्येयपूर्तीसाठी त्यांनी जिवाचे रान केले आणि ज्ञानाचा समुद्र पिऊन टाकण्यासाठी ते आतुर झाले. आदर्श नाहीसे होत चाललेल्या आजच्या काळात छोट्यांना ही व्यक्तिचित्रे मानसिक ताकद देतील.
-
Ekala Bolo Re (एकला बोलो रे)
रंगमंचावरून प्रेक्षकांशी थेट किस्सेवजा संवाद साधताना आपल्या प्रयोगाची गती, चलती फजिती आणि टवाळीही मनमोकळेपणी मांडणारे पुस्तक.
-
Yedyachi Jatra (येडयाची जत्रा)
गावगाडा बदलला तरी माणसांचे स्वभाव बदललेले नाहीत. त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, प्रसंगातून सहजपणे विनोदनिर्मिती होत असते. तेच विनोद कथांमध्ये सोपान खुडे यांनी शब्दबद्ध केलेले आहेत. मनावरचा तान आणि शरीराचा शीण कमी करण्यासाठी हा कथासंग्रह आपण सर्वानी वाचलाच पाहिजे.