-
Alamgir (आलमगीर)
'' तुम्ही, गिरफ्तारित टाकुन, आमचा छळ सुरु केला. तरीही आपला बाप - बेटे का रिश्ता तुटणार नाही. तुमच्या अम्मीजान या दुनियेतून जाताना, आमच्या हाती देऊन पालन करण्याची, जिम्मेदारी सोपवली. तेव्हा पासून परवरिश करून तुमचे खुप लाड- प्यार केले. परंतु तुम्ही सगळ विसरून गेलात. आपल्या सख्या भावना नष्ट करून, आम्हास या लाल किल्ल्यात बंदिस्त केलंत खरोखरच आम्ही नालायक, डरपोक आहोत. म्हणुनच कुजात पडलोय. तुमच्या सारख्या पुत्राचा वालिद झाल्याबद्दल, आम्हास फार फार शरम वाटते. तुम्ही करीत असलेल्या हा छळ म्हातारपणाचा आहे. तुम्हालाही आमच्यासारख्या बुढ़ापा प्राप्त होणार आहे. हे ध्यानी ठेवा.''
-
Swapanranjan (स्वप्नरंजन )
राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरुण.त्याला हीरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलांव असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमात नसतं.मग एक चमत्कार होतो. त्याचा औश्यात एकदम तीन-तीन मुली येतात. त्यांची नंख खायची सवय जाते.तो धड्याक्यानं हीरो तर बनतो पण तय नंतर त्याचा आयुष्यात आलेल्या तिघिही एक एक करूँ कटतात. कुनाचं लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगल असतो. राजुला त्याचा क्रीडा कैशाल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याचा लग्नाची घाई असते. मग काय घडतं? हे गीता रहस्य सोदावायचं तर 'स्वप्नरंजन' करायलाच हव.
-
Drakshakanya (द्राक्षकन्या)
द्राक्षकन्या या इथे तरुतळी एक वही कवितेची, भाकरी एक, अन सुरई एक सुरेची, आणखी एक तू जवळ गात या विजानीं अन हें न रान मग, नंदनवन तं हेची! अनुवाद या निर्जन रानात इथे या झाडाखली मी, माझ्या जवळ एक भाकरी, कवितांची एक वही आणि मद्य भरलेली एक सुरई आहे. इथे माझ्या जवळ बसून तू गात आहेस. आता हे रान, रान राहिले नसून स्वर्गातले नंदनवन म्हणतात ते माझ्यासाठी हेच आहे.
-
Maharashtratil Vakte (महाराष्ट्रातील वक्ते)
महाराष्ट्राची पवित्रभूमी ही येथील संतमहात्म्यांमुळे जशी अधिक पावन झाली तशीच महाराष्ट्रातील सरस्वतीपुत्रांच्या वाग् विलासामुळे अधिकच चैतन्यमय झाली. महाराष्ट्रातील या सरस्वतीपुत्रांच्या आशिर्वादाने अनेक वाक् पटू महाराष्ट्राला लाभले. आपल्या अमोघ वक्तृत्वाने अनेक व्यासपीठे त्यांनी गाजवली. त्या बँ. नाथ पै. श्री. म. माटे, सेतू महादेवराव पगडी, पु. ल. देशपांडे ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांसारख्या दिग्गज वक्त्यांचा परिचय महाराष्ट्रातील वाचकांना व्हावा या उद्देशाने झालेली ग्रंथनिर्मिती म्हणजे 'महाराष्ट्रातील वक्ते'.
-
Bartand Arther Rasel (बर्ट्रांड आर्थर रसेल)
एकोनिसाव्या-विसाव्या शतकातील एक विख्यात, विचारवंत व तत्त्वज्ञ म्हणून रसेलची ओळख आहे. एक गणितज्ञ, तत्त्वज्ञ, तर्कशास्त्रातील पंडित म्हणून विद्वतेच्या परिघातील त्याचे स्थान मोठे होते. असं असलं तरीही त्यांच्या व्यक्तिमात्वाचे इतर कितीतरी अधिक पैलू हेही तितक्याच तोलामोलाचे राहिले. त्याचे लिखाण मैलिक होते. गणित व तत्त्वज्ञानात त्याने स्वतंत्रपणे स्वात:च्या विचारांची मोलाची भर घातली. त्यानंतरच्या काळात जागातिक परिस्थित जे परिवर्तन आले त्याचा वेध घेउन रासलेले आपल्या वैचारिकतेचे वालन बदलले. पुढे त्याने जे विषय निवडले ते सामजिक प्रश्नान्बाबत होते. त्याविषयी लिहिताना त्याने जे लिहिले ते लोकांना समजेल आशा सुटसुटीत शैलीत. त्यामुले तो सर्व सामजिक स्तरांवर लोकप्रिय ठरला. बौद्धिक क्षमता व सामाजिक भान अखेरपर्यंत उणावले नाही. त्याच्या करकर्तृत्वाचा प्रभाव आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विसाव्या शतकात अबाधित होता. रसेल्ची अव्वल दर्जाची प्रतिभा, वायरल द्रष्टेपणा आणि हाती घेतलेले काम शेवटपर्यंत पुरे करण्याची त्याची जिद्द यांचे मूळ काहीसे त्याच्या पूर्वायुष्यात, अर्थात ज्या परिस्थितीत तो लहानाचा मोठा झाला त्यात मिलते.
-
Devdi (देवडी)
किताबों से कभी गुजरो तो यूँ किरदार मिलते हैं गए वक्तों की ड्योढ़ी में खड़े कुछ यार मिलते हैं !! आयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. काही कायम सोबत राहतात, काही एखाद्या वळणावर साथ सोडून जातात. अशीच काही माणसे आपल्याला पुस्तकांमधूनही भेटतात. अनेक कथा, कादंबर्या, कवितांमधून भेटलेली पात्रे मनात कायम रुंजी घालतात. अशीच काही नवीन पात्रे आपल्या भेटीस आली आहेत गुलजार यांच्या देवडी या नव्या कथासंग्रहामधून.
-
Bhadramukhi (भद्रमुखी)
भद्रमुखि नामक बेटावर विज्ञाननं भाकित केलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचं निरिक्षण करण्यासाठी वैज्ञानिकांची एक तुकड़ी येते. या बेटावर एका मानवी समूहाचंही वास्तव्य आहे. या समुहाच्या आदिम संस्कृतीचं, परंपरारिवाजांचं, जीवनसंघर्षाचं नाट्यमय आणि उत्कंठावर्धक दर्शन घडवणारी ही विज्ञान-कादंबरी. भविष्याचा वेध घेत प्रत्यक्ष घडू पहाणार्या एका वैज्ञानिक सत्याचारी बरोबरीन अन्वयार्थ लावणारी. एका मानवी समुहाची विजीगीषा आणि विज्ञानाच्या प्रगतिशील पावलांवरही विजय मिळवू पाहणारी निसर्गाची अदम्य शक्ति यांची परस्परसंवादी समांतरता, हे या कादंबरीचं सूत्र. विज्ञानकथा -कादंबर्या लिहिणार्या मोजक्या लेखाकांताही कसदार नि समर्थ विज्ञानकथा-लेखक म्हणून अरुण हेबळेकररांचं नाव वरच्या श्रेणीत येतं. विज्ञानाकरता विज्ञान हां अट्टाहास न बाळगता,विज्ञानाला एखाद्या व्यक्ति-रखेइतकी स्वाभाविक, जिवंत भूमिका ललित साहित्यात देणं, हे अरुण हेबळेकरांच्या लेखनाचं वैशिष्ट्य.फॅटसीची धूसरता आणि विज्ञानाची सत्यता यांची अदभुत रम्य गुंफण आणि व्यक्तिरेखांचं सूक्ष्म, मार्मिक आकलन लक्षणीय विज्ञान-कादंबरी या अर्थानं 'भद्रमुखि' निश्चितच नावाजली जाईल!