-
Shunya Aani Bindu (शुन्य आणि बिंदु)
शून्य आणि बिंदू यातील फरक तू जाण नाही कळलं तर कबूल कर अज्ञान ! जीवनाचं अतिंम सत्य साठीनंतर कळतं साठीनंतर माणसाचं मन सत्य शोधात पळतं !
-
Gabhallela Aabhal (गाभाळलेलं आभाळ)
कुणाच्या खांद्यावर ठेवू मान कानाच्या चरणी टेकवू माथा येत-जाता, जो-तो गातो आपल्याच ओव्या आपल्याच गाथा रामायणाने शिकवलं माणसाने कसं जगावं महाभारताने शिकवलंय आपण कसं मारावं
-
Karulcha Mulga (करुळचा मुलगा)
'करूळचा मुलगा' ही दारिद्य्राशी झगडत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आशावादी वृत्तीने केवळ लेखनगुणांच्या बळावर जिद्दीने स्वत:चे जीवन यशस्वी करणाऱ्या लेखकाने सांगितलेली जीवनकथा आहे. एका अर्थाने हे मधु मंग[...]
-
Chicken Soup For The Soul-Indian Women
चिकन सूप फॉर द सोल : इंडियन विमेन' हे पुस्तक स्त्रिजतिला भेडसावनारे सार्वत्रिक प्रश्न आणि संदर्भ मात्र अस्सल भारतीय आहेत. या पुस्तकातील संवादी स्वर कन्या, बहिनी, माता, विद्यार्थिनी आणि कर्तुत्ववान स्त्रियां यांच आहे. ज्याना भोवतालच्या कोलाहलात कधी प्रयत्नाने तर कधी योगायोगान आपल्या जीवनसत्याचा साक्षात्कार झाला, अंधारात आशेचा किरण दिसला, प्रतिकूल परिस्थितीत धेर्य आणि प्रेम गवसल. वेगवेगळ्या भूमिका निभावणारे आणि आपापल्या संसारात व कामाच्या ठिकाणी एकाच जन्मात अनेक आयुष्ये जगणारे विविध स्त्रियांच्या पाककौशल्यातुन तयार झालेले हे ' चिकन सूप' तुम्हाला नक्कीच उल्हासित आणि प्रेरित करेल!
-
Akash Badaltana (आकाश बदलताना)
लंडन: तिशीच्या आसपासची ती मंडळी त्यांच्यातल्या एकाचा वाढदिवस साजरा करायला जमाली होती. वरवर बघायला हयात विशेष काही नहव्तं सगळं छान नार्मल वाटत होतं. पण ह्या चित्राचे अंतरंग मात्र वेगालेच होते. अखंड साधनेच्या जोरावर क्लेअरचे प्रथितयश नर्तिका म्हणून नाव कमविण्याचे चांगले आकाराला आलेले स्वप्न रस्त्यावरील एका अपघातामुळे अचानक धुळीला मिळाले होते. त्यातून सावरण्यासाठी तिला अँथनीची साथ मिलाली खरी; पण लग्नाला काही वर्ष होऊं गेली, तरी त्यांना मूल होत नव्हतं. मात्रुत्वाची आस असलेल्या क्लेअरला, ह्या समस्येवारिल खर्चिक उपाययोजनांना सामोरे जात असतानाच, आपल्या नोरा नावाच्या छोट्या विद्यार्थिनिचा ज़रा जास्तच लळा लागला होता. ही मानसिक उलघाल कमी होती म्हणून की के अँथनीच्या नोकरीवर गदा येउ घातली होती. ह्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे शहरात प्रचंड तणाव होता. दिवसेंदिवस बकाल होत चाललेल्या ह्या शहरात तग धरून राहणे आनाखिनाच कठीन होउ लागले होते. आपल्या अतिरेकी जखमांवर फुंकर घालणारे एक अशांत शहर, आर्थिक, सामजिक व् मानसिक तणावांनी ग्रासलेली एक विवाहिता ह्यांचे दहशदवादाच्या पार्श्वभुमिवारिल मनोवेदक चित्रण.
-
Dongri Te Dubai (डोंगरी ते दुबई)
मुंबईत ६० वर्षे गुंडांच्या टोळ्या चालवणा-या माफियांचा प्रभाव होता. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांच्या तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले पहिले पुस्तक आहे. एका साध्या शाळकरी पोरापासून टोळीच्या दादापर्यंत दाऊदची उत्क्रांती कशी होत गेली, दाऊदने पोलीसांचा उपयोग करून आपल्या प्रतिस्पर्धाना कसे निपटले आणि शेवटी तो मुंबई पोलिसांचा एकमेव सुडकरी कसा बनला याचे वर्णन यात आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक इतिहास आहे. पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद याने पठाणाच्या टोळीला कसे निपटले, पहिली सुपारी कशी दिली गेली व शेवटी दुबईतून दाऊद कसा पळून गेला, याचे थरारक वर्णन पुस्तकात आले आहे.