-
Surbhi (सुरभि)
जे जे सुंदर, ते ते पवित्र, मंगल अशा भावनेने जगाकडे वास्तवाकडे पहाण्याचा सुप्रिया नाईक यांचा दृष्टीकोन. विविध विषयांना स्पर्श करत मोजक्या तरीही रेखीव शब्दांत काव्य गुंफले आहे. त्या बी.एड्. असून साहित्याची, लेखन वाचनाची आवड वेचक आणि वेधकपणे जोपासली आहे. गेली ४० वर्षे त्यांचा लेखन प्रवास सुरु असून लोकसत्ता (काव्यरंग), मासिक रोहिणी व इतर नियतकालिकांतून कथा, काव्य रसिक पर्यंत पोचले आहे. २००७ साली स्टेट बँक ऑफ इंडियातून स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली व आता साहित्य क्षेत्रात मुक्तपणे व स्वच्छंदपणे विहरत आहेत.
-
Baki Kshem (बाकी क्षेम)
दिनू तिचा नव्हता,ममा तिची नव्हती आणि अभिहि तिची नाही ती एकटी होती. आईला ती अधुनमधुन खुशाली कळविणार होती आणि- पत्र संपवाताना नि:संदेह्पणे लिहिणार होती..... "बाकी क्षेम"! मराठवाडा साहित्य परिषदेचा 'उत्कृष्ट कथासंग्रह' म्हणुन 'कै.वि .शं . पारगवांकर पुरस्कार-१९९२' प्राप्त.
-
Thoda Aarshat Dokaavuya (थोडं आरशात डोकावूया)
'खरं सांगू का तुम्हाला? मला तरी वाटतंय,हे त्यांच सांगणं अप्ल्यासरखाया सामान्य संसारी बायकांसाठी नाहीच आहे. आपण लोक काय गं ? थोडक्यात समाधानी, आहे त्यातअँडजस्ट करणार, दुसर्यांच्या आनंदात आपला आनंद शोधणार. घरातल्या लोकांच्या तलावर नाचणार्या आपण बयका काय आरशात बघणार आणि आत्मपरीक्षण करणार ?'
-
Deh Jao Athwa Jao (देह जाओ अथवा जाओ)
बाहेर वीज चमकून नाहीशी झाली. काही क्षणाच्या अंतराने तिचा चमकदार कशीदा आभाळात उमटत राहिला. राहिला असावा! आभाळाचा थोडाही अंश इथून असा नजरेला पडत नव्हता. तरी काही क्षणाच्या अंतराने उमटणारे तिच्या चमकदार आवर्तनात थेट बाहेर दिसणारा मर्यादित परिसर लख्ख चांदीचा होऊंन जात होता. इथे सकाळी मी ज्या वाटेवरून आलो होतो . ती वाट- वाट कसली, मातीच पटांगण - त्यावेळी त्याचं स्वरुपही माझ्या लक्षात आलं नव्हत ; पण आत चमकणाऱ्या विजात ते पटांगण विलक्षणस लाल- मातेरी रंगाच दिसून नाहीसं होत होतं.
-
Sanjwa ( सांजवा)
संध्याकाळ निसटुन जाताना कधी कधी संधि प्रकाश पसरतो. आता अंधार पडणार आहे की उजेड लागणार आहे, असा संभ्रम पडावा इतका गूढ़. गूढ़ आणि हुरहुर लावणारा...... काहींच्या आयुष्यांतही असा ' संजावा पसरतो. संकट संपणार आहे की तीव्र होणार आहे. या संभ्रमामूळे अस्वस्थ्तेचे काहूर मनात भिनते. तरी ही, मानसे नेटाने जगत, लढत राहतात. जिंकतात त्या अनुभवातून येणारी उमेद हीच त्यांच्या जगण्याची , 'श्रीशिल्लक' ! ' सांजवा' तल्या पाचही कथा ती श्रीशिल्लक' वाचकाच्या मनातही जागी करतात. जुन्या काळातल्या पात्रांच्या आणि भिन्न भिन्न जीवनशैलीतील्या या कथा, आशय आणि अनोख्या शब्दकळेमूळे सदैव ताज्या वाटणार्या आहेत.
-
Shodh (शोध)
लाकडाचा धुर डोळ्यात जातो म्हणून चुल पेटवायाची थांबायच नसत ... तसेच जीवनात अडचणी आल्या दरी निर्माण झाली ... म्हणून आपण निराशेच्या गर्तेत खालोखाल जायच नसत तर.. ती दरी योग्य मार्गाने पार करायची असते. जीवनात उचित व अनुचित यातला भेद ओळखायला शिकणे फार महत्वाचे असते ... त्यातून जीवनाचा योग्य तो कप्पा ... सहज उघडता येतो ... अशाच काहीशी घड़ामोङीवर प्रकाश टाकणारा हा कथासंग्रह ...