-
The Difficulty Of Being Good (द डिफिकल्टी ऑफ बीइं
महाभारताच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर गुरुचरण दास यांनी आपल्या लेखनाद्वारे हा महान ग्रंथ आजच्या दैनंदिन जीवनातील पेचप्रसंगांवरही कसा प्रकाश टाकू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी केलेले धर्माचे विविधांगी सखोल विश्लेषण वाचकांना वेगळीच मर्मदृष्टी देते. या पुस्तकातही महाभारताप्रमाणे नैतिक, राजकीय आणि सार्वजनिक - सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे.
-
Georges And Big Bang (जॉर्ज अँड द बिग बँग)
एरिक हे वैज्ञानिक सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी संशोधन करत असतात. मानवजातीला हितकर असे काही निष्कर्ष त्यांच्या दृष्टिपथात असतात; पण टोरेग या संघटनेचे लोक एरिकच्या या संशोधनामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे, असा अपप्रचार करत असतात. कॉसमॉस या एरिककडे असलेल्या संगणकाचा गैरवापर केल्याचा आरोप एरिक यांच्यावर ठेवून, त्यासंदर्भात हाड्रॉन कोलायडरवर ताबडतोब मानव हितचिंतक संघाच्या बैठकीचं आयोजन केलं जातं. अर्थातच एरिक कॉसमॉससह त्या बैठकीला रवाना होतात; पण ते गेल्यानंतर त्यांचा जीव धोक्यात असल्याचा संदेश रीपनकडून जॉर्जला मिळतो. बैठकीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून एरिक आणि अन्य भौतिक वैज्ञानिकांना ठार मारून त्यांच्या विधायक संशोधनावर कायमचा पडदा पाडायचा टोरेग संघटनेचा डाव असतो. हा डाव उधळण्यासाठी निघालेल्या जॉर्ज आणि अॅडनीवर कोणती संकटं कोसळतात? ते बैठकीच्या ठिकाणी पोचण्यात यशस्वी होतात का... जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ‘जॉर्जेस अॅ न्ड द बिग बँग.’
-
Pardeshi (परदेशी)
नाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती, विविध विषयांवर संवेदनशील ललित लेखन करणारे साहित्यिक अशी. डौलदार तरीही सुबोध भाषा, आशयाचा नेमकेपणा, नाट्यपूर्ण रचना या वैशिष्ट्यांमुळे या लेखांना कथेचा चटकदारपणा प्राप्त होतो आणि तो सहजपणे वाचकांच्या मनाला भिडतो. कुठलाही अभिनिवेश नसलेल्या या लिखाणातही, मतकरींचे सामाजिक भान आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. या सगळ्याबरोबरच, ‘परदेशी’ या संग्रहाचा विशेष असा की, त्याला अ-भारतीय समाजाची पाश्र्वभूमी आहे आणि तरीही सगळीकडचा माणूस एकच आहे, हा अंतिम विचार त्यामागे आहे. संग्रही ठेवावा असा हा आगळावेगळा संग्रह!
-
Bari (बारी)
जंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीचीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे.
-
Maza Gaon (माझा गाव)
`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू या कादंबरीलेखनामागं होता. जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, कसा जगत होता, स्वत:ला समाजाशी कसा वाहून घेत होता, हे दाखविण्यासाठी मी ही कादंबरी लिहिली आहे. आज सगळं ग्रामजीवनच बदलत चाललं आहे. समाज बदलतो आहे, संस्कारही बदलत आहेत; पण हरवलेल्या जीवनाची रुखरूख मात्र मनात घर करून होती. ती वाढतच होती. ती रुखरूख हीच या कादंबरीलेखनामागची मूळ प्रेरणा आहे...
-
Chhava Teen Anki Natak (छावा तीन अंकी नाटक)
हे दगडी कासव आम्हाला आमच्या हयातीचं प्रतीकच वाटत आलं आहे. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या हरएक भाविक दर्शनभक्ताचे कळत-नकळत पाय पडतात ते या दगडी कासवाच्या पाठीवर! भरल्या मनाचे नमस्कार रुजू होतात ते मात्र गाभाऱ्यातील मूर्तीच्या चरणांपाशी— आम्ही— आहोत या हमचौकातील दगडी कासवासारखे! आबासाहेब— आबासाहेब आहेत ते दौलतीच्या गाभाऱ्यातील मूर्तीसारखे!... खंत पाठीवर पडणाऱ्या पावलांची मुळीच नाही. एवढीसुद्धा नाही. खंत आहे ती मात्र एकाच बाबीची— आणि ती जरूर आहे— काळीजतोड खंत आहे ती येसू—उभ्या दौलतीत असा एकही जाणता मिळाला नाही की ज्याच्या ध्यानी कधी हे आलं की— या दगडी कासवाचीही नजर अहोरात्र जोडलेली असते ती— ती मात्र गाभारातल्या त्या मूर्तीच्याच चरणांठायी!— हे नेमकं जाणणारे जाणते होते— आमचे आबासाहेब— आमच्या थोरल्या आऊसाहेब.
-
Kavadase (कवडसे)
सावंतसाहेबांनी उभ्या केलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या व्यक्तिरेखा म्हणजे पुराणातली वांगी नसतात, तर २१व्या शतकाशी त्यांचा सांधा असा जुळलेला असतो की कित्येक वाचक त्यातून जीवनदायी प्रेरणा घेतात. ह्या लेखसंग्रहातही सावंतसाहेबांची ही वैशिष्ट्यं तर मला जाणवलीच; पण समकालीन लेखकांच्या लेखनाचं मोकळेपणानं कौतुक करण्याचा त्यांच्या मनाचा खुलेपणाही मला जाणवला. ते माणसातली विकृती शोधत नाहीत— शोधतात त्याला झालेला दिव्यत्वाचा स्पर्श— मग तो भक्तीचा असेल, प्रतिभेचा असेल किंवा सामाजिक कणवेचा असेल. सावंतसाहेबांच्या महाकादंबऱ्यांत तर त्यांच्या लेखणीचं सामर्थ्य वाचकाला भारावून टाकणारंच असतं; पण ह्या छोट्या छोट्या लेखांतील तेज:पुंजांचं महत्त्वही मला कमी वाटलं नाही. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या प्रतिभासूर्यानं वाचकांना दिपवून टाकलं; पण ह्या लेखसंग्रहातही त्यांच्या प्रतिभासूर्याचे विविध आकारांचे कवडसेसुद्धा वाचकाला एक वेगळाच आनंद मिळवून देतील याबद्दल शंका नाही.
-
Georges Cosmic Treasure Hunt (जॉर्जेस कॉस्मिक ट्रे
जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट’ ची कथा फिरते शाळकरी वयातील जॉर्ज, त्याचे आई-वडील आणि आजी, एरिक हे वैज्ञानिक, त्यांची मुलगी अॅचनी, एरिकचे सहकारी रीपन, त्यांच्या मित्राचा मुलगा एमिट आणि एरिकचा ‘कॉसमॉस’ नावाचा ताकदवान, हुशार संगणक यांच्याभोवती. ग्लोबल स्पेस एजन्सीमध्ये एरिक काम करत असताना त्या एजन्सीद्वारे होमर नावाचा यंत्रमानव मंगळावर पाठवला जातो; पण काही दिवसांनंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटतो आणि जेव्हा तो परत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात येतो, तेव्हा तो विचित्र वागत असतो. दरम्यान, अॅतनीला परग्रहावरून असा संदेश येतो, की होमरला दुरुस्त केलं नाही तर पृथ्वीचा नाश होईल. म्हणून अॅ नी आणि जॉर्ज मोठ्या माणसांना कल्पना न देता मंगळावर पोचतात, एरिकना हे समजल्यावर तेही मंगळावर जातात. तिथे काय होतं? अॅ्नीला संदेश कोणी पाठवलेला असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि एकूणच अंतराळाविषयीची रंजक माहिती मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचली पाहिजे.
-
Mrutyunjay Teen Anki Natak (मृत्यूंजय तीन अंकी नाट
नाही!! नाही! मी सूतपुत्र नाही. राधेय नाही. एकशेएकावा कौरव नाही. कौंतेय आणि पहिला पांडव तर नाहीच नाही. मी– मी सूर्यपुत्रही नाही!! मी– मी आहे एक प्रचंड शून्य!! प्रचंड शून्य!! ज्याला नसतात बंधू-बंधनं, नसते माता-ममता, नसते आवश्यकता कुठल्याही कुळाची– कसल्याच वारशाची, ज्याला नसतात मान- अवमान– आत्माभिमान– कसले कसलेच भाव! ‘कऽर्ण, कऽर्ण’ एक प्रचंड शून्य! जन्म नसलेलं, मृत्यू नसलेलं! राधा-कुंती, वृषाली- पांचाली, शोण, अर्जुन, घोडा-सूर्य, सर्वा-सर्वांनाच सामावून घेणारं! सर्वापार गेलेलं! कशाकशातच नसलेलं! एक प्रचंड शून्य!
-
The Miracle (द मिरॅकल)
लूर्द फ्रान्समधलं एक छोटसं गाव. खिश्चनधर्मीयांचं पवित्र श्रद्धास्थान. एक किसानकन्या; एपीआय् या वृत्तसंस्थेची, एक सुमार रूपाची, पण बुद्धिमान वार्ताहर; एक रूपसंपन्न, निष्णात मानसशास्त्रज्ञ आणि तिचा गुणसंपन्न,देखणा प्रियकर; रशियन पंतप्रधानकीची महत्त्वाकांक्षा बाळगणारा एक रशियन परराष्ट्रमंत्री; साधी-सरळ, निष्कपट, नोकरदार ब्रिटिश महिला नि तिचा अनेक ‘उद्योग’ करणारा नवरा; एक अंध, पण रूपवान इटालियन तरुण अभिनेत्री नि तिचा क्रांतिकारक प्रियकर. वेगवेगळ्या स्वभावांच्या,व्यक्तिमत्त्वांच्या; वेगवेगळ्या थरांतल्या या व्यक्ती लूर्दला गोळा होतात आणि सुरू होतं एक उत्कंठापूर्ण , काहीशी रहस्याची छटा असणारं नाट्य. श्रद्धा, अंधश्रद्धा यांच्यांतील द्वंद्वाच्या आधारे उलगडत जाणारी कहाणी. श्रद्धेचा आणि धर्माचा ‘वापर’ आणि ‘व्यापार’ करुन घेण्याची वृत्ती सार्वत्रिकच असते. म्हणूनच ‘द मिरॅकल’ वाचून विसाव्या शतकाच्या अखेरीस मराठी वाचक आपले विचार, आपला धर्म आणि आपलं राष्ट्र यांबाबत अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा नव्यानं मांडणी करील, असं वाटतं.
-
Timirpanthi (तिमिरपंथी)
‘तिमिरपंथी’ ही कादंबरी चौर्य या कलेच्या आधारे आयुष्य कंठणाऱ्या जमातीतील कलाकारांवर बेतली आहे. पोटापाण्यासाठी गावोगावी वसती (दंगा) हलवणाऱ्या भटक्या जमातीतील मुख्यत्वे सती आणि तिच्या अनुषंगाने येणाNया व्याqक्तरेखांभोवती ही कादंबरी फिरते. ही सती उपजत कलाकार आहे. ‘ही’ कला अंगी घेऊनच ती जन्माला आली आहे. आईकडून गौरवर्णी लावण्य आणि पित्याकडून कामगिरीतलं कसब तिला लाभलं आहे. ती जिज्ञासू, चौकस आहे. धाडसी तर आहेच. समयसूचकता आणि प्रसंगावधानही तिच्याकडे आहे. ऐकलेल्या गोष्टींवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता तिच्यात आहे. तिची मतं तर्कसंगत असतात. वस्तीतल्या अपंग मुलीवर मायेचा पदर पसरणारा कनवाळूपणा तिच्यात आहे. शिक्षणाच्या अभावामुळे आपला समाज उपेक्षित आहे, शोषित आहे, भटका आहे, याची तिला जाणीव आहे. स्थिर समाजाच्या प्रवाहात येण्यासाठी संस्कारक्षम शैशवात शिक्षणाची रुजुवात व्हायला पाहिजे अशी तिची धारणा होते. अशा या सतीची कहाणी वाचूनच अनुभवायला हवी.
-
Red Tape (रेड टेप)
सरकारी अधिकारी ही उपाधी भारदस्त वाटत असली तरी सत्ताधारी, विरोधक, प्रसार माध्यमे, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक घटकांसाठी खरे तर ते ‘सॉफ्ट टार्गेट’ असते. कारण, कोणत्याही चांगल्या कामाचे श्रेय जाते सरकारकडे आणि काम बिघडले तर खापर मात्र फोडले जाते प्रशासनावर. संबंधित निर्णय किंवा योजना चांगली होती, पण प्रशासन कुचकामी ठरल्याने त्याची वाट लागली असा सर्वसाधारण मतप्रवाह असतो. अशी टिप्पणी करणे सोपे असले तरी प्रत्यक्षात विविध प्रकारच्या दबावांना, राजकारणाला, हितसंबंधियांच्या कट-कारस्थानांना तोंड देत आणि अनेकविध लाभांना तसेच आमिषांना दूर लोटत निर्णयाची अंमलबजावणी करणे महामुष्किल काम. शिवाय हे करताना सतत प्रशासनाच्या मजबूत पोलादी चौकटीचे भानही बाळगावे लागते. साहजिकच बहुतेकजण प्रवाहप्रतीत होत सत्ताधाऱ्यांचे वा वरिष्ठांचे ‘होयबा’ होणे पसंत करतात आणि स्वत:चे उखळही पांढरे करून घेतात. मात्र काही जिगरबाज अधिकारी प्रशासकीय यंत्रणेत राहूनच या अ-व्यवस्थेविरोधात झगडा पुकारतात. व्यापक जनहीत डोळ्यासमोर ठेवून न्याय्य हक्कांसाठी झगडणाऱ्या अशा मोजक्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जिवावरच प्रशासनाचा गाडा पुढे सरकत असतो. दोन दशकांहून अधिक काळच्या पत्रकारितेत या सगळ्याची जवळून झालेली ओळख आणि सुमारे पावणेदोन वर्षे मंत्रालयात राजपत्रित अधिकारी म्हणून काम करताना ‘आतून’ घेतलेला प्रत्यक्ष अनुभव याची गुंफण करत एका वेगळ्या विषयाची केलेली ही मांडणी..
-
Dhana (धना)
"धना...तरुण पहिलवान. सर्जेराव या तालेवाराच्या मुलीवर राजलक्ष्मीवर प्रेम. धनावर वाघाचा हल्ला. गंभीर जखमी अवस्थेत धना वाघाला ठार मारतो. इस्पितळात उपचार घेत असताना त्याचं एका देशप्रेमी गुप्त फौजेकडून अपहरण. देशसेवेसाठी धनाला फौजेचं राजेपद देण्याची तयारी; मात्र त्याने घराचा आणि राजलक्ष्मीचा त्याग करण्याची अट. इकडे वनखात्याचा अधिकारी सूर्याजी गावात दाखल. सूर्याजीचं राजलक्ष्मीवर प्रेम; पण धनाच्या आणि तिच्या प्रेमाबाबत समजल्यावर त्या दोघांना एकत्र आणण्याचा निश्चय. धनाबाबत आणि त्या गुप्त फौजेबाबत सगळ्यांना कुणकुण लागते. फौजेची गुप्तता धोक्यात येते. त्यामुळे राजलक्ष्मी आणि सूर्याजीला संपवण्याचा फौजेचा निर्णय. त्यानंतर राजलक्ष्मीचं अपहरण. राजलक्ष्मीचं अपहरण कुणी आणि का केलेलं असतं? सूर्याजी त्या दोघांना एकत्र आणण्यात यशस्वी होतो का? सर्जेराव आणि सूर्याजीला फौजेचा ठावठिकाणा लागतो का? त्यांना धनाबाबतचे सत्य समजते का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ‘धना’ ही उत्कंठावर्धक कादंबरी जरूर जरूर वाचली पाहिजे. "
-
Nana Ani Mahadaji (नाना आणि महादजी)
राजकारणमुत्सद्दी नाना फडणीस आणि समशेरबहाद्दर महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील कर्तबगार पुरुष होते. खरेतर या दोघांच्या कार्य-कर्तृत्वामुळेच संपूर्ण हिंदुस्थानात मराठे प्रबळ झाले व मराठेशाही कळसाला पोहोचली! या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयाqक्तक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी! अर्थात, या दोघांची राजकीय कारकीर्द सुमारे पन्नास वर्षांइतकी प्रदीर्घ असल्याने, ही केवळ त्यांच्या कामगिरीची झलक म्हणावी लागेल. कारण या कादंबरीमध्ये सन १७७२ ते १७८४ असा एका तपाचाच काळ आला आहे.
-
Guardian (गार्डिअन)
संगणकामुळे पूर्णपणे पेपरलेस झालेल्या विश्वात जेव्हा परत हाताने लिहिण्याचा शोध लागतो... एखादा शास्त्रज्ञ मंगळावर राहून डीएनएचं संशोधन करत असताना तिथेच त्याला साहाय्य करणाऱ्या मुलीशी विवाहबद्ध होतो... एखाद्या रोबोटमध्येही मानवी भावना जागतात... एखादा महासंगणक तीन अभियंत्यांना डांबून ठेवतो... हवामानातील बदलांच्या अचूक अंदाजांसाठीची थेअरी एक रोबोट एका शास्त्रज्ञाला सांगतो... लकुलीश ग्रहावरच्या स्त्रियांनी पृथ्वीवर महिलांची आंतरपृथ्वीय स्पर्धा घेण्याचं ठरवल्यावर चंद्रावर राहणाऱ्या स्त्रिया नाराज होतात... एम्ब्रायो बँकेच्या साहाय्याने आई बनून आपल्या मुलीला रोबोटच्या हवाली केलेल्या स्त्रीचं मातृत्व जागं होतं...अशा विविध वैज्ञानिक संकल्पनांना मानवी भावभावनांचा साज चढवून लिहिलेल्या रोचक आणि वाचनीय कथांचा संग्रह ‘गार्डिअन.’
-
Bedhunda (बेधुंद)
‘बेधुंद’ ही जयंत, अक्षय, सुरेश, समीर आणि अण्णा (फाइव्ह स्टार्स) या पाच मित्रांची कहाणी आहे. एकाच कॉलेजमध्ये शिकणारे हे पाच जण वसतिगृहात राहत असतात. या पाच तरुणांच्या निमित्ताने कॉलेज जीवनाचा वेध या कादंबरीतून घेतला आहे. जया आणि हर्षलाच्या निमित्ताने आंतरजातीय विवाहाला होणारा विरोध, या पाच जणांवर सुरुवातीला सीनिअर्सकडून झालेल्या रॅगिंगच्या चित्रणातून रॅगिंगचा प्रश्न, अक्षा आणि सोनिया आणि अन्य मुलामुलींच्या माध्यमातून ‘सेक्स’चा अनुभव, या पाचही जणांच्या दारू पिण्यातून व्यसनाधीनता, सुऱ्या आणि पिया यांच्यात होणारं सेक्स चॅटिंग, काही उत्सव साजरे करत असताना विद्याथ्र्यांमध्ये जातीयवादावरून झालेली भांडणे इ. विषयांचं वास्तव चित्रण या कादंबरीतून केलं गेलं आहे. कॉलेज जीवनाची ही काळी बाजू समाजावरही विघातक परिणाम करू शकते, असा गर्भित इशारा या कादंबरीतून मिळतो. तेव्हा कॉलेज जीवनातील हे दाहक वास्तव जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचली पाहिजे.
-
Rikta (रिक्त)
‘रिक्त’ या कथासंग्रहात वेगवगळ्या कारणांमुळे भावनांच्या आवर्तात सापडलेल्या व्यक्तिरेखांच्या मनाचं सूक्ष्म दर्शन घडविणाऱ्या कथा आहेत. परिाqस्थतीशरण, कोणता ना कोणता सल मनात बाळगत जगणारी किंवा एखाद्या घटनेने जीवनात उलथापालथ झालेली अनेक माणसं ‘रिक्त’ या कथासंग्रहातून भेटतात. मग समलिंगी आकर्षणातून मुलीने एखाद्या मुलीशी लग्न करण्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेली ‘जोडीदार’ कथेतील डॉ. मीरा असेल किंवा एका तरुण मुलाच्या अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरलेला ‘वाट’ कथेतील शिंदे ड्रायव्हर असेल, नवऱ्याच्या संशयीपणाचं भूत मानगुटीवर असहायतेने वागवणारी ‘अस्तित्व’ कथेतील उज्ज्वला असेल किंवा सावत्रआईमुळे वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली ‘समाधान’ कथेतील कमू असेल. या कथा मनोविश्लेषणात्मक असल्या तरी त्या वाचकाची उत्कंठा वाढवत राहतात. व्यक्तिरेखांचं मनोविश्लेषण आणि ओघवती, लालित्यपूर्ण भाषा या बलस्थानांसाठी वाचकांनी हा कथासंग्रह मुळातून वाचावा असा आहे. वाचनीय आहे.
-
Mughal Sattecha Saripat (मुघल सत्तेचा सारिपाट)
मुघल सत्तेचा सारिपाट ही कादंबरी सत्ताग्रहण, श्रद्धा आणि जीवनाचे सार-समाधान यासंबंधीच्या प्रश्नांचा लेखणीच्या लालित्यपूर्ण फटकाऱ्याद्वारा धांडोळा घेते. या कादंबरीमध्ये त्या काळातले गुंतागुंतीचे राजकारण, दगाबाज़ मुघल, आणि वासना, वारुणी आणि अफूच्या नशेमध्ये मश्गूल असलेल्या व्यक्तींचे रेखन आहे. तसेच शिकारीच्या नावाखाली निष्पाप माणसांना आणि मुक्या प्राण्यांनादेखील सोसाव्या लागणाऱ्या जीवघेण्या छळाचे वर्णनदेखील आहे. सत्ताकारणाच्या जीवघेण्या स्पर्धेसह मुघल कालखंडाचे अतिशय चांगले चित्रण या कथानकातून उलगडते.
-
Sarja (सर्जा )
सर्जा’ हे एका बैलाचं आत्मकथन आहे. या आत्मकथनाची सुरुवात एका करुण प्रसंगाने होते. सर्जा, त्याचा जोडीदार राजा आणि त्यांची (विशेषत: सर्जाची) जोडीदारीण खिलारी यांची ताटातूट होते. त्यांच्या मालकाने दुष्काळामुळे आणि ते म्हातारे झाले म्हणून त्यांना विकलेलं असतं. त्या तिघांनाही एकाच टेम्पोमध्ये घातलेलं असतं; पण खिलारीला मध्येच उतरवलं जातं आणि सर्जा-राजाची रवानगी एका कत्तलखान्यात केली जाते. सर्जा कसाबसा तिथून निसटतो. सर्जाचं आधीचं नाव असतं शंभू; पण त्याचा मालक त्याला विकतो आणि दुसरा मालक त्याचं नाव ठेवतो...सर्जा. तिथेच त्याची राजाशी आणि खिलारीशी भेट होते. सर्जा आणि खिलारीमध्ये प्रेम निर्माण होतं. काही काळाने मालक सर्जा-राजा-खिलारी यांना विकून टाकतो. कत्तलखान्यातून पळालेल्या सर्जाची उपाश्या नावाच्या माणसाशी भेट होते. उपाश्या सर्जाला नंदीबैल करतो आणि पैसे मिळवायला लागतो. उपाश्याबरोबर भटकंती करत असताना अचानक एके दिवशी सर्जाची गाठ खिलारीशी पडते. कालांतराने सर्जा आणि खिलारीचं वय लक्षात घेऊन उपाश्या त्या दोघांना गाय-बैलांचा प्रेमाने सांभाळ करणाऱ्या एका संस्थेत नेऊन सोडतो. तर असं हे ‘सर्जा’चं भावपूर्ण आत्मकथन वाचनीय आणि मनाला भिडणारं आहे.