-
Rahul Virchit Mahabhartatil Ufarata Ghatotkachha (
राहुल गांधी हे काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्यामुळे काँग्रेसचा कसा ऱ्हास होईल, त्याचे भाकित भाऊंनी सातत्याने केले होतेच. पण राहुल काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर ते काँग्रेससोबत पुरोगामी पक्षांचाही कपाळमोक्ष घडून आणणार; हे भाकित नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीने अचूक खरे ठरवले आहे. त्याचाच आलेख म्हणजे हे पुस्तक होय.
-
Bhedile Suryamadala (भेदिलें सूर्यसमंडळl)
आदर्श लोकनेतृत्व, नि:स्वार्थ समाजकारण आणि प्रपंचाभिमुख परमार्थ ही समर्थ रामदासांच्या विचारधारेची मूळ त्रिसूत्री. ती जाणून घेणे व जाणवून देणे ह्या विचाराने लिहिली गेलेली ही समर्थ रामदासस्वामींच्या जीवनावरील कादंबरी.
-
Hari Hari Vitthal Vitthal (हरी हरी विठ्ठल विठ्ठल)
अवती-भवती घडणाऱ्या कौटुंबिक, सामाजिक, राजकीय घटनांचा परिणाम इतरांवर होतो तसा माझ्यावरही होतो. या घटनांवर मला काही बोलल्याशिवाय राहवत नाही. मी लेखनातून बोलतो. उदाहरणार्थ- 'लिव्ह इन रिलेशनशिप' म्हणजे तरुण- तरुणींनी लग्नाशिवाय कंत्राटी पद्धतीने एका छपराखाली राहणे. श्रीमंतांची किंवा राजकीय वरदहस्त असलेली तरुण पोरे दारू पिऊन, बेफाम वेगाने कार चालवून फुटपाथवरची माणसे चिरडतात, राजकीय लागेबांधे असलेले सावकार कुळांना नाडतात व त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आणतात. लग्नाची वचने देऊन पुरुष स्त्रीला फसवतात, शिकली-सवरलेली माणसे बुवाबाजीला बळी पडतात, कौटुंबिक वाद व गैरसमज यामुळे भांडणे धुमसतात व आत्महत्येपर्यंत पोहोचतात, चांगल्या घरातील मुले अपघाताने गुन्हेगारी विश्वात ओढली जातात, ऑफिसातील स्त्रियांची लैंगिक छळवणूक, स्त्री-भ्रूणहत्या, डॉक्टरांकडून होणारी सहकारी गृहसंस्थांची पिळवणूक अशा विषयांवरच्या बातम्या मी वाचतो, पाहतो व ऐकतो. हे विषय न संपणारे आहेत. १९९२ साली, नोकरीतून निवृत्त झाल्यावर साठाव्या वर्षापासून, या चिरंजीव विषयांवर, २०२३ या चालू वर्षापर्यंत म्हणजे वयाच्या ९१ वर्षांपर्यंत मी कथा लिहितो आहे. माझ्या कथा कालबाह्य होत नाहीत. कारण गैरप्रकार वेष पालटून पुन्हा पुन्हा जन्म घेतात. माझ्या कथांची अखेर मी आनंददायी करतोच करतो. मला रडवणाऱ्या कथा लिहिताच येत नाहीत. ही माझी लेखनमर्यादा मला मान्य केलीच पाहिजे!
-
Vedanech Gana (वेदनेच गाणं)
द्वारकानाथ संझगिरी यांचा एक आजवरच्या लिखाणापेखा वेगळा असा हा कथा संग्रह, आपल्या भोवती घडणाऱ्या दृश्य , अदृश्य अनुभवांना आपल्या अस्सल संझगिरी लेखणीतून टिपून मांडलेल्या आणि रंजनाबरोबर डोक्याला जाणिवेची चालना देणाऱ्या या कथा
-
Pravah Maza Sobati (प्रवाह माझा सोबती)
नर्मदा परिक्रमा म्हटलं की ती पायीच करायची आणि ज्यांनी ज्यांनी पायी परिक्रमा केली त्यांच्यापैकी काहींनी यावर पुस्तकेही लिहिली. त्यामुळे नर्मदा परिक्रमा करायची म्हणजे पायीच करायची अशीच भावना सर्वसामान्यांची झाली होती. अशाच प्रकारची भावना कैलास मानसरोवर यात्रेबद्दल ही पसरली होती. 2000 साली माझ्या मुलानं चि. अभयनं, त्याचा मित्र ऋषिकेश जोशी सोबत भारत सरकारनं आयोजित, कैलास मानसरोवर हिमालय मार्गे पदयात्रा केली होती. ती पदयात्रेची पद्धत नेपाळ मार्गे बसने कैलास मानसरोवर यात्रा सुरू होण्यापर्यंत चालू होती. कारण मी व माझी पत्नी प्रभा दोघेही नेपाळ मार्गे बसने (पायी नव्हे) 31 ऑगस्ट 2009 ते 13 सप्टेंबर 2009 अशी यात्रा केली. ती आकांक्षा पर्यटना तफेर् ! थोडक्यात सांगायचे म्हणजे नर्मदा परिक्रमा काय किंवा कैलास मानसरोवर परिक्रमा काय बस मार्गाची सोय झाल्यामुळे चालण्याचा त्रास वाटणार्यांना ‘बस प्रवासाचा’ पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या दोन्ही अवघड यात्रा बस प्रवासामुळे सुखदायक झाल्या आहेत. असंच म्हणायला हवं, नाही कां?
-
Anvat Watevaril Parytan Stale (अनवट वाटेवरील पर्यट
विविध वृत्तपत्रं आणि मासिकांमध्ये प्रसिद्घ झालेल्या अनोख्या पर्यटनस्थळांवरील लेखांचं संकलन या पुस्तकात करण्यात आलं आहे. ट्रॅव्हल कंपन्यांबरोबर न जाता, रुळलेल्या वाटांवर न वळता वेगळ्याच ठिकाणांची चाकोरीबाहेरची भटकंती करण्याची ज्यांना आवड आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे पर्वणी आहे. अशा भटक्यांना मार्गदर्शन करणारं आणि नव्या ठिकाणांची ओळख करुन देणारं हे पुस्तक आहे. ज्यांना प्रवासवर्णन वाचण्याची आवड आहे, अशांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव देणारं हे पुस्तक आहे. जम्मू-काश्मिरमधील नुब्रा खोरं, लडाखजवळील मॅग्नेट हिल्स, तवांग, लाहौल-स्पिती, कांगडाचे खोरे व किल्ला, पाँगचा जलाशय, हिमालचलमधील पाच शक्तीपीठं, नाको सरोवर, पराशर तळे, हिलस्टेशन नारकंडा, चांपानेर, विजापूर, उत्तराखंडमधील कटारमल सूर्यमंदिर, अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या, वैविध्यपूर्ण आणि वेगळ्या ठिकाणांची संपूर्ण माहिती या पुस्तकात वाचायला मिळते. त्या ठिकाणी कसं जायचं, तेथील महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक, तेथे जाण्यासाठी योग्य काळ, अशी उपयुक्त माहिती लेखक अरुण अग्निहोत्री यांनी या पुस्तकात दिली आहे.
-
Vegali Manse (वेगळी माणसे)
आपल्या आजूबाजूला किंवा इतिहासात अनेक अशी माणसं दडलेली असतात की ज्यांचं काम पुढील पिढीत अत्यंत प्रेरणादायी ठरतं पण ही माणसं प्रसिद्धी पासून लांब रहातात. त्यांची उपेक्षाही होते. या साऱ्यांचा परिचय नवीन पिढीसाठी करून दिला आहे
-
Aale Vartan Aapla Mendu(आपले वर्तन आपला मेंदू )
आपल्या मेंदूवर अवलंबून असते आपले वर्तन आणि आपल्या वर्तनाने आपला मेंदूही बदलू शकतो. मानवी वर्तन अनेक चलपदांवर (variables) आधारित असते. त्यातील सर्वांत महत्त्वाची चलपदे म्हणजे भावभावना. या अमूर्त भावभावना कोट्यवधी वर्षे उत्क्रांत झाल्या आहेत. अशा अमूर्त गोष्टींचा शोधविचार तत्त्वज्ञान, धर्म, ईश्वरशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य, कला या सर्वांनी केला आहे आणि करतही आहेत. अलीकडच्या काळात प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करून मानवी वर्तनावर प्रकाश टाकण्याचे काम विज्ञानानेही अंगावर घेतले आहे. विज्ञानाच्या या शाखेला वर्तनविज्ञान (Ethology) म्हणतात. जसजसा मेंदूविज्ञानाचा आणि त्याला पूरक व पोषक जैवतंत्रज्ञानाचा विकास होत गेला, तसतसा संशोधनाचा दिशाकोन बदलत गेला. मानवी भावभावनांची आणि पर्यायाने मानवी वर्तनाची पाळेमुळे मेंदूत असली पाहिजेत, या विज्ञानाच्या विचारधारेला बळकटी आली. मेंदूविज्ञानाबद्दल कुतूहल जागृत करणारे आपले वर्तन आपला मेंदू
-
Priy Palak (प्रिय पालक)
मुलांचं अडनिडं वय, हा पालकांचा परीक्षेचा काळ! मुलांना स्वत:ची मतं पुâटतात, आणि ती समजून घेताना, पालकांना घाम पुâटतो. पालकांना वाटणारी आस्था, ही मुलांच्या दृष्टीनं लुडबूड! पालकांनी केलेल्या सूचना, ही मुलांच्या नजरेत हुकुमशाही! संवादासाठी सुरु केलेलं बोलणं, हमखास विसंवादाचं वळण घेतं. हा तिढा सोडवायचा कसा? प्रक्रिया सोपी नाहीच, पण प्रयत्नसाध्य नक्की आहे. त्यासाठी सादर आहे, प्रिय पालक एका बालरोगतज्ज्ञ समुपदेशिकेचे अनुभवाचे बोल...