-
Rahasya Naganche ( रहस्य नागांचे )
आज तो देव आहे चार हजार वर्षापूर्वी तो फक्त एक पुरुष होता . शोध सुरूच आहे. अशुभसुचक नाग योध्याने त्याच्या मित्राला बृहस्पतीला ठार मारले आणि आता त्याच्या पत्नीच्या मागे तो हात धुवून लागला आहे. तिबेट हून आलेला शिव हा स्थलांतरित सैतानाचा संहार करणार असल्याचे भाकीत आहे. आपल्या राक्षसी शत्रूचा शोध घेतल्याशिवाय तो मुळीच थांबणार नाही , मित्राच्या मृत्यूचा सूड घेण्याची तळमळ आणि सैतानापर्यंत पोहोचण्याच्या मार्गाचा शोध या दोन गोष्टी आपल्याला नागांच्या दारापर्यंत पोहोचवतील, याची त्याला खात्रीच होती . द्वेषी सैतानाच्या उद्याचा पुरावा सर्वत्रच आढळतो . एका जादुई औषधावर अवलंबून असल्यामुळे एक राज्य मृत्यू पंथाला लागते . एका अन्भिशीक्ता राजकुमाराचा खून होतो . शिवाचे तत्वज्ञान विषयक मार्गदर्शक असलेल्या वासुदेवावर शिवाचा गाढ विश्वास असतो . मात्र द्रुष्टांचे सहाय्य घेऊन ते त्याचा विश्वासघात करतात . अगदी परिपूर्ण साम्राज्य वाटणारे मेलूहा सुद्धा जन्माचे शहर म्हणून ओळखल्या जाणऱ्या मैकाम मधील भयानक रहस्यामुळे मलिन झालेले असते. शिवाला अज्ञात असलेला मुख्य सुत्राधर एक मोठाच खेळ खेळत असतो. प्राचीन भारताच्या संपूर्ण सीमारेषांपर्यंत नेणारा प्रवास केल्यावर शिवाला प्रचंड गूढ गोष्टीनी भरलेल्या प्रदेशातील सत्याचा शोध लागतो आणि त्याला समजते की , जसे वाटत होते तसे तिथे काहीच नव्हते. भयानक युद्ध खेळली जतिल. आश्चर्यजनक फसव्या युती केल्या जातील . शिवावरील तीन पुस्तकांच्या मालिकेतील ' मेलुहाचे मृत्युंजय ' हे पहिले पुस्तक . त्याचाच पुढचा भाग असलेल्या या पुस्तकात अविश्वसनीय वाटणाऱ्या रहस्यांचा भेद होईल .
-
Connect The Dots ( कनेक्ट द डॉट्स)
'एमबीए'ची पदवी नसतानाही ज्यांनी आपला मार्ग तर शोधलाच, पण अनेकांना रोजगार देणारे मोठे उद्योग उभारले. एक एक बिंदू जोडत ज्यांनी मोठी झेप घेतली आहे अशा उद्योजकांची ही कहाणी. "स्टे हंग्री स्टे फुलिश' या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका व "जस्ट अनदर मॅगझीन' या युवाविषयक मासिकाच्या संपादिका रश्मी बन्सल यांचे हे पुस्तक. आरती कदम यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. पुण्यातील भारत विकास ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड यांच्यापासून "रेवा' या इलक्ट्रिक मोटारीचा निर्माता चेतन मायणी यांच्यासारख्या वेगळ्या उद्योजकांची कहाणी येथे आपल्यासमोर येते.
-
Jeevan Fanda(जीवन फंडा)
शिखरावर पोहचण्याचा मार्ग... जीवनात संघर्ष आहे. कमालीची स्पर्धा आहे. या सगळ्यातुन मार्ग काढीत आपल्याला आनंद मिळवाय़ाचा आसतो. त्यासाठी गरज आहे सकरात्मक विचारांची. प्र्यतेक गोष्ट आपल्या मनाप्रमाने घडेलच असे नाही. चढ़उतार, भरती- आहोटी सुरूच असते. जीवनात आणि व्यवसायातील स्पर्धेमुळॆ अनेकदा निराशेच्या सावल्या मनात वादळ निर्माण करतात. मुळ ध्येयापासून आपण दूर जात आहोत ही भीती छळते व विजयाचा मार्ग आपण स्वत:च हरवून बसतो. 'जीवनफंडा ' आहे, आनंदी, सकारात्मक, तनावमुक्त व यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारी हमखास 'गुरुकिल्ली'. निराशेच्या सावल्या धूसर करून यशस्वी जीवनाचा प्रकाश दाखवणारॆ शिखर गठान्यासाठी सकारात्मक, पायरीचे महत्व संगणारा, व्यावसायिक आणि भावनिक नात्याना नवा आधार देणारा हा जीवनफंडा सांगितला आहे- प्रख्यात मॅनेजमेंट तज्ञ, कॉर्पोरेट ट्रेनर व सिद्धहस्त लेखिका स्वप्ना पाटकर यांनी.
-
Dhyasparva(ध्यासपर्व)
रावसाहेबांच्या जीवनाचा आलेख प्रामुख्याने संघर्ष आणि लढे यांनीच चितारलेला आढळून येतो. जे मनाला आणि बुद्धीला भावले, त्याची सदोदित पाठराखण केली. जे भावले नाही, त्याच्या विरोधात परिणामाची क्षिती न बाळगता उभे ठाकले. फुले, गांधीजी आणि कर्मवीर अण्णाना अभिप्रेत असणारी समाजिक व्यवस्था निर्माण करण्याचा जीवनभर ध्यास घेतला. या ध्यासापोटी सत्ता आणि मत्ता यांच्यापासून जाणीवपूर्वक आणि निग्रहाने दूर राहिले. इतकेच नाही तर सर्व समाजिक आणि शैक्षणिक कार्यांत कोणाकडून पै - पाव आण्याची अपेक्षा न करतना पदरमोड करून तनमनधनाने सहभागी झाले. एका ध्येयवादी, संवेदनशील व्यक्तीने जीवनातील अनुभूतींचे केलेले कथन.
-
The Other India
India has many 'Bharats' in it like 'urban' India, 'rural' India; 'village' India is again different from 'farmers' India. There is another different India of those who have no place of their own which they might call their 'home'; nor do they have any dates of their birth and death in any official rural or municipal register.They are forced to live beyond the borders of the villages and towns suffering deprivation. A need to understand with empathy their lives is the inspiration behind this book. The readers will have a glimpse of life of these people who are also a part and parcel of our national ethos.
-
Tejshalaka-Irena Sendler(तेजशलाका- इरेना सेंडलर)
नाझी भस्मासुर हिटलर आणि त्याच्या अनुयायांचा हिंस्त्र व क्रूर नंगानाच चालू असताना तब्बल अडीच हजार ज्यू बालकांचा प्राण वाचवणार्या शूर महिलेची ही गोष्ट. इरेना सेंडलर या त्या तेजस्वी महिलेचे अलीकडेच निधन झाले. ती मावळतीकडे जात होत होती तसतसे तिचे दुसर्या महायुद्धातले हे अलौकिक शौर्य जगाला कळत गेले. ही ओघवती कहाणी श्वास रोखून धरायला लावते. दुसर्या महायुद्धाच्या छळछावणीतून अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविण्याचे अद्वितीय कार्य करणार्या पोलिस महिला इरेना सेंडलर यांची स्फूर्ती देणारी कहाणी 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे वरिष्ठ उपसंपादक अभिजीत थिटे यांनी या पुस्तकात कथन केली आहे ..... दुसर्या महायुद्धाचा काळ, पोलंड पुन्हा एकदा पारतंत्र्यात गेलं, रशिया आणि जर्मनीनं पोलंडचे लचके तोडले. नाझी सेना पोलंडमध्ये घुसल्या आणि सुरू झालं एक विनाशपर्व, मानवी इतिहासातील सगळ्यात काळाकुट्ट अध्याय याच काळात रचला गेला. ज्यूंचं शिरकाण सुरू झालं. वॉर्सा घेटोमध्ये लाखो ज्यूंना कोंडून ठेवलं होतं. पोलंडमधील छळछावण्या रोज हजारो ज्यूंना जाळत होत्या. घेटोमध्ये दरमहा किमान पाच हजार ज्यू मृत्युमुखी पडत होते. लहान मुलांना फूस लावून पळवून नेलं जात होतं. त्यांच्यावर वेगवेगळे वैद्यकीय प्रयोग करून पाहिले जात होते. सगळीकडे अंधार दाटून आला होता. सूर्य उगवेल की नाही, अशीच शंका वाटत होती. अशा वेळी एक पणती धीटपणे उभी राहिली. या अंधाराला भ्यायलेलेल्यांना धीर देत राहिली. त्या पणतीचं नाव होतं इरेना सेंडलर. स्वत:च्या जिवाचा विचार न करता अडीच हजार ज्यू मुलांना नाझींच्या तावडीतून वाचविणारी धीट आई. नाझींच्या छळाला तोंड देत, स्वत: मृत्यूच्या दारी पोहोचलेली असतानाही मानवता धर्माचाच विचार करणारी अखिल मानवतेची आई.
-
Giving(गिव्हिंग)
या पुस्तकातून राष्ट्रपति क्लिंटन यांची सार्वजनिक सेवा, कॉर्पोरेट आणि व्यक्तिगत पातळीवरील सक्रियता प्रेरित करते. या पुस्तकातून त्यांनी जगातील अनेक उल्लेखनीय संस्था, उल्लेखनीय गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. तसेच ते असा संदेश देतात की प्रत्येक व्यक्तीने समाजात बदल घडावा म्हणून वय, वेळ, पैसा हे गृहीत न धरता झटले पाहिजे.