-
Apurva Aloukik Ekmev (अपूर्व अलौकिक एकमेव)
महान अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही मोठ्या असणाऱ्या सुलोचनाबाई, अभिजात कविता लिहिणारी बाल कवयित्री समृद्धी केरकर, अभिनेत्री-लेखिका प्रिया तेंडुलकर, सामाजिक जाणीव असलेले, धडपडे नरेंद्र काटकर (यशोधराताईंचे वडील), लग्नानंतरही यशोधराताईंच्या शिक्षणाला पाठिंबा देणारे त्यांचे सासरे गजानन भोसले, साहित्य-कला क्षेत्रातील लोकांशी नातं जुळवायला शिकवणारे थोर साहित्यिक रणजित देसाई, एक मनस्वी कलावंत आणि तेवढाच मनस्वी माणूस डॉ. काशिनाथ घाणेकर, अतिवास्तववादी कथाविश्वातून भेटणारा राही अनिल बर्वे, अभिनेता प्रशांत दामले आणि त्यांचे कुटुंब...या आणि अन्य व्यक्तिरेखांचे अंतरंग आणि बहिरंग सूक्ष्मतेने उलगडणारा, यशोधरा काटकरांच्या लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह.
-
The Last Girl (द लास्ट गर्ल)
नोबेल शांतता पुरस्कार विजेतीची कहाणी़...नादिया मुराद ही अत्यंत धाडसी यजिदी तरुणी आहे. तिनं इसिसची लैंगिक गुलामगिरी सोसली आहे. तिनं कल्पनातीत यातना आणि अपमान भोगला आहे. नादियाच्या सहा भावांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्यानंतर काही काळातच, तिच्या आईलाही ठार मारण्यात आलं. त्यांचे मृतदेह सामूहिक कबरींत लोटण्यात आले...पण तिनं लढा दिला...इराकमधील तिचे बालपणीचे शांततामय दिवस... घरच्यांचा कायमचा वियोग आणि अमानुषतेचा सामना... ते जर्मनीत लाभलेली सुरक्षितता यादरम्यानचा प्रवास या आत्मकथनातून उलगडत जातो.
-
Emotional Intelligence... (इमोशनल इंटेलिजन्स)
आपल्या भावना ओळखून त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं, हा या प्रक्रियेचा गाभा आहे. खचलेला स्वाभिमान, भावनिक नियंत्रण, ताणाचं नियोजन, नैराश्य आणि अतिचिंता या बाबींकडे विशेष लक्ष देत, प्रचंड भीती, अस्वस्थता, आरोग्याविषयी अति काळजी, समाजात वावरताना येणारं अतीव दडपण, तसंच ऑबसेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर किंवा अतिरेकाला बळी पडणं या बाबींसाठी लेखिका कसं काम करते, याविषयी या पुस्तकात विवेचन केलं आहे.
-
Swayampreranetun Dhyeypurtikade (स्वयंप्रेरणेतून ध
जर तुम्हाला स्वयंप्रेरित कसं व्हायचं आणि इतरांसाठी प्रेरणास्रोत कसं ठरायचं हे शिकायचं असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे. एनएलपी व्यावसायिक, कामगिरी उंचावण्यासाठी मदत करणारे प्रशिक्षक आणि प्रेरणा आणि रोजगार या क्षेत्रातील अतिशय कुशल असे पत्रकार असलेल्या फ्रान्सिस कूम्बस यांनी तो लिहिला आहे. अनुसरण्यासाठी अतिशय सोपे असणारे आणि तुमच्यासाठी प्रेरक ठरणारे तज्ज्ञांचे सल्ले या ग्रंथातून मिळतील. अतिशय सोपी आणि परिणामकारक तंत्रे सांगितली आहेत, जी तुम्हाला कोणतीही आव्हाने झेलण्यासाठी मदत करतील. स्वत:ची ध्येये ठरवून ती ओलांडून पैलपार जाण्यासाठी आणि एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठीचं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.
-
Aambi (आंबी)
आंबी...बाप्पाजींची देखणी, आईवेगळी, लाडकी मुलगी... बाप्पाजींची बहीण नको नको म्हणत असताना बाप्पाजी तिच्या मुलाशी, श्रीरंगशी आंबीचं लग्न लावून देतात... श्रीरंग नपुंसक आहे हे कळल्यावर आंबी माहेरी निघून येते...तिचं दुसरं लग्न करायला बाप्पाजी तयार नसतात...पण काही घटना अशा घडतात की बाप्पाजी आंबीशी अबोला धरतात, तिला सासरी धाडतात...श्रीरंग आंबीला मारझोड करतो...आंबी परत माहेरी येते...परत बाप्पाजी तिचा रागराग करतात...गणूआप्पा तिला अनूमावशीकडे नेऊन सोडतात...मावशी तिचं लग्न तुकाराम ड्रायव्हरशी लावून देते...तुकाराम व्यसनी, जुगारी असतो...आंबीला मारहाण करत असतो...तालेवार घरातली आंबी बेकरीत काम करायला लागते...तिला मुलगी होते...तुकाराम जेव्हा आंबीची अब्रूच डावावर लावतो तेव्हा ती मुलीसह त्या घरातून पोबारा करते...पुढे काय होतं आंबीचं? एका स्त्रीच्या जीवनाचं हृदयस्पर्शी तरीही तेजस्वी दर्शन.
-
The Stonehenge Legacy (द स्टोनहेंज लेगसी)
एका माणसाचा बळी देण्यात येतो, एक बुद्धिमान पुरातत्त्व शास्त्रज्ञ आत्महत्या करतो, अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षाची मुलगी तिच्या प्रियकरासह बेपत्ता होते... या तीनही घटनांचा परस्परांशी संबंध आहे...आत्महत्या केलेल्या पुरातत्त्व शास्त्रज्ञाचा मुलगा गिडियनला माणसाचा बळी देणाऱ्या गूढ पंथाची सगळी माहिती मिळते...या तीनही घटनांचा तपास करणारी सीआयडी इन्स्पेक्टर मेगन बेकर या तीन घटकांमधील परस्परसंबंध शोधून काढते... स्टोनहेंज येथील पवित्र शिळा, त्यांच्याभोवती असलेला देवांचा (सेक्रेड्सचा) वास, तो वास तिथे चिरंतन राहावा म्हणून गूढ पंथातील लोक देत असलेले बळी...अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांच्या मुलीला ते बळी द्यायचं ठरवतात... दरम्यान, केटलीनच्या शोधासाठी पोलीस, सीआयडी आणि एक खासगी गुप्तहेर संघटना कसून तपास करत असतात...गिडियनही तिच्यापर्यंत पोहोचतो आणि तिच्या सुटकेचा प्रयत्न करतो... गिडियन तिच्यापर्यंत कसा पोहोचतो...तो तिची सुटका करण्यात यशस्वी होतो का... एक थरारक, रहस्यमय कादंबरी
-
Khaki Files (खाकी फाइल्स)
‘खाकी फाइल्स’ हे नीरज कुमार यांच्या कारकिर्दीतील काही मोठ्या प्रकरणांची आणि त्यांच्या पोलीस तपासाची रंजक माहिती पुरवणारं पुस्तक. यात देशातील सर्वांत मोठ्या लॉटरी घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यापासून ते तहलका प्रकरणातील दोन पत्रकारांना ठार मारण्यासाठी आयएएसने आखलेला कट उधळून लावण्यापर्यंत अनेक प्रकरणांचा समावेश आहे. इतर वेळी टीकेचे धनी होणाऱ्या भारतातील पोलीस दलाच्या चमकदार कामगिरीवर प्रकाश टाकणारं हे पुस्तक वाचणं खरंच वेगळाच अनुभव देणारं ठरेल.
-
Sakaratmak Jagnyachya Sahaj Marg (सकारात्मक जगण्या
‘सिंपल स्टेप्स टू पॉझिटिव्ह लिव्हिंग’ हे जेनी हेअर यांचं पुस्तक, सकारात्मक राहून आपलं आयुष्य अधिक संपन्न कसं करावं, याचं मार्गदर्शन करतं. प्रस्तुत पुस्तकामध्ये जेनी यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव प्रतिबिंबित होतो. कोणत्या पद्धतीने आयुष्य जगल्यास आपल्याला आयुष्याचा आनंद घेता येईल, हे त्या सांगतात. शिवाय आपले व आपल्या प्रियजनांचे आयुष्य कसे समृद्ध करता येईल, यासाठी अत्यंत उपयुक्त व व्यावहारिक सल्ले देतात. स्वतःच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक बदल कसा घडवून आणायचा हे तर त्या सांगतातच; त्याचबरोबर आपल्या कामाचा/व्यवसायाचा आनंद आपण कोणत्या रीतीने घेऊ शकू, याविषयीही सविस्तर विवेचन करतात. हे सगळं मार्गदर्शन त्यांनी अतिशय ओघवत्या भाषेत केलं आहे. उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन.
-
Vedh Amuchya Itihasacha (वेध अमुच्या इतिहासाचा)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम, सेनापती संताजी घोरपडे या चरित्रग्रंथांशिवाय डॉ. जयसिंगराव पवारांनी मराठेशाहीच्या कालखंडावरील अनेक ग्रंथांना आपली विद्वत्तापूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. त्यांच्या संशोधन विषयातील विविधता, त्यातून उलगडत जाणारा प्रदीर्घ पट, त्याचे विश्लेषण करतानाची त्यांची बहुआयामी दृष्टी, तसेच भाषिक शैली व ऐतिहासिक संदर्भ यांचा सुयोग्य मिलाफ याची अनुभूती त्यांच्या या प्रस्तावनांच्या संकलनातून येते. या प्रस्तावनांनी इतिहासातील अनेक अंधारे कोनाडे उजळले. त्या घटनेच्या आकलनाच्या वाटा बदलल्या. त्या व्यक्तिरेखांचं चौथं परिमाण मांडलं गेलं. जुन्या गृहितकांना टक्कर देण्यासाठी नव्या अस्मिता निर्माण झाल्या. आणि शेवटी त्यातून त्यांनी प्रबोधन हे अंतिम ध्येय सिद्ध केलं आहे. जयसिंगराव पवारांच्या निवडक प्रस्तावनांच्या संकलनातून घेतलेला इतिहासाचा वेध.
-
Lincoln (लिंकन)
अब्राहम लिंकन हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होतं. नेतृत्वगुण आणि अद्वितीय व्यवस्थापनकौशल्य हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वाचे पैलू होते. सदर पुस्तकात त्यांच्या या पैलूंवर विशेषत्वाने प्रकाश टाकला आहे. एक राष्ट्र घडविण्यासाठी जे नेतृत्वगुण आवश्यक असतात, उदा. संयम, ठामपणा, करारीपणा, उत्तम निर्णयक्षमता, विचारात असणारी एकवाक्यता, हे सगळे या महान नेत्याकडे होते. त्याचबरोबर सामान्य व्यक्तीच्या हक्कांविषयी ते जागरूक होते. सर्वसामान्यांविषयी त्यांना कळवळा होता. सदर पुस्तकात नेतृत्वगुण आणि व्यवस्थापनकौशल्य यांच्या अनुषंगाने येणारे लिंकन यांच्या जीवनातील अनेक प्रसंग अधोरेखित केले आहेत. आदर्श पुढारी आणि व्यवस्थापक बनण्याच्या दृष्टीने प्रत्येक प्रसंग हा काहीतरी शिकवण देऊन जाणारा आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांना आजही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक आहे.
-
Guntavnukbhan (गुंतवणूकभान)
आर्थिक गुंतवणूक हा विनाकारण किचकट बनवण्यात आलेला विषय आहे असं तज्ज्ञ मंडळी म्हणतात. सर्वसामान्य माणसाला चक्रावून सोडणार्या अनेक चित्रविचित्र संकल्पना, घाबरवून सोडणार्या कहाण्या, गुंतागुंतींनी भरलेल्या योजनांचे तपशील हे सगळं त्यात तर असतंच; पण खास करून गुंतवणूकदाराचा फायदा न होता संबंधित योजना चालवणार्या संस्था आणि मधली सल्लागार/दलाल मंडळी यांचा लखलाभ कसा होईल याकडे त्यात जास्त लक्ष दिलं जातं. खरं म्हणजे हा विषय अत्यंत सोपा आणि कुणालाही जमेल असा आहे. केवळ पाच गोष्टी ठरावीक क्रमाने केल्या तर त्यात आर्थिक विषयाचं अगदी जुजबी ज्ञान असलेला माणूसही चांगलं यश कमावू शकतो. याच्या जोडीला काही अत्यंत यशस्वी गुंतवणूकदारांविषयीही वाचायला मिळालं तर किती उत्तम होईल अशा विचारापोटी या पुस्तकात बेंजामिन ग्रॅहॅम, फिलिप फिशर, वॉरन बफे, जॉन टेम्पल्टन, पीटर लिंच, जॉन बॉगल विदेशी आणि राकेश झुनझुनवाला तसंच प्रशांत जैन या भारतीय लोकांच्या यशाच्या कहाण्या दिलेल्या आहेत.
-
Dusare Jagatik Mahayuddha (दुसरे जागतिक महायुद्ध)
पहिल्या महायुद्धानंतर दोस्त राष्ट्रांमुळे जर्मनीची दुर्दशा झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जर्मन तरुणांच्या मनात सुडाचा अंगार पेटला होता. अशा परिस्थितीत नॅशनल सोशालिस्ट जर्मन वर्कर पार्टीची स्थापना झाली. त्याचा पुढारी म्हणून हिटलरची निवड झाली. त्याने कपटाने जर्मनीचं अध्यक्ष आणि पंतप्रधानपद मिळवलं. त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. हॉलंड, बेल्जियम, इटली, आफ्रिका इ. अनेक राष्ट्रांचा युद्धात सहभाग होत गेला. ते युद्ध कशा तर्हेने झालं, कोणाची सरशी झाली, कोण हरलं, त्या त्या युद्धाचे त्या त्या देशावर, बेटावर किंवा एखाद दुसर्या शहरावर काय परिणाम झाले, या युद्धाशी संबंधित प्रमुख व्यक्तींनी (जर्मनचा राष्ट्राध्यक्ष हिटलर, इटलीचा पंतप्रधान मुसोलिनी इ.), त्यांच्या स्वभावानुसार, आजूबाजूच्या परिस्थितीनुसार त्या त्या वेळी घेतलेले निर्णय आणि त्यांचे झालेले चांगले/वाईट परिणाम, सागरी लढाई, विमानातून झालेली लढाई, जमिनीवरील लढाई अशा तीन प्रकारे झालेल्या लढाईचे आकडेवारीनिशी संदर्भ इ. माहिती इत्थंभूतपणे देणारं पुस्तक आहे ’दुसरे जागतिक महायुद्ध.’
-
Pahile Jagatik Mahayuddha (पहिले जागतिक महायुद्ध)
ऑस्ट्रियाच्या युवराजाचा बोस्नियन तरुणाने केलेला खून ही घटना पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरली. ऑस्ट्रिया आणि जर्मनी या दोन्ही देशांना ऑस्ट्रियाच्या युवराजाच्या खुनाचा आळ सर्बियावर आणून तो देश घशात घालायचा होता, तसेच रशियन रेल्वे पूर्ण होण्यापूर्वी फ्रान्स आणि रशिया या दोन्ही देशांशी युद्ध करून त्यांचा पराभव करायचा होता; पण ऑस्ट्रिया व सर्बियादरम्यान छोट्या प्रमाणावर सुरू झालेले हे युद्ध त्या दोन देशांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण युरोपभर पसरले. तसेच पुढे युद्धाची खुमखुमी, युद्धठास्त देशांना पाठिंबा आणि विरोध, या व अशा इतर अनेक कारणांमुळे त्या युद्धात तुर्कस्तान, इटली, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका आदी देशांचाही प्रवेश झाला. हे युद्ध जरी युरोपात झाले असले तरी जगातील बहुतेक सगळ्याच देशांना त्याची या ना त्या कारणाने झळ पोहोचली. पहिल्या जागतिक महायुद्धाची पार्श्वभूमी व कारणे, नानाविध कारणांमुळे त्यात सहभागी झालेले लहान-मोठे देश, लढाईचे वैविध्यपूर्ण प्रासंगिक वर्णन आणि परिणामांचा सार्थ आढावा.
-
Corpokshtera (कॉर्पोक्षेत्र)
महाभारताच्या कथेला आधुनिक साज चढवत व्यावसायिक पार्श्वभूमीवर ‘कॉर्पोक्षेत्र’ ही कथा घडते. त्यामुळे जुन्या हस्तिनापूर साम्राज्याचे रूपांतर ‘हस्तिनापूर एन्टरप्रायझेस’मध्ये होते. धृतराष्ट्र हा त्याचा अध्यक्ष बनतो. कृष्ण हा आधुनिक काळातला व्यवसाय सल्लागार म्हणून सामोरा येतो. वारणावत हे स्थळ ‘फॅमिली हॉलिडे होम`चे रूप घेते आणि हे सर्व नाट्य घडते ते व्यवसायातल्या भागभांडवलावर हक्क सांगण्यासाठी! हस्तिनापूर एन्टरप्रायझेसभोवती फिरणारं हे नाट्य महाभारतातील व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ट्यं कायम ठेवत घडतं. त्यामुळे महाभारतातील गुंतागुंत याही पुस्तकात प्रभावीपणे चित्रित झालेली दिसते.
-
Yashasvi Netrutva (यशस्वी नेतृत्व)
जगातल्या राजकीय आणि व्यावसायिक घडामोडींमधून आपल्याला नेतृत्वाचे महत्त्व उलगडते. जेव्हा ते नसते, तेव्हा सारे अस्ताव्यस्त होते. जेव्हा ते प्रेरित करते, तेव्हा गोष्टी सुधारतात. या पुस्तकाचा हेतू हा चांगल्या लोकांना मूळ तत्त्व सादर करून नेता होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. टप्प्याटप्प्याने प्रवेश करत, प्रशिक्षण आणि प्रयत्नांनी कौशल्य प्राप्त करण्याचा मार्ग हे पुस्तक दाखवते. नम्रपणा, अननुभव किंवा साशंकता जरी मार्गात येत असली, तरी कुणीही नेता बनू शकते. या पुस्तकात सांगितलेला हा सात दिवसांचा कार्यक्रम वाचकांना त्यांची बलस्थाने ओळखून त्यावर निर्भर राहण्याचे मार्गदर्शन करतो. तसेच तो त्यांच्या कमतरतांवर लक्ष केंद्रित करून त्यावर चांगल्या पद्धतीने मात करण्यास मदत करतो. तथापि, जबाबदारी अंगावर घेणे, हे कधीच सोपे नसते. आठवडाभराच्या या कार्यक्रमात प्रत्येक दिवशी नेतृत्वापुढील आव्हाने आणि फायदे यांचे स्वरूप विशद केले आहे.
-
Kasheer (कशीर)
काश्मिरच्या धगधगत्या होमकुंडाला कथात्म साहित्यात गुंफत ही कादंबरी देशातला एक महत्त्वाचा विषय कुशलतेने हाताळते. एके काळी भारतीय संस्कृतीचं समृद्ध स्थळ असलेलं काश्मीर तेजोहीन होऊन आज म्लेछ धर्मापुढे का शरणागत झालं आहे, या तपशिलाचा शोध ही कादंबरी घेते. बशीर अहमद, त्यांचा मुलगा अन्वर, ड्रायव्हर सलीम यांसारखी धर्माच्या सीमा ओलांडून पाहणारी पात्रं, पुरातन वेदान्तात आजच्या समस्येवरचं उत्तर शोधणारे हृदयनाथ पंडित; काश्मीर सोडून जम्मूला आलेल्या बांधवांना लुटणारे हिंदू घरमालक, अशा अमानवी परिस्थितीत दांपत्य-जीवनाची फरफट होत असतानाही दांपत्य-जीवनातलं मूल्य जपणारे संजीव आणि आरती कौर अशा पात्रांच्या माध्यमातून काश्मीर नव्याने समजत जातो.
-
Asa Asava Baap (असा असावा बाप)
सर्वोत्तम पिता बनण्यासाठीचं मार्गदर्शन हे पुस्तक करतं. पिता होण्याचा खराखुरा अर्थ...माता-पित्याच्या संगोपनातील फरक... मुलांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचं संगोपन कसं करावं... आर्थिक स्थिती आणि मुलांचं संगोपन...मुलांना वेळ देण्यासाठी काय करावं...आई-वडील विभक्त झाल्यामुळे मुलांच्या मनावर होणारा परिणाम... पितृत्वाचा आनंद कसा उपभोगावा इ. मुद्द्यांसह या पुस्तकात सर्वोत्तम पिता बनण्यासाठी सखोल मार्गदर्शन केलं आहे आणि ते उपयुक्त आहे.
-
Kanbakth Nindar (कमबख्त निंदर)
साहित्यिक नरेन्द्र मोहन यांची ही आत्मकथा त्यांचं लौकिक, व्यावसायिक जीवन उलगडते. आई-वडील, दोन भाऊ अशा कुटुंबासमवेतचं बालपण...तेराव्या वर्षी फाळणीमुळे अमृतसरला निर्वासितांच्या छावणीत स्थलांतर...या घटनेने बदललेले आयुष्य आणि भावविश्व...अर्थात हा प्रवास ते चित्रित करतात निंदर (त्यांची आई त्यांना लाडाने ‘निंदर’ असं म्हणत असे) या व्याQक्तरेखेच्या माध्यमातून...त्यांच्या मनाला पडलेला पीळ, अस्वस्थता व्यक्त करताना ते निंदरचा आधार घेतात आणि या आत्मकथेला कलात्मकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतात...निंदर ते साहित्यिक नरेन्द्र मोहन हा महत्त्वपूर्ण प्रवास यात येतो...फाळणीच्या आणि १९७५च्या आणीबाणीच्या वेदना या आत्मकथेतून जाणवतात...लौकिक आणि व्यावसायिक जीवनातील वादळांचा, आनंदक्षणांचा, त्या त्या वेळच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यासपूर्ण, व्यामिश्र आविष्कार
-
The Missing (द मिसिंग)
शाळकरी डर्बी मॅककॉर्मिथ आणि तिच्या दोन खास मैत्रिणी. जंगलात पार्टीचा बेत आखतात. पार्टीसाठी प्रत्यक्ष जंगलात पोहचतातही. पण तिथं एक जीवघेणा थरार त्यांची वाट पाहत असतो. कुणीतरी खुनशी मारेकरी एका बाईचा खून करतो. या खुनाची साक्षीदार असलेली डर्बी आणि तिच्या मैत्रिणी कसाबसा जीव वाचवून पळतात. या घटनेच्या तब्बल पंचवीस वर्षानंतर डर्बी एक धाडसी पोलीस अधिकारी झालेली असते. तिच्याकडं एका हत्यासत्राची सुत्रं सोपवली जातात. मध्यरात्री गायब होणाऱ्या बायका आणि त्यांचा मागमूसही मागं न ठेवणाऱ्या एका सायको किलरला शोधण्याचं काम सुरू होतं. आणि त्याचवेळी तिला भविष्यातलं अराजकही थांबवायचं असतं. या शोध मोहिमेत डर्बीचा वर्तमानकाळ तिच्या भुतकाळातल्या अनुभवांशी थरारक नाळ जोडू लागतो.
-
Mi Bhartiya (मी भारतीय)
इतिहासाची आणि मानवाच्या आदिमतेची पाळमुळं शोधणारं खातं म्हणजे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खातं. या खात्यात पुरातत्त्ववेत्ता म्हणून काम करताना के.के.मुहम्मद यांनी विलक्षण अनुभवांची शिदोरी जमा केली आहे. अयोध्येतलं वादग्रस्त उत्खनन असो की ताजमहल परिसरातला व्यापारी संकुल उभारणीचा तत्कालीन मुख्यमंत्री मायावतींचा घाट उलथवून लावणं असो, मुहम्मद यांचा कार्यकाळ आव्हानांनी भरलेला आहे. यात अगदी चंबळच्या खोऱ्यातील डाकूंचा सामना करत वटेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचेही प्रसंग आहेत. त्यामुळं हे आत्मकथन जणू भारतीय इतिहासाची सफर घडवत एका संशोधकाचा प्रवास मांडतं.
-
Anuchit (अनुचित)
माजी युएस मरीन कॅप्टन अनुराधा भगवती यांचं हे विलक्षण अनुभवकथन. आपल्या कठोर शिस्तीच्या भारतीय पालकांपासून मनाने दुरावलेली अनुराधा सैन्यात दाखल झाली. पण अमेरिकन नौदलातला स्त्री-पुरुष भेद आणि पुरुष सैनिक-अधिकाNयांकडून होणारं स्त्री सैनिकांचं लैंगिक शोषण, या गोष्टींनी तिला अस्वस्थ केलं. तिची सैन्यातील कारकीर्द संपल्यानंतर स्वान या संस्थेमार्पÂत तिने यासंदर्भात आवाज उठवला. परिणामी अमेरिकी सैन्यातील जाचक अटीही बदलल्या गेल्या आणि अमुलाग्र बदल घडला आणि लढाईसंदर्भातील महिला अधिकाऱ्यांवरील बंदी उठवण्यात आली. अनुराधा यांच्या अनुभवांचं आणि त्यांच्या लढ्याचं हे दाहक दर्शन.
-
Amap Pani (अमाप पाणी)
द टाइम क्विन्टेट मालिकेतील हे चौथं पुस्तक. मरी कुटुंबातली मुलं आता मोठी झाली आहेत. सँडी आणि डेनीस ही जुळी मुलं तशी सर्वसामान्य मुलांसारखीच. पण पौगंडावस्थेतले हे दोघे आई-वडिलांच्या प्रयोगशाळेत असताना अनवधानाने एका चालू प्रयोगात ढवळाढवळ करतात आणि काळाच्या सीमा ओलांडून अतिप्राचीन काळातल्या निर्मनुष्य वाळवंटात जाऊन पोचतात. हा काळ असतो ‘नोहा आणि त्याचे जहाज’ या बायबलमधील पौराणिक गोष्टीतला...या काळाची वाट हरवलेल्या मुलांना पुढे अनेक बऱ्यावाईट अद्भुत प्रसंगांना सामोरं जावं लागतं. यातला अप्रतिम कल्पनाविलास वाचकांना खिळवून ठेवतो.
-
Kalpatavaril Surkuti (कालपटलावरील सुरकुती)
वैज्ञानिक अद्भुतिकांमधील अफलातून कथानक म्हणजे हे पुस्तक. चार्ल्स वॉलेस वडिलांचा शोध घेत एका राक्षसी ग्रहावर पोहचतो. तिथलं सर्व जीवनमान ‘इट’ या आक्रमक शक्तीचे गुलाम बनले आहे. या आक्रमक शक्तीपासून पृथ्वीची आणि पर्यायाने आपल्या वडिलांचीही सुटका करण्यासाठी चार्ल्सचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात त्याची बहीण मेग, तिचा मित्र केल्विन आणि तीन अद्भुत व्यक्तीरेखांची त्याला साथ मिळते आहे. या अद्भुत व्यक्तीरेखा चार्ल्सला मार्ग तर दाखवतातच, पण आपल्या कारनाम्यांनी कथानकात रंगतही भरतात.
-
Vegane Kalnara Graha (वेगाने कलणारा ग्रह)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे तिसरं पुस्तक. पंधरा वर्षांच्या चार्ल्स वॉलेसपुढं नवं आव्हान ठेपलं आहे. ते आव्हान आहे, मॅड डॉग ब्रॅन्झिलोच्या विनाशकारी विचारांपासून पृथ्वीला वाचवण्याचं. या कामी चार्ल्सला सोबत लाभलीय एका एकशिंगी अद्भुत घोड्याची. चार्ल्सच्या या कालप्रवासात त्याला इतिहासातल्या व्यक्तीरेखांच्या आत प्रवेश करून भविष्यात विनाशकारी ठरणाऱ्या विचारांना थोपवायचं आहे. आशा आणि विश्वासाच्या रूजवणीचा हा चार्ल्सचा प्रवास एका अद्भुतिकेला जन्म देणारा आहे. ज्यात त्याची बहीण मेग कायथिंग करून चार्ल्सचं मनोबल वाढवण्यासाठी सज्ज आहे.