-
Anukul Kaal (अनुकूल काळ)
द टाइम क्विन्टेट या पंचकडीतील हे पाचवं पुस्तक. पॉली ओ’कीफ नुकतीच तिच्या आजी-आजोबांच्या घरी राहायला आलेली असते. तिचे आजोबा-आजी म्हणजे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ अॅलेक्स आणि केट मरी. पॉली तिच्या वर्तमानकाळापासून तीन हजार वर्षे आधीच्या भूतकाळात भरकटत जाते. ‘बहुतेक तो अपघात नसावाच’ असं तिला दोन ड्रूइड्स सांगतात. ते तिला सांगतात : ‘जेव्हा जेव्हा काळाचं द्वार उघडतं, तेव्हा तेव्हा त्याला निश्चित कारण असतं’. पॉली आणि तिचा गंभीर आजारी मित्र झॅकरी, भूतकाळात गेल्यावर लगेच काळाचं दार बंद होतं, तेव्हा त्यामागचं कारण स्पष्टपणे समजू लागतं. काळाचं दार पुन्हा खुलं होईपर्यंत अशा निराशाजनक काळात पॉली स्वत:ला आणि झॅकरीला जिवंत ठेवू शकेल का? ते दार उघडलं तरच ते घरी परत येऊ शकणार आहेत.
-
Daratil Vadal (दारातील वादळ)
ए विंड इन द डोअर अर्थात दारातील वादळ हे द टाइम क्विन्टेट मालिकेतील दुसरं पुस्तक. मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसच्या धाडसाची ही नवी कहाणी. पण यात मेगचा मित्र कॅल्विनचीही प्रमुख भूमिका आहे. या गोष्टीत काल्विन मेगचा पाठीराखा आणि सोबती म्हणून खऱ्या अर्थाने समोर येतो. पृथ्वीच्या विनाशावर टपलेले इक्थ्रॉय आणि प्रोगिनॉस्कीसच्या मदतीनं मेग मरी आणि चार्ल्स वॉलेसनं त्यांच्या विरोधात दिलेल्या लढ्याची ही गोष्ट. प्रत्येक वेळी, जेव्हा एखाद्या ताऱ्याचा मृत्यू होतो, तेव्हा आणखी एका इक्थ्रॉयनं लढाई जिंकलेली असते.
-
Benjamin Graham (बेंजामिन ग्रॅहॅम)
वॉरन बफे हे नाव ‘शेअरबाजारात अभूतपूर्व यश मिळवणारा मनुष्य ’ म्हणून जगप्रसिद्ध आहे. अशा वॉरन बफेचा गुरू असलेला माणूस म्हणजे काय जबरदस्त प्रकार असेल! बेंजामिन ग्रॅहॅम हे त्याचं नाव. विलक्षण गरिबीतून वर आलेल्या ग्रॅहॅमनं आपल्या आईनं शेअरबाजारात केलेली गुंतवणूक पूर्णपणे बुडताना अनुभवली. अफाट बुद्धिमत्ता आणि तर्कबुद्धी यांच्या जोरावर ग्रॅहॅमनं वैयक्तिक पातळीवर ही परिस्थिती साफ बदलून तर टाकलीच; पण शिवाय यशस्वी गुंतवणूक कशी करायची याचे वर्ग घ्यायलाही सुरुवात केली. भरपूर पैसे कमावून झाल्यावर तितक्याच शांतपणे ग्रॅहॅम गुंतवणुकीच्या विश्वातून आणखी लोभ न बाळगता बाहेर पडला. सगळ्यांना आपल्या ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ या संकल्पनेचा फायदा मिळावा आणि गुंतवणुकीच्या संदर्भातले बारकावे समजावेत यासाठी ग्रॅहॅमनं लिहिलेली पुस्तकं अजूनही ‘बेस्टसेलर’ मानली जातात. त्याचं ‘द इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक तर गुंतवणुकीचं बायबल म्हणूनच ओळखलं जातं. उलथपालथींनी भरलेलं अतिशय नाट्यमय आयुष्य जगलेल्या ग्रॅहॅमची ही कहाणी.
-
The Cut Out Girl (द कट आउट गर्ल)
दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंवरील अत्याचार म्हणजे मानवी क्रूरतेची परिसीमा. या क्रूरतेला आपली पोर बळी पडू नये म्हणून लिनच्या पालकांनी तिला दुसऱ्या कुटुंबाकडे सोपवलं. फोस्टर कुटुंबानं तिला लपवलं आणि नाझीवादापासून तिचं संरक्षणही केलं. पण कालांतरानं तिला फोस्टर कुटुंबापासून दूर व्हावं लागलं. त्यानंतरच्या तिच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर झाली. तिनं मानवी विकृतीच्या कित्येक तऱ्हा अऩुभवल्या. फोस्टर कुटुंबाचा नातू अर्थात बार्ट व्हॅन एस तिच्या या हेलावून टाकणाऱ्या आयुष्याची गोष्ट सांगता सांगता दुसऱ्या महायुद्धानं घडविलेल्या वेदनादायी विध्वंसावरही प्रकाश टाकतात.
-
Vitamin Jindagi (व्हिटामिन जिंदगी)
ही कहाणी आहे एका दुर्दम्य इच्छाशक्तीची. वयाच्या चौथ्या वर्षी पोलिओनं एक पाय निकामी केला, पण पोलिओ त्या मुलाच्या इच्छाशक्तीवर प्रहार करू शकला नाही. आयुष्यानं दिलेलं हे आव्हान त्या मुलानं पेललं. आणि आपल्या समस्येला संधीत रूपांतरित केलं. त्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाची ही यशोगाधा. शरीराला जशी व्हिटामिन्सची गरज असते, तशीच मनाला आशा, प्रेरणा आणि साहसासारख्या व्हिटामिन्सची गरज असते. हेच व्हिटामिन्स ललित कुमार यांचं हे पुस्तक आपल्याला पुरवतं.
-
Krushnakanya (कृष्णकन्या)
गेली साठहून अधिक वर्षं रत्नाकर मतकरींचं कथालेखन अविरत चालू होतं. परीकथांपासून सुरू झालेली मतकरींची कथा, सर्वाधिक रमली, ती ‘गूढकथा’ या कथाप्रकारात. अडीचशेहून जास्त कथांद्वारे मतकरींनी गूढकथांना अफाट लोकप्रियतेबरोबरच राजमान्यताही मिळवून दिली. आणि तरीही, त्यांचं सामाजिक कथालेखनही लक्षणीय राहिलं. या वास्तववादी सामाजिक कथांमधून मतकरी समाजातल्या विसंगतींविरुद्ध, अन्यायाविरुद्ध सातत्यानं आवाज उठवत राहिले. शैली कोणतीही असो, मतकरींनी कायम शोधला, तो माणसातला ‘माणूस.’ म्हणूनच नियतीची चेष्टितं, काळ, मृत्यू अशा अनादि-अनंत संकल्पनांची चित्तवेधक रचना करीत वाचकाला गुंगवून टाकणाऱ्या मतकरींच्या वैविध्यपूर्ण कथा चिरस्मरणीय ठरल्या. ‘कृष्णकन्या’ ही मतकरींचा परीसस्पर्श असलेल्या अशाच अनोख्या कथांची अमूल्य भेट. मतकरींच्या शेवटच्या अप्रकाशित कथांपैकी निवडक कथा प्रथमच पुस्तकरूपात आणणारा संग्रह म्हणूनही ‘कृष्णकन्या’चं महत्त्व अनन्यसाधारण असंच.
-
Te Ekaki Ladhale (ते एकाकी लढले)
नाझी-व्याप्त फ्रान्समधील ब्रिटिश सिक्रेट एजंट्स स्टार बंधुची ही खरी कहाणी. जॉर्ज स्टार आणि जॉन स्टार हे सख्खे भाऊ चर्चिलने नाझींविरोधात स्थापन केलेल्या एसओईमध्ये सामील होऊन फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागात काम करत होते. अर्थात त्यांना एकमेकांच्या आयुष्यात काय घडत आहे याची जराही कल्पना नव्हती. तो त्यांचा अगदी एकाकी संघर्ष होता. मदतीच्या सगळ्या स्रोतांपासून लांब राहून ते अगदी शत्रूच्या गोट्यात शिरून लढले. पकडले गेल्यास त्यांचा बचाव करणारंही कुणी नव्हतं. पण तरीही स्टार बंधुंनी इतिहासाच्या पानावर एका अशक्य कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीचा अनेक ऐतिहासिक दस्तावेजातून घेतलेला हा सांगोपांग आढावा.
-
Shine Bright (शाइन ब्राइट )
प्रत्येकाला उद्योजक बनण्याची इच्छा असते. पण, केवळ याच मार्गानं तुम्ही प्रभाव टाकू शकता का? एखादा उद्योजक ज्या गोष्टी करू शकतो त्याच तुम्ही नोकरीच्या कक्षेत राहूनही करू शकत असाल तर? ‘शाइन ब्राइट’ अशाच काही प्रेरणादायी प्रवासांचा लेखाजोखा सादर करतं, जे एकाचवेळी कष्टसाध्यही आहेत आणि समाधान देणारेही आहेत. कोणत्याही नोकरीत तुम्ही ‘अडकलेले’ नसता, तुम्हीही बदल घडवू शकता– एक ‘उद्योजक’ बनू शकता...हा विश्वास हे पुस्तक रूजवतं.
-
Bhartiya Sainik (भारतीयसैनिक)
पालकांच्या इच्छेखातर आयआयटीची परीक्षा दिलेला अर्जुन मनातून भारतीय नौदलात जाण्याचं स्वप्न बाळगतो आहे. एनडीए की आयआयटी या गोंधळात पडलेल्या अर्जुनला शेवटी त्याचं कुटुंबच पाठिंबा देतं. त्याच्या स्वप्नांची वाट मोकळी होते. आणि अर्जुन एनडीएत दाखल होतो. एनडीएच्या प्रशिक्षणानंतर तो सैन्यातील एका गुप्त आणि महत्त्वपूर्ण मिशनचा भाग होतो. त्याच्यासाठी देशसेवा बजावण्याची ही नामी संधी असते. पण तिथल्या वातावरणाने आणि काही घडामोडींनी त्याच्या पुढे अनेक नवी आव्हानं उभी राहतात. आणि देशसेवेत राहण्याच्या त्याच्या इच्छाशक्तीवरच परिणाम होतो. या वैचारिक दुविधेतून तो तिथून बाहेर पडायचा निर्णय घेत असतानाच दोनशे प्रवाशांना घेऊन जाणार एक विमान अपहृत होतं...आणि अर्जुनपुढे पुन्हा नवा पेच निर्माण होतो.
-
Where Egles Dare (व्हेअर ईगल्स डेअर)
कडाक्याची, गोठवून टाकेल अशी थंडी... अशा थंडीत एका रात्री ब्रिटिश स्पेशल फोर्सेसच्या सात पुरुषांबरोबर एका स्त्रीचा समावेश असलेली टीम जर्मनीतल्या उंच पर्वतराजीच्या प्रदेशात पॅराशूटनं उतरवली जाते... या टीमसमोरचं टार्गेट असतं - ` कॅसल ऑफ द ईगल’ नावाचा, शिरकाव करण्याच्या दृष्टीनं अतिशय दुर्गम, कठीण, अशक्यप्राय आव्हान वाटावं असा एक किल्ला आणि त्यातलं जर्मन सीक्रेट साQव्र्हसचं मुख्यालय... त्यातही या टीमसमोर एक मिशन असतं ते म्हणजे विमान कोसळल्यामुळे नाझींच्या तावडीत सापडलेल्या एका अमेरिकन जनरलची या किल्ल्यातल्या कैदेतून सुटका करणं... त्याची चौकशी करणाऱ्या नाझी अधिकाऱ्यांच्या हातात एक फार महत्त्वपूर्ण अशी गुप्त योजना पडू नये म्हणून... मात्र, ब्रिटिश स्पेशल फोर्सेसचं हे मिशन सुरू झालं नाही तोच या टीमचे सदस्य बळी पडत जातात आणि मिशन गुंतागुंतीचं होत जातं... रहस्यमय, उत्कंठापूर्ण अशा गाजलेल्या चित्रपटाचं उगमस्थान असलेली, दुसऱ्या महायुद्धाच्या काळातली अॅलिस्टर मॅक्लिनची एक रोमांचकारक साहसकथा...
-
Karunecha Swar (करुणेचा स्वर)
22 मे 2016, या दिवशी डॉ.किरण बेदी यांची पॉंडिचेरीच्या राज्यपालपदी निवड झाली. राज्यपालपदाची सुत्रे हाती घेत असताना त्यांचं ध्येय पक्कं ठरलं होतं. पॉंडिचेरीला संपन्न राज्यात परिवर्तित करणं आणि तिथल्या जनतेची सेवा करणं. हे ध्येय साध्य करताना राज्यपाल हा नामधारी असतो, हा आजवरचा रबर स्टॅम्प त्यांनी मिटवून टाकला आणि नवा इतिहास घडविला. सामान्य जनतेसाठी राजभवनचे दरवाजे खुले केले. त्यांच्यातील करुणेनं जनतेचं मन जिंकलं. करुणेला दुबळेपणाचं लक्षण मानणाऱ्यांना करुणेचं महत्त्व पटवून दिलं. डॉ.किरण बेदी यांच्या करुणामयी कारकिर्दीचा परिपाक म्हणजेच हे पुस्तक.
-
Aaji Ajobanchya Potaditlya Goshti (आजी आजोबांच्या
2020 सालात कोरोना व्हायरसनं साऱ्या जगाची दारं बंद केली. राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाली. इकडे शिगावला आजी-आजोबांच्या घरी नातवंडांसह कमलु आजीचा प्रवेश झाला. नातवंडांनी या काळात आजीआजोबांना अनेक कामांमध्ये हातभार लावला. पण त्याचसोबत त्यांच्यासाठी गोष्टींचं एक अफलातून जग खुलं झालं. राजा-राणी, जादुमंतर, प्राण्यांचं गमतीदार जग या गोष्टींच्या रूपाने मुलांनी अनुभवलं. आणि त्यांची टाळेबंदीतील सुट्टी खऱ्या अर्थानं समृद्ध करणारी ठरली. एकदा हाती घेतल्यावर संपवूनच खाली ठेवावं, असं दमदार, खुसखुशीत पुस्तक.
-
Shelka Saj (शेलका साज)
हा आहे ‘मृत्युंजयकार’ शिवाजी सावंत यांच्या विविधरंगी ललितलेखनाचा संच : ‘शेलका साज’! इथं सावंतांच्या खास रसश्रीमंत शैलीत वेध घेतलेले महाराष्ट्रवैभव कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जसे भेटतील, तसाच लेखकाला चकवा देऊ बघणारा वाचक अशी झूल पांघरलेला लपंगाही भेटेल. छ. शिवराय, शंभूराजे, महाराणी येसूबाई, सरलष्कर संताजी घोरपडे यांच्या जीवनझुंजीतील आजवर मराठी वाचक मनाला अज्ञात राहिलेल्या मनामनांच्या अणीदार वंगोऱ्यांना केलेला रसबाळा, तरल ललितस्पर्श भेटेल. तसाच कसा होता - असेल शिवकालीन रणसंमुख सामान्य मावळा यावर टाकलेला डोळस व वास्तव प्रकाशझोत असेल. इथं आर्य चाणक्याचा वेगळ्याच दृष्टीनं केलेला विचार दिसेल, तसंच, दीनदलितांना ‘आधारवड’ झालेल्या राजर्षी शाहूंचं क्षणदर्शन घडेल. सावंतांनी कथा मोजक्याच बेतल्या. मालिश, भिजाणे यांतून त्यांचं या आकृतिबंधाचं बळ दिसेल. ‘मुकी’ ही कथा तर अल्बर्ट कामूची आठवण करून देईल - यासाठीच या संचाचं शीर्षक : शेलका साज!!
-
Moravala (मोरावळा)
हा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर आहे साखरेच्या मधुर पाकात अंगभर मुरलेला मोरावळा. गुणकर, तसाच तुरटपणा टाकून चविष्ट झालेला. त्यातही हा शब्दमोरावळा, साहित्यिकमोरावळा आहे. मानवी मनाचा सारा अहंपणा, मत्सर, द्वेष अशा षड्रिपूंचा बेचव तुरटपणा टाकून ललितरम्य भाषेत सादर केलेला. श्री. शिवाजी सावंत यांच्या सशक्त भाषाशैलीत हा ‘शब्दमोरावळा’ साकारला आहे, त्यांच्या खास कोल्हापुरी बाजात नि ढंगात. इथं सावंतांच्या जीवनयात्रेत भेटलेली राजकारण, शिक्षण, प्रकाशन व साहित्य अशा विविध क्षेत्रांतील बलदंडांची आखीव रेखांकने आहेत. त्यांत एक-दोन खास ठाामीण अफलातूनही भेटतात. मोरावळ्याचा पहिलाच तुकडा जिभेवर ठेवताच खरा रसज्ञ मिटकी मारत नकळतच म्हणतो, ‘व्वा!’ तसंच काही हा ‘शब्दमोरावळा’ चाखताना रसिक वाचकाला वाटलं, तर आश्चर्य वाटायला नको!!
-
Mauli (माऊली)
।। माऊली ।। ‘माऊली’ ही अगदीच वेगळी कादंबरी. तिची नायिका आहे एक मांजरी; लेखकाने माया लावलेली. या मायेच्या पसायात लेखकाचे कुटुंबीय, स्नेहीसोबती आणि त्या क्रूर काळ्या बोक्यासह मांजरीचा गोतावळाही समाविष्ट होतो आणि कादंबरीची वीण एक वेगळं रंगरूप घेऊ लागते. यादवांचे निरीक्षण वाचकाला स्तिमित करील असे आहे. हे निरीक्षणच त्यांना एक रस्ता सापडवून देते. स्वत:चे भान शाबूत ठेवून यादव हळूहळू मार्जारविश्वाचा शोध घेऊ लागतात. साधा वाटेल अशा तपशिलाची पेरणी करीत या शोधवाटेने लेखक स्वरक्षण आणि स्ववंशवर्धन या दोन मजबूत पख्यांवर विसावलेल्या निसर्गसिद्ध आदिम प्रेरणेशी वाचकाला नेऊन भिडवतो तेव्हा वाचक पछाडल्यागत होतो. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याच फक्त अंकित असलेले एक थेट असे नरमादीच्या नात्याचे अस्तित्व न्याहाळताना आदिनिरणाच्या वाटेकडे वळतो. मग मांजरी ही मांजरी राहत नाही; तिथे साकारत जाते आदिमायेचेत्या जगन्माऊलीचे आत्मजन्मा नि आत्मभोगी असे कृतार्थ रुपडे. चिंतनगर्भ जीवनेच्छेचा कलारूप आविष्कार म्हणजे ‘माऊली.’ दार्शनिक तत्त्वज्ञान, लोकसाहित्यपरंपरा, सनातन भारतीय समाजमन यांचा हळुवार आणि तलम स्पर्श झालेली मराठी भाषेतील ही पहिलीच साहित्यकृती असावी, इतकी ती वेगळी आहे. – प्रा. अरविंद वामन कुलकर्णी
-
The Picture Of Dorian Gray (द पिक्चर ऑफ डोरियन ग्र
डोरियन ग्रे...अंतर्बाह्य सुंदर असलेला विशीचा तरुण... बेसिल हॉलवर्ड या चित्रकाराने डोरियनचं चित्र रेखाटलंय...बेसिलचा मित्र लॉर्ड हेन्री आणि डोरियनची भेट होते... डोरियन हेन्रीच्या प्रभावाखाली येतो...तो नाटकात काम करणाऱ्या सिबिलनामक सुंदर युवतीच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्नही ठरवतो...पण एका प्रयोगात सिबिल खूपच वाईट अभिनय करते आणि तो प्रचंड संतापतो...तिच्याशी भांडून थिएटरमधून बाहेर पडतो...त्याच रात्री सिबिल आत्महत्या करते...ती बातमी कळल्यावर डोरियन विव्हळ होतो...पण काहीच क्षण...या प्रसंगानंतर सुरू होते डोरियनची आत्मिक अधोगती...काही लोकांच्या विनाशाला, आत्महत्येला तो कारणीभूत ठरतो...व्यसनं आणि स्त्रियांच्या मोहपाशात गुरफटतो...चिरतारुण्याचा वर मिळाल्यामुळे ही अधोगती चालूच राहते...इतकी की तो बेसिलचाही खून करतो...त्याच्या या अधोगतीचे पडसाद त्याच्या चित्रावर उमटतात...त्याचा चित्रातला चेहरा विद्रूप होतो...मनोवास्तवाचं प्रभावी चित्रण द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे.
-
Ukhadleli Zade(उखडलेली झाडे)
उखडलेली झाडे` या संग्रहात आनंद यादवांची कथा विकासाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भेटते. ग्रामीण भागातील वर्तमान वास्तवाचे, समाज मनाचे, शहर व खेडे यांच्या अनेकविध संबंधांचे यादवांचे भान इथे प्रखर आणि मर्मभेदी झालेले जाणवते. ग्रामीण भागात सुधारणांच्या हेतूने आलेले शिक्षण, उद्योगीकरण, विकास योजना, पाणी योजना, पंचायतपरिषदा, ग्रामविकास, शेतीविकास इत्यादींचा ग्रामीण जीवनावर प्रत्यक्षात कसा विपरीत आणि विकृत परिणाम होत चालला आहे आणि त्यात सगळा अधस्तरीय ग्रामीण समाजच कसा पिळून, भरडून निघत आहे, कायमचा उखडला जात आहे याचे अस्वस्थ करणारे अतिशय कलात्म दर्शन ते घडवीत आहेत. याचबरोबर एकूण मराठी समाजातील जाती-वर्गांचे परस्पर संबंध, शहर आणि खेडे, बुद्धीजीवी मध्यम वर्ग यांचे सांस्कृतिक नातेही ते शोधू पाहत आहेत. त्यांचा हा संग्रह म्हणजे `वर्तमान मराठी खेड्यावरचे` आणि त्या संदर्भात एकूणच मराठी समाजावरचे प्रातिनिधिक भाष्य वाटावा, अशा योग्यतेचा आहे. - डॉ. दत्तात्रय पुंडे.
-
Panbhavare (पाणभवरे)
‘पाणभवरे’ मधील ‘मी’चे लक्षात घेण्याजोगे वैशिष्ट्य हे की, हा ‘मी’ आत्मचरित्रात्मक असूनही तो आपल्या नजरेत कधीच खुपत नाही. जे उघडउघड आत्मचरित्रात्मक, ते आत्मप्रदर्शनात्मक होण्याची भीती असते. अलिकडच्या आत्मचरित्रात्मक लेखनातून अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. यादवांच्या लेखनात आत्मप्रदर्शनाचा हा भाव किंचितही आढळत नाही. या ‘मी’चे व्यक्तित्व भडक नाही. ते लाजरे, बुजरे, पापभीरू, माणसांवर नितांत प्रेम करणारे, निर्सगाची विलक्षण ओढ असणारे आहे. यादव जीवनानुभवाचे दर्शन घडवीत असताना कलार्थाने ‘मी’ला विसरतात. शिवाय लेखनात बदलत्या वास्तवाचे भान आहे. आधुनिक जीवनातील मानसिक गुंतागुंत आहे. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेतल्यावरही क्षणोक्षणी जाणवणारी असुरक्षितता आहे, धपापलेपण आहे. सामान्य माणसाची दैनंदिन जीवनातली साशंक भीती आहे. यांत्रिक जीवनातली कृत्रिमता आहे. पांढरपेशी प्रतिष्ठा जपताना होणारी मनाची तगमग आहे. संस्कारांची गिरवलेली, न पुसली जाणारी वलये आहेत. वास्तवाचे निदान करणारी शोधदृष्टी आहे. तरल, भावस्पर्शी संवेदनेची वीण आहे. यांत्रिकतेने जखडलेल्या शहरातील हे विविध अनुभव, आज माणसाला प्राप्त झालेल्या ‘प्रलयपुरातील बाहुली’च्या स्वरूपाची जाणीव करून देतात... संवेदना, काव्यात्मता, तरलता, अनुभवातील चैतन्य यादवांची भाषा उत्तमपणे पेलू शकते, असा अनुभव या लेखनामधून येतो. (आलोचना)
-
Aadital.. (आदिताल)
‘पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं... जगाच्या आरंभी सुरू झालेला ताल. काळाला स्पर्श करत सतत युगानुयुगे सनातनपणे चाललेला धिनतिक. या तालातूनच निर्माण झालेली सृष्टीची लयकारी... त्याला आदिताल सापडल्यासारखं वाटलं.’