-
Ugvati Mane (उगवती मने)
मानवी जीवनात ‘मूल’ या घटनेला एक अजोड स्थान आहे. वंशसातत्याचं मूळ रुजणं म्हणजे मूल असणं. मूळ म्हणजेच मूल. ते असेल तरच संसारवृक्ष बहरतो, फुलतो आणि फळाला येतो. नसेल तर कोमेजतो, वाळतो, निष्पर्ण होऊन शेवटी नष्ट होतो. मूल असणं म्हणजे स्वत:च पुन्हा नव्यानं जन्माला येणं. नवं शरीर, नवं मन घेऊन पुन्हा जगण्यास प्रारंभ करणं. कुणाचं तरी आईबाप, बहीणभाऊ होऊन जगणं, हे आपल्या सड्याफटिंग, एकट्या जगण्यापेक्षा किती वेगळं असतं, याचे पडताळे येऊन आपण रसिक इथं थरारून जातो; समृद्धही होतो.
-
Akherchi Ladhai (अखेरची लढाई)
अखेरची लढाई ही कादंबरी सवाई माधवराव पेशवे आणि नाना फडणीसांच्या जीवनातील विविध घटना-प्रसंगांवर आधारित आहे. नाना फडणीस उणीपुरी दोन तपे पेशवाईच्या कारभारात होते. सवाई माधवराव पेशव्यांच्या माता-पित्याचे अकाली निधन झाल्यानंतर पेशवाईचा वारस म्हणून त्यांनी सवाई माधवरावांची डोळ्यांत तेल घालून काळजी घेतली. त्यांचा आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळ केला. माधवराव लहान असल्याने नानाच पेशव्यांच्या वतीने सर्व निर्णय घेत आणि राज्यकारभार पाहात असत. याच कालावधीत मुजोर झालेल्या निजामाला अद्दल घडविण्यासाठी नानांनी युद्ध पुकारले आणि आपल्या चातुर्याने (व दैवाची साथ लाभल्याने) ते जिंकून निजामाला सर्व अटी मान्य करायला लावून, शरण येण्यास भाग पाडले. पेशवे आणि दौलतीसाठी नाना फडणीसांना असाच परकीयांचा आणि स्वकीयांचाही सामना करावा लागला.
-
Bhumikanya (भूमिकन्या)
ह्या कथा जनसामान्य स्तरातील स्त्रीचे सर्वांगीण दर्शन घडविणाऱ्या, वास्तवाचे प्रखर भान असलेल्या, आशयसमृद्ध आणि कलासंपन्न स्वरूपाच्या आहेत. भूमिकन्यांचे शोषण त्यांच्या जन्मापासूनच सुरू असते. "मुलगी जन्मल्याचे" दु:ख घरादाराला मनोमन होते. तेव्हापासूनच मुलगीच्या आयुष्याची काळजी तिच्या आईला विशेष घेरते. अपुऱ्या जीवनसुविधांच्या कुटुंबात तर बालिका, कुमारी, युवती, गृहिणी, वृद्धा या सर्वांनाच अपुरेपणाची, अभावग्रस्ततेची आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक उपासमारीची झळ सतत आणि जास्तीत जास्त सोसावी लागते.
-
Khalal (खळाळ)
आनंद यादव यांनी कथालेखनाला प्रारंभ केला तेव्हा त्यांची बरीचशी काव्यरचना झालेली होती. कविप्रकृतीचे ग्रामीण कथाकार असा त्यांचा पिंड बनला. त्यांची ग्रामीण जीवनाची आत्मानुभूती, दीनदुबळ्यांबद्दलची कणव, मातीची ओढ हे सर्व गुण जातिवंत व कसदार होते पण त्याचबरोबर गुणांना व जाणिवेला कलात्मक संघटन व आकार प्राप्त करून द्यावा असा उत्कट ध्यासही त्यांना होता. या कलात्मकतेसाठी ग्रामीण बोली भाषेच्या सामथ्र्यांची कसोशीने व कल्पकतेने उकल करावी असे त्यांच्या मनाने घेतले. या तन्मयतेत व तंद्रीत खोलवर शिरताना चिंतनालाच एक नाद व लय असते याचा शोध त्यांना लागला. या शोधाच्या आधारे ग्रामीण दु:खाच्या चिंतनात्मक निवेदनाचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी आपल्या कथांतून केला. या प्रयोगातून ग्रामीण जीवनाचे जे दर्शन घडले ते अभिनव, रोमांचकारी वाटले. मराठी ग्रामीण कथेच्या विकासातला हा महत्त्वाचा टप्पा आहे....’’ प्रा.म.द. हातकणंगलेकर
-
Gavati Samudra (गवतीसमुद्र)
‘द सी ऑफ ग्रास’ या इंग्रजी कादंबरीचा ख्यातनाम कवयित्री आणि अभ्यासू लेखिका शान्ता शेळके यांनी केलेला ‘गवती समुद्र’ हा हृद्य अनुवाद आहे. ही साधी-सोपी गोष्ट आहे अमेरिकेतील सॉल्ट फोर्वÂ या गावातली. ल्यूटी कॅमेरॉन- जॉय ब्यू्रटन-जिम ब्य्रूटन या तीन प्रमुख पात्रांभोवती ही कथा गुंफली आहे. जॉय ही कथा आपल्याला निवेदन करतो. कर्नल जिम उंचापुरा- भारदस्त- शिस्तप्रिय- सर्वांवर करडा वचक असलेला सदगृहस्थ असतो. विस्तीर्ण पसरलेल्या गवताच्या कुरणात जॉयच्या काकाचा पशुपालनाचा व्यवसाय असतो. हे कुरण जिमने निर्वासितांच्या वसाहतीसाठी द्यावे, यासाठी कोर्टात केस सुरू असते. सरकारी वकील ब्राइस चेम्बरलेन याने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडे हे विशाल कुरण निर्वासितांच्या वसाहतीसाठी देण्यासंबंधी सूतोवाच केलेले असते. जॉयच्या काकाचे- कर्नल जिमचे- ल्यूटीशी लग्न होणार असते. ल्यूटी शिक्षणासाठी जॉयला शहरात पाठवण्याची व्यवस्था करते. त्यामुळे जॉयच्या मनात होणाऱ्या काकूविषयी गैरसमज निर्माण होतो. काकाच्या आदेशानुसार तो तिला आणायला रेल्वे स्टेशनवर जातो. ल्यूटीची साधी, सुंदर छबी आणि मनमोकळा स्वभाव पाहून जॉयच्या मनात तिच्याविषयी आदरयुक्त आकर्षण निर्माण होते. कुरणाविषयी कोर्टात सुरू असलेली केस सुरुवातीला कर्नल जिंकतो. दरम्यान कर्नल-ल्यूटीच्या संसारवेलीवर ब्रॉक-जिमी ही दोन मुले आणि सारा बेथ ही मुलगी अशी तीन फुले उमलतात. कर्नलचा कुरणावरील वसाहतीला विरोध पाहून ल्यूटी घर सोडण्याचा निर्णय घेते. आपले मातृवत छत्र दुरावल्यामुळे जॉयला दु:ख होते. कर्नल मात्र निर्धाराने हा धक्का पचवतो. बघता बघता १५ वर्षे उलटतात. कर्नलची मुले मोठी होतात. थोरला ब्रॉक बेफिकीर वृत्तीचा... आईसारखा देखणा असतो. त्याला जुगार आणि दारूचे व्यसन जडते. जॉय मेडिकलचे शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होतो. रुग्णांची सेवा करण्यासाठी तो गावी परततो. जुगाराच्या पबमध्ये झालेल्या भांडणात ब्रॉककडून एकाचा खून होतो. जज्ज झालेला चेम्बरलेन त्याला जामिनावर सोडवतो. चेम्बरलेन आणि ब्रॉकमधील साम्यामुळे ल्यूटी आणि चेम्बरलेन यांच्याविषयी प्रवाद निर्माण झालेला असतो. डॉ. जॉयला एका अत्यवस्थ रुग्णावर उपचारासाठी बोलावण्यात येते. तो ब्रॉक असतो. पुÂप्पुÂसात गोळी घुसल्यामुळे तो अखेरच्या घटका मोजत असतो. अचानक ल्यूटी परत येते. जॉयच्या दृष्टीने तो सुखद धक्का असतो. तिचा मुलगा ब्रॉक याच्या मृत्यूची बातमी तिला कशी सांगायची, कठोर काका कर्नलची ल्यूटी परत आल्यानंतरची प्रतिक्रिया कशी असेल, १५ वर्षे आपण कोठे होतो यावर ल्यूटीचे स्पष्टकरण कसे असेल, असे थरारक प्रश्न जॉयपुढे निर्माण होतात. पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी कवयित्री असलेल्या शान्ताबार्ईंच्या हळुवार लेखणीतून उतरलेली ‘गवती समुद्र’ ही कादंबरी वाचायला हवी... नातेसंबंधामधील गोडवा काव्यमय गद्यातून वाचकांना अनुभवायला मिळेल, यात शंकाच नाही...
-
Saprshkamale (स्पर्शकमळे)
शृंगारिक वाङ्मयात स्त्रीला भोगलालसेच्या पलीकडे आणखी एक नितान्तसुंदर अस्तित्व असते. आस्वादाच्या पातळीवर तिच्या अस्तित्वाचे रूपसौंदर्य अनुभवता येते. आस्वादाच्या पातळीवर स्त्रीचे विविध रूपांतील सौंदर्य आविष्कृत करावे, या प्रेरणेने या संग्रहातील ललितलेख लिहिले आहेत. कधी ती बालअप्सरेच्या रूपात भेटेल, तर यौवनमुग्ध, ललितगात्रा मदनिकेच्या स्वरूपात जाणवेल, कधी ती नऊवारीतील खानदानी, कुलीन स्त्री होऊन येईल, तर कधी सहावारीतील धीट, नागर ललना होऊन भेटेल; आणि कधी आदिमायेच्या मूलभूत रूपात सखी, प्रिया, पत्नी, जननी यांसारख्या विविध नात्यांनी पुरुषाचा सांभाळ करणारी दैवी शक्तीही असेल. स्त्रीची अशी अनेकविध रूपे जेव्हा रसिक पुरुषमनाला सामोरी येतात, तेव्हाच असे ‘स्पर्शकमळे’ मधील शृंगारसमृद्ध ललित लेख घडतात.
-
City Of Bones (सिटी ऑफ बोन्स)
हॉलिवूड हिल्समधे एका कुत्र्याला हाड मिळते आणि त्यामुळे वीस वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटते . तसे हे प्रकरण नेहमीसारखेच ,भावनाशून्य ,पण त्यामुळे डिटेक्टिव्ह हॅरी बॉशच्या लहानपणीच्या ,तो अनाथ असण्याच्या आठवणी जाग्या होतात . आपल्या तपासात बॉश भूतकाळात जातो खरा ,पण त्याचवेळी ,पोलिसदलात नव्याने दाखल झालेली सौंदर्यवती त्याला भानावर आणते. चौकशीकाळात हे प्रकरण अनेक धक्के देते . बॉशची त्यासाठी तयारी झालेली नसते. अचानक लॉस एंजलिस शहरात रान उठते आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी झगडणारा बॉश,कल्पनादेखील करता येणार नाही अशा निर्णयाप्रत येतो..
-
Origin (ओरिजिन)
गुगेनहाईम वस्तुसंग्रहालयातील एडमंड कर्षचं एक रहस्यमय प्रात्यक्षिक...प्रात्यक्षिकात, निमंत्रितांच्या उपस्थितीत, तो सांगणार असतो मानवाच्या उत्पत्तीसंबंधी आणि मानवाच्या भविष्याविषयी लावलेला शोध... पण तो सांगण्याआधीच कार्यक्रमस्थळी होते त्याची हत्या... हल्लेखोराचं पलायन... तो असतो नौदलातील माजी अधिकारी... कर्षचे गुरू रॉबर्ट लँग्डन आणि वस्तुसंग्रहालयाची मुख्याधिकारी अॅम्ब्रा व्हिडाल (जी स्पेनचे भावी राजे ज्युलियन यांची वाग्दत्त वधू असते) कर्षचा हा शोध जगासमोर आणायचा बांधतात चंग... पण त्यासाठी कर्षच्या महासंगणकाचा पासवर्ड आणि त्या महासंगणकाची जागा शोधण्याचं त्यांच्यासमोर असतं आव्हान... अॅम्ब्राचे सुरक्षारक्षक आणि पोलीस यांचा त्यांच्या मागे असतो ससेमिरा... कर्षच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राजवाड्यातून ज्युलियन आणि बिशप वाल्डेस्पिनो गूढ रीतीने गायब होतात...एक जबरदस्त गुंतागुंतीची, उत्कंठावर्धक कादंबरी...
-
Besharam (बेशरम)
तसलिमा नासरिन यांची ही कादंबरी स्थलांतरितांच्या जीवनाची चित्तरकथा आहेण् आपली जन्मभूमि सोडून परक्या मुलखातए जगभरच्या कानाकोपऱ्यातए वेगवेगळ्या वातावरणात स्वतःला रूजवू पाहणाऱ्यांची ही गोष्ट आहेण् अर्थात तसलिमा यांनी स्वतः हे आयुष्य जवळून अनुभवलेले आहेण् म्हणूनच स्वतः तसलिमा यांचं जगणंही यात प्रतिबिंबित होत राहतंण् त्यांच्या ष्लज्जाष् कादंबरीमुळे त्यांना कट्टरपंथी लोकांनी देश सोडायला लावलाण् लज्जामध्ये अनुभवाला येणाऱ्या प्रसंगांचीच पुढील आवृत्ती या कादंबरीत पाहायला मिळतेण् तसलिमा यांनी मोठा काळ देशाबाहेर व्यतित केला आहेण् आपली मूळे उखडली जाण्याची ही वेदना या कादंबरीत प्रकर्षाने येतेण् कादंबरीची सुरुवातच एका भेटीने होतेण् लज्जा कादंबरीतील पात्र असणारा सुरंजन लेखिकेला अचानक भेटायला येतोण् हा तोच सुरंजन असतोए जो लज्जा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेण् लेखिका या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की सुरंजन आणि त्याचे कुटुंब बांगलादेशातील 1993मधील सांप्रदायिक दंगलीवेळी स्वतःचा बचाव करत भारतात येण्यात यशस्वी झाले होतेण् या भेटीत लेखिकेला कळतं की सुरंजनचे वडील सुधामय यांचे निधन झाले आहेए तर त्याची आई आणि बहीण जिवंत आहेतण् या भेटीत सुरंजनच्या स्थलांतराचे गोष्ट समोर येतेण् या दोघांच्या संवादातून एकेक धागा उलगडत जातोण् याच धर्तीवर लेखिकेला एकेक पात्र भेटत जातेण् आणि त्यांच्या कथा समोर येत जातातण् हे पुस्तक कट्टरपंथीयांची बेशरमी वृत्ती अधोरेखित करत त्या विरोधात आवाज उठवण्याच्या संभावनांची चाचपणी करतंण् पण हे पुस्तक राजकीय नाहीए तर सामाजिक स्तरावरील स्थितीबाबत अधिक निवेदन करतंण् लेखिका अर्थात तसलिमा यांना सुरंजनए किरणमयीए माया आणि जुलेखा ही चार पात्र भेटतातण् आणि या पात्रांसोबतचा संवाद कादंबरी प्रवाहित करतोण्
-
I.C.184 Apaharnache 173 tas (आय.सी.८१४ अपहरणाचे १७
इंडियन एअरलाईन्सच्या काठमांडू ते नवी दिल्ली फ्लाईट आय्. सी. च्या सुमारे २०० प्रवाशांच्या आणि विमानातील कर्मचाNयांच्या दृष्टीने तो एक नरकाचा प्रवास होता... बंदिवासातील त्या आठ दिवसांमध्ये त्यांच्यांतील प्रत्येकाने नानाविध मानवी भावभावनांचा भयभीषण अनुभव घेतला. आपल्या परीने असाच अनुभव त्यांच्या अपहरणकत्र्यांनी घेतला. त्या बुरखाधारी अपहरणकत्र्यांनी स्वत:ची नावे चीफ, बर्गर, डॉक्टर, शंकर आणि भोला अशी घेतली होती. या पुस्तकामध्ये त्या संपूर्ण अपहरणनाट्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यातील एकेक अनुभव रसरशीत, जिवंत होऊन आपल्यापुढे उभा राहतो. त्या १७३ तासांतील तो मानसिक ताण, ती दहशत आपल्याला वेगळ्याच भयावह जगात घेऊन जाते. मग ते काठमांडू असो, नाहीतर अमृतसर, दुबई असो, की वंÂदाहार! नवी दिल्ली येथील, सत्तावेंÂद्रे आणि अर्थात विमानांच्या अंतर्भागाचाही या अपहरणनाट्यात समावेश आहे. अपहरणाची ती संपूर्ण धाडसी योजना आखण्यापासून ते ती पूर्णपणे पार पडेपर्यंतचे सर्व दुवे एकसूत्राने गुंफण्यात आले आहेत... — आणि अखेर अपहरणकर्ते पाकिस्तानात जाऊन कसे भूमिगत होतात, त्याचेही दर्शन या पुस्तकातून घडवण्यात आले आहे.
-
Ayushyacha Nava Dav (आयुष्याचा नवा डाव)
नैराश्य ही सबंध जगाला भेडसावणारी समस्या. दर चार व्यक्तींमागे एक व्यक्ती नैराश्याने ग्रासलेली असते. नैराश्यातनं होणाऱ्या आत्महत्यांमध्ये भारत जगात आघाडीवर आहे. पण तरी मानसिक आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. हे पुस्तक नैराश्यासारख्या महत्त्वपूर्ण विषयावरचं आपलं मौन सोडायला लावतं. डॉ. शैलजा सेन यांचा मानसिक आरोग्यातला प्रदीर्घ अनुभव, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनुभवलेल्या केसेस गोष्टरूपात या पुस्तकात समोर येतात. या गोष्टीतून आणि रूग्णांसोबतच्या त्यांच्या संवादातून प्रत्येकाला आपल्या मानसिक दुखण्यावरही इलाज सापडत जातो. मानसिक अनारोग्याबाबतची लांच्छनाची भावना, लाज यांच्याविरोधात आवाज उठवत हे पुस्तक तुम्हाला समजून घेणारी मैत्री बहाल करतं.
-
Mahaparva.. (महापर्व)
मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचा सुसूत्र लेखाजोखा. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य संभाजी महाराजांच्या वधानंतर मोगल आपल्या घोड्यांच्या टापांखाली तुडवत होते. औरंगजेब आणि त्याचे प्रचंड सैन्य मराठ्यांना चिरडू पाहत होते. सुमारे पंचवीस वर्षांहून अधिक काळ औरंगजेब आणि त्याच्या सैन्याला झुंजवणाNया राजाराम महाराज, संताजी-धनाजी, ताराबाई आणि अन्य अनुभवी मराठी सरदारांची शौर्यगाथा.
-
Shanghayachya Muli (शांघायच्या मुली)
शांघाय शहरातील पर्ल व मे या दोघी तरुण बहिणी... जुगारात हरल्यानंतर त्यांचे वडील या दोघींनाही लॉस एंजलिसला स्थायिक झालेल्या लुई नावाच्या मूळ चिनी माणसाच्या दोन मुलांच्या वधू म्हणून विकतात...त्या दोघींचा चीन ते अमेरिका असा खडतर प्रवास, लुईच्या कुटुंबात गेल्यानंतरचं त्यांचं आयुष्य आणि कालांतराने परिस्थितीवश या दोघींमध्ये उभी राहिलेली भिंत...स्थलांतराच्या अनेक पैलूंचं दर्शन घडवणारं, मनाला चटका लावणारं भावनाट्य
-
Gahan Padleli Tekadi (गहाण पडलेली टेकडी)
गहाण पडलेली टेकडी हा आदिवासी स्त्रियांच्या कहाण्यांचा संग्रह. या कहाण्या मारिजा स्रेस यांनी त्या अदिवासींमध्ये त्यांच्यापैकी एक होऊन, त्यांच्यात राहून लिहिल्या आहेत. ‘इथं तर हे नेहमीचंच’ या कथेतील मुकादम आणि ठेकेदाराच्या पाशवी वासनेला बळी पडून जीव गमवावी लागलेली नुकतीच वयात आलेली लाली...‘ठेवलेली बाई’ कथेतील पहिला नवरा गेल्यावर नाईलाजाने दुसरं लग्न करावं लागलेली आणि दुसऱ्या नवऱ्याने बाई ठेवली आहे, हे कळल्यावर बंड करू पाहणारी खातरी...‘दुभती गाय’ कथेतील आदिवासी स्त्रियांना हाताशी धरून गावात दूध सोसायटी उभी करू पाहणाऱ्या मीराबेनला पुरुषी मानसिकतेचा करावा लागणारा सामना...‘जो मैं ऐसा जानती’ कथेतील तारुण्यात पाय घसरलेली, पण नंतर नेकीने संसार करणारी मकू...‘बदलत्या काळाची पावलं’मधील ठार मारू पाहणाऱ्या नवऱ्याच्या आणि सासरच्या लोकांच्या तावडीतून सुटून आलेली, नंतर नानजीशी लग्न करून सुखाचा संसार करताना गावातील बायकांचा उद्धार करू पाहणारी फूली...काही शोषित आणि काही संघर्ष करू पाहणाऱ्या आदिवासी स्त्रियांचं वास्तव विश्व.
-
Congress Viruddha Maharashtra (काँग्रेस विरुद्ध मह
आचार्य अत्रे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता; पण काही कारणाने अत्रे आणि काँग्रेस यांच्यात वितुष्ट आलं आणि अत्रे काँग्रेसच्या बाहेर पडले. अत्र्यांनी काँग्रेसवर, विशेषत: यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंवर आपल्या लेखणीने नेहमीच शरसंधान केलं. ‘काँग्रेस विरुद्ध महाराष्ट्र’ या पुस्तकातून अत्र्यांमधील कट्टर काँग्रेस विरोधकाचं दर्शन घडतं. यशवंतरावांची नेहरूनिष्ठा आणि नेहरूंचा महाराष्ट्रद्वेष यावर अत्र्यांनी कडाडून टीका केली. यशवंतराव चव्हाणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात घेतलेली भूमिका, आणीबाणीच्या वेळी यशवंतरावांनी काँग्रेसचा केलेला त्याग आणि त्यादरम्यान इंदिरा गांधींनी त्यांची केलेली निंदा आणि यशवंतरावांची मलिन झालेली प्रतिमा, भाषावार प्रांतरचनेला नेहरूंनी केलेला विरोध इ. अनेक महत्त्वाच्या घटनांवर या पुस्तकातून तपशीलवार भाष्य करण्यात आलं आहे आणि अत्र्यांच्या निर्भीड, पारदर्शक व्यक्तिमत्त्वाचं दर्शनही घडवलं आहे.
-
Never Go Back (नेव्हर गो बॅक)
मिलिटरी पोलीस म्हणून सैन्यामधून निवृत्त झालेला जॅक रीचर हा सडाफटिंग, असामान्य बुद्धीचा, ताकदवान माणूस. त्याच्यावर सोळा वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा आरोप ठेवण्यात येतो आणि त्याला पुन्हा सैन्यात भरती करून घेण्यात येते. तसंच त्याला एका प्रेमप्रकरणातही अडकवण्यात येतं. त्याला कोण आणि का गुंतवत असतं अशा आरोपांत? एका अफगाणीने दोन डेप्युटी चीफ्स ऑफ स्टाफ्सच्या मदतीने चालवलेला बेकायदा व्यापार... रीचरने या सर्वच प्रकरणांचा लावलेला छडा
-
Shubh Shubhmangal (शुभ शुभमंगल)
पति-पत्नी ही संसाररथाची दोन चाके आहेत. काही वेळा वाद, मतभेद, भांडण यामुळे ही चाके कुरकूर करू लागली तरी प्रेम, सामंजस्य यांचं वंगण घालून ती चाकं चालती ठेवणं महत्त्वाचं. वाद, मतभेद टोकाला जाऊ न देण्यासाठी काय करावं, याचं मार्गदर्शन करणारं, वैवाहिक नात्यात निर्माण होणाऱ्या समस्या, त्यांचे परिणाम यांचा विचार करतानाच त्यावरील उपाययोजना सुचवणारं, सुखी वैवाहिक जीवनाचा मूलमंत्र देणारं पुस्तक.
-
The Mute Anklet (द म्यूट अँक्लेट)
म्हैसूरचे संस्थानिक महाराज. उमा ही त्यांच्या मृत बहिणीची आणि वॉरेन या ब्रिटिश सैनिकाची मुलगी. म्हैसूरच्या किल्ल्याला वेढा घालून बसलेला इंग्रज सैन्यातील देखणा ब्रिटिश तरुण अॅश्टन एका नाट्यमय प्रसंगामुळे महाराजांच्या तावडीत सापडतो. ते त्याच्यासमोर उमाशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवतात. उमाच्या मनात ब्रिटिशांविषयी द्वेष आणि अॅश्टनलाही विवाहबंधनात अडकायचं नसतानाही त्यांचा विवाह होतो. अॅश्टनशी झालेला विवाह हा उमाच्या जीवनातील नावडता, तरी महत्त्वाचा अध्याय आहे. तर दुसर्या बाजूला उमाकडे असलेल्या एका वस्तूमुळे (ज्या वस्तूबद्दल ती स्वत: अनभिज्ञ आहे) तिच्यावर हल्ल्याचे, तिच्या अपहरणाचे प्रयत्न होत आहेत. उमा आणि अॅश्टनचं वैवाहिक जीवन फुलतं का, तिच्याजवळ असलेल्या वस्तूचा शोध तिला लागतो का आणि ती वस्तू कुणाला आणि का हवी असते, याचं काय रहस्य असतं? ऐतिहासिक पार्श्वभूमीवर फुललेली एक हळुवार, रहस्यमय प्रेमकहाणी.