-
Abhyas Kasa Karava (अभ्यास कसा करावा)
दहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा – सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरुकिल्ली. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास-भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास - तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र |
-
Veerappan Viruddha Vijay Kumar (वीरप्पन विरुद्ध वि
चंदनाची चोरी अन् हस्तिदंताची तस्करी. एकशे चोवीस जणांच्या पाशवी हत्या. अनेक धाडसी अपहरणं. तीन राज्यांच्या पोलीसदलांना सतत वीस वर्षं दिलेली झुकांडी. अशी कैक भीषण कृत्यं खात्यावर असणाऱ्या क्रुरकर्म्याचा चिकाटीनं पाठलाग करून अखेर त्याला यमसदनाला धाडणाऱ्या के. विजय कुमार या आयपीएस अधिकाऱ्यानं सांगितलेली सत्यकथा. कल्पनेहूनही भयंकर अन् रहस्यपटाहूनही थरारक असं खिळवून ठेवणारं वास्तव ! विरप्पन विरुद्ध विजय कुमार
-
Palbharahi Nahi Hay Hay (पळभरही नाही हाय हाय)
दुसऱ्या महायुद्धात वीस लाख हिंदुस्तानी सैनिक लढले. जेथे जेथे ब्रिटिश युद्धात उतरले, तेथे तेथे हिंदुस्तानी सैन्य जाऊन पोचले. फ्रान्स आणि ग्रीसपासून ते मलायापर्यंत त्यांनी जर्मन, इटालियन आणि जपानी फौजांविरुद्ध निकराचा लढा दिला. असे असूनही भारताच्या इतिहासात या सैनिकांना स्थान नाही. आपण भारतीय त्यांना स्वत:च्या भूतकाळाचा भाग मानत नाही. भारतीय भाषांमधील साहित्य त्यांची दखल घेत नाही. भारतीय चित्रपटसृष्टी कधीही त्यांच्या जीवन-मरणाचे चित्रण पडद्यावर आणत नाही. दोस्त राष्ट्रांनी जसे त्यांना अनुल्लेखाने मारले, तसेच आपणसुद्धा त्यांना विस्मृतीच्या पडद्याआड ढकलून मोकळे झालो. हिंदुस्तानी सैनिकांनी इम्फाळ-कोहिमामध्ये बलदंड जपान्यांना धूळ चारली म्हणून हिंदुस्तान जपानी साम्राज्याच्या पकडीत सापडला नाही. अन्यथा केवळ हिंदुस्तानचाच नाही, तर संपूर्ण जगाचा चेहरा-मोहरा बदलला असता. जपानी हिंदुस्तानात घुसले असते, तर तिकडे जर्मनी, इटली यांचेही बळ वाढले असते आणि नाझी भस्मासुराने हिंदुस्तानातही पाय रोवले असते. तसे होऊ नये म्हणून ज्यांनी जिवाचे रान केले, प्राण गमावले, अशा अज्ञात वीरांची ही कथा.
-
Punha Yankijchya Deshat (पुन्हा यांकीजच्या देशात)
‘ड्रीमलँड’, ‘वंडरलँड’ अशी बिरुदे मिरवणारी अमेरिका. तिच्या दोन्ही किनाऱ्यांना भेट देण्याची संधी. सपत्नीक सहलीत जिवाभावाचे मित्र सोबतीला. खेरीज पर्यटन म्हणजे केवळ करमणुकीचे साधन असे न मानता डोळसपणे सर्व गोष्टी निरखण्याची लेखकाची वृत्ती. या सर्व कारणांनी हे प्रवासवर्णन बनले आहे अमेरिकेचे अनोखे चित्र दाखवणारा शोभादर्शक. पुन्हा यांकीजच्या देशात...
-
Swapnamadhil Gawa (स्वप्नामधील गावां)
‘केवळ भाषण-लेखनानं भागणार नाही : आपण तसं जगायलाही हवं’ असं तीव्रतेनं जाणवल्यामुळे दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी हे जोडपं ‘निसर्गस्नेही जीवनशैली’ जगण्यासाठी २५ वर्षांपूर्वी पुण्यातून बाहेर पडून कोकणातल्या एका खेड्यात जाऊन स्थायिक झालं. त्यांच्या २५ वर्षांच्या अशा जगण्याचं हे आत्मकथन. त्यांचं हे जगणं जितकं सजगतेनं आहे, तितकंच उत्कटतेनंही. जितकं विचारपूर्वक आहे, तितकंच भावपूर्णही. परिपूर्णतेचा ध्यास आहे; पण, मर्यादांचं भानही. त्यामुळेच, हे दांपत्य ‘असामान्य’ न वाटता, चारचौघांसारखं वाटतं. त्यांची ध्येयं ही आपल्यालाही आपल्या आवाक्यातली वाटतात. त्यांच्यासारखाच प्रयत्न आपणही करावा, अशी प्रेरणा देणारं हे पुस्तक.
-
Manobhave Deshdarshan Mizoram (मनोभावे देशदर्शन मि
मिझोरम. ईशान्य भारतातले एक महत्त्वाचे राज्य. एके काळी बंडखोरीने ग्रासलेले, पण आता शांततेच्या मार्गाने विकास साधू पाहणारे... त्या सीमावर्ती राज्यातील असंख्य पर्यटनस्थळांची त्यांच्या वैशिष्ट्यांसह तपशीलवार माहिती देणारे हे संकलन हौशी पर्यटकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
-
Ke Har Khwahish Pe (के हर ख्वाहिश पे)
‘...कारण आकर्षक वाटणारं जगातलं एक अदभुत सत्य आम्हाला सापडलं होतं. ते हातातून निसटू नये म्हणून आम्ही एकमेकांना सावध करत होतो...मानवी इतिहासातला नवा साक्षात्कार आम्हाला झाला होता आणि त्याच्या प्रकाशात आम्ही न्हाऊन निघालो होतो...नव्या युगाची सुरुवात आता नक्की होणार, अशी आम्हाला मनातून खात्री वाटू लागली होती. ...ऐन तारुण्यातली बंडखोरीची ऊर्मी, त्याला पुरोगामी जीवनपद्धतीची बैठक... आणि जोडीला समविचारी तरुण मित्रांचा गट...अशी सर्व पार्श्र्वभूमी असल्यामुळे आम्ही त्या काळात स्वतःला इतरांपेक्षा खूप वेगळे समजत होतो.'
-
Jagan Kalat Tevha (जगणं कळतं तेव्हा)
‘‘आपण वाड्यात भातुकलीचा खेळ खेळायचो बघ, आठवतंय? ती चिखलाची भांडी, मातीच्या बाहुल्या, मातीचाच स्वयंपाक अन् मातीचंच जेवण... माणसं मोठी झाली ना, तरी त्यांचे संसार मातीचेच राहतात बघ. आपल्या भातुकलीसारखे, जराशा उन्हानंसुद्धा तडे जाणारे!’’ अशाच एका तडा गेलेल्या संसाराचे ओझे आपल्या कोवळ्या खांद्यावर पेलू पाहणाऱ्या मुलीची ही कुटुंबकथा... जगणं कळतं तेव्हा