-
Saigalswaryug (सैगलस्वरयुग)
कुंदनलाल सैगल ह्या स्वातंत्र्यपूर्व काळातील गायकनटाचे हे सांगीतिक चरित्र. सैगलच्या चित्रपटांबरोबरच त्या त्या सालातील प्रमुख हिंदी आणि मराठी चित्रपटांचे तसेच सैगलच्या गाण्यांची आणि त्याच्या संगीतकारांची चर्चा करताना त्या त्या सालातील गाजलेल्या अन्य गाण्यांचे, ती गाणार्या गायक-गायिकांचे आणि त्यांच्या संगीतकारांचेही उल्लेख येथे येतात. त्यामुळे सैगलच्या काळातील एकूण चित्रपटसृष्टीचे आणि खास करुन त्यातील संगीताचे बदलते स्वरूप या पुस्तकातून आपोआप उलगडले गेले आहे. सैगलवर जे संगीतसंस्कार झाले त्या संदर्भात त्याच्या बालपणी म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीस भारतीय समाजात संगीतपरंपरा काय होती, त्याचीही माहिती या लेखनातून मिळते. 1933 ते 1947 हा सैगलचा सुवर्णकालखंड. `सैगलस्वरयुग’ म्हणता येईल अशा या कालखंडाची ही एक संगीतसफर. त्या कालखंडातील अनेकांचे भावविश्व आणि मनाच्या सांस्कृतिक क्षितिजाच्या सीमा विस्तारण्यात सैगलचा नि:संशय वाटा होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
-
Glanirbhavati Bharat (ग्लानिर्भवति भारत)
अनुकरणीय लेखनशैली नसूनही अरुण साधू यांची विषयाची निवड आणि रोख-ठोक मांडणी यामुळे त्यांच्या कथा व कादंबऱ्यांचा वेगळाच बाज असतो. भाषेतून नव्हे तर मांडणीमधूनच कथाविषयासंबंधीची त्यांची अतूट बांधिलकी तीव्रतेने व्यक्त होते. ‘बिनपावसाचा दिवस’, ‘माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘मुक्ती’, ‘मंत्रजागर’ आणि ‘बेचका’ या कथासंग्रहानंतर साधू यांचा हा संग्रह आहे वेगळ्याच विषयावर वेगळ्या धाटणीची मांडणी घेऊन. सर्व कथांमधून एक सूत्र आहे, तुमच्या आमच्या जिव्हाळ्याच्या विषयाचे. देशाची, समाजाच्या नीति-मूल्यांची, संस्कृतीची होत असलेली सर्वांगीण अधोगती. आजच्या सामाजिक वास्तवाचे दाहक चित्रण असलेल्या या कथा विचार करायला लावणार्या आहेत तशा अस्वस्थ करणार्याही.
-
Chandragupt..(चंद्रगुप्त)
हि गोष्ट आहे एका संघर्षाची,जीद्दची आणि देशाचं नशीब बदलणारा माणसाची! माणसाचा अतुलनीय त्यागाची! ज्या ज्या वेळी आता हिंदुस्तान संपला, येथील लोकांना काही भवितव्य नाही अशी हाकाटी सुरु होती त्या त्या वेळी एका नायकाचा जन्म होतो तो अवर्तीण होऊन सार चित्र पालटतो आणि परत एकादा आपल्या मातृभूमीला गतवैभव प्राप्त करून देतो. चंद्रगुप्त हि अशी आख्यायिक निर्माण करणारी व्यक्ती आहे. भगवदगीतेतील परित्राणाय साधूनाम विनाशायच दृष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे हि उक्ती सार्थ करणासाठी उदयाला येणारा एका व्यक्तीची हि यशोगाथा आहे.
-
Zulichya Khali (झुलीच्या खाली)
' मानवी जगण्यातल्या विसंगती , गाव -शहरामधील रुंदावत चाललेली खाई जीवनसंघर्षातील घुसमट ,वृत्ती -प्रवृतींच विस्मयकारी रूप या कादंबरीतून लेखक सार्थपणे घडवितो. हे घडवताना त्याची लेखणी माणूस शोधू पाहते . माणूस शोधताना माणसासाठी व्याकूळ होणारी 'झुलीच्या खाली ' हि लक्षणीय कांदबरी आहे . एका शालेय शिक्षकाच्या जीवनावरील कांदबरी . आजच्या शिक्षणसंस्थांतील बाह्य दडपणे, शिक्षणातील तकलुपी नियम , नोकरीसाठी भ्रष्टाचार यांचे चित्रण आत्यंतिक प्रभावीपणे कांदबरीत उमटले आहे . शिक्षण त्याच्या भोवतालचा समाज , कौटुबिक समस्यांचा गिरगिट गुंता आणि शेतीप्रश्नांची नीटस मांडणी केल्यामुळे हि अतिशय प्रत्ययकारी कांदबरी झाली आहे .'