-
Vkrutva Kala Ani Sadhana (वकुत्व कलाआणि साधना)
अनेक नामंकित देशी-परदेशी वक्त्यांची भाषणे मी ऐकत असे नि ऐकलीही होती. कित्येकांची तर ध्वनिलिखितही केलेली होती. प्रत्येकाची लकब निराळी. काही केवळ विद्वतेच्य प्रदर्शनासाठी बोलत. त्यांची व्याखाने श्रोते पुराणिकाच्या ठराविक धाटणीसारखी भक्तीभावाने ऐकत. ऐकत म्हणजे काय? तर एका कानाने ऐकून दुस-या कानाने बाहेर सोडीत.कसं काय झालं व्याख्यान? तर वक्ता विद्वान, विलक्षण अभ्यासू. आपल्याला समजणार त्यात, हा परिणाम. कित्येकांची भाषणे मधुरमधुर शब्दांचा नुसता सडा. श्रोत्यांनी नुसता ऐकावा नि कौतुक करीत सभागृहाबाहेर पडावे. कित्येकांची भाषेपेक्षा हातवारेच जबरदस्त. असले नाना प्रकार पाहून वकृत्व- परिणामकारक वकृत्व असावे कसे आणि ते कमवण्यासाठी उमेदवारांनी स्वधायाची, आवाजाच्या कमावणीची, हावभाव मुद्राभियनाची कसकशी तयारी केली पाहिजे, इत्यादी अनेक मुद्दयांची मी चार-पाच वर्षे टिपणे करीत होतो, आणि त्याविषयीची पाश्चात्य पुस्तके अभ्यासित होतो.
-
Jait Re Jait (जैत रे जैत)
कर्नाळ्यावरचा दीडशे फूट उंचीचा उभा टेंबा मी पाहिला आणि थक्कित होऊन उभा राहिलो. अवघा सह्याद्रि मंडळात कडा नाही. मग दिसली ता कड्याभोवती चहूबाजूंनी लोंबलेली भली प्रचंड पोळी-आग्यामाश्यांची. त्या पोळ्यांचा
-
Kadhitari Kothetari (कधीतरी कोठेतरी)
संगीताच्या जादूने भरलेले अद्भुतरम्य वातावरण, अप्रतिम गाणारी एक षोडशवर्षे'गानभरि' तरुणी आणि गायानिकालेवर लुब्ध असलेला एक सुसंकृत नागर तरुण………प्रेमाच्या ठराविक त्रीकोणाहून निराळा असलेला हा त्रिकोण जगाच्या पाठीवर कुठेही, केव्हाही एक निराळीच समस्या उभी करू शकतो - त्यात भर पुन्हा जादूच्या शंखाच्या प्रतापाची! संगीत, तारुण्य थोडीशी ' फनन्टासी' आणि कल्पनारम्यता, प्रेम आणि कलह किव्हा विरोध या सर्व घटकांच्या मिश्रणातून सिद्ध झालेले हे रसायन कुठलाही संदेश वैगेरे देण्याच्या भानगडीत न पडता सहजपने एक सार्वकालिक सत्य सांगून जाते. त्याला एक स्थालकालातीतातेचा, कल्पनारम्यतेचा स्पर्श आहे आणि रुचिर मनोरंजन हाच या नाटकाचा आत्मा आहे. पकिस्तानी टोळीवाल्या गायिकेच्या रेश्माच्या-कथेवरून स्फुरलेले वसंत कानेटकरांचे हे नवीन नाटक मोहक शब्दकळेने नटलेले, रसिकांना भावे असे!
-
Kimaya( किमया)
किमया ’ ही एक वाटचाल आहे, दैनंदिन जीवनांतील रूक्ष व्यवहारी भूमिकेकडून, सौंदर्याने ‘फुली फुलून’ आलेल्या विश्वाच्या उत्कट व संपन्न जाणीवेकडचा हा प्रवास आहे. लेखक माधव आचवल हे व्यवसायाने आर्किटेक्ट. कलात्मक दृष्टी लाभलेलं, मनात निर्माण होणार्या भावनांना तितक्याच अलवारपणे शब्दरुप देणारं संपन्न व्यक्तिमत्त्व! रेती-माती-दगड-विटांमध्ये वावरत असताना त्यातील सौंदर्यामध्ये रमणारा हा लेखक. मनातले भाव आणि ते व्यक्त करणारे शब्द ह्यांचा वापर इतका अचूक आहे की आपल्याला माहिती असलेल्या गोष्टीदेखील नव्या भासतात. ते दृश्य जसंच्या तसं आपल्यासमोर उभं रहातं. ताजमहालाचं पाण्यात ‘डुचमळणारं’ सौंदर्य, आगगाडी अंधार्या बोगद्यात शिरून उजेडात बाहेर पडणं... आपणही बोगद्यांतून अनेकवेळा प्रवास केलेला असतो. मग तो बोगदा मुंबई-पुण्याच्या वाटेवरचा असो किंवा जम्मू-श्रीनगर वाटेवरील लांबलचक जवाहर बोगदा असो! लेखकाने केलेल्या वर्णनांतून हे अनुभव नवेच भासू लागतात. ‘किमया’सारख्या पुस्तकांच्या एका वाचनाने कधीच समाधान होत नाही. ती अधून-मधून, पुन:पुन्हा वाचावीशी वाटतात. आपलं रोजचं जगणं अर्थपूर्ण बनवण्यासाठी ते फार आवश्यक असतं.
-
Vadal Mansalatay (वादळ माणसाळतय)
" श्री बाबा आमटे यांच्यासारखे महान झंझावती व्यक्तिमहत्व आणि श्री वसन्तराव कानेटकरांसारखे आजचे अग्रगण्य, प्रतिभाशाली नाटककार, या माणिकांचन योगातून ही नाटयकृती जन्माला आली आहे. सूर्याचे किरण शोधणारा, टिपणारा आणि त्यावर निर्वाह करणारा एक पक्षी ग्रीकपुराणात आहे. त्या पक्षाप्रमाणे वसन्तरावांच्या प्रतिभेनेही आज सर्वत्र कोंदटलेल्या काळोखातील प्रकाशकिरण टिपले आहेत, आणि त्यातून एक संस्मरणीय कलाकृती मराठी रंगभूमीला सादर केली आहे. अनुईच्या बेकेटप्रमाणे बाबांनाही आपले पूर्वीचे साहसी, स्वच्छंदी आणि विलासी जीवन, खांद्यावरील उत्तरीय फेकून द्यावे इतक्या सहजतेने फेकून दिले आणि कुठलेही तडजोड न मानणा-या एका ध्येयधुंद, संन्यस्त जीवनाचा सर्वस्वाने स्वीकार केला. एका किळसवाण्या कुष्टरोग्यला पाहून आपण घाबरलो, याची ती जळजळीत प्रतिक्रिया होती. हे नाटक चरित्रामक नाही; पण चरित्रावरून स्फुरलेले आहे बाबांच्या कर्तृत्वचा समुद्र तीन अंकात आणि तीन तासांच्या प्रयोगात बंदिस्त करणे प्राय: अशक्यच. ती लेखीकाची प्रतिज्ञाच नाही ; कधी नसतेही. वास्तवातील घटना आणि माणसे लेखकाच्या मनात उतरतात, राहतात, रुजतात आणि त्याच्या प्रतिभेने दिलेली नवीन रूपे, नवीन अस्तिव घेऊन प्रगट होतात. भाई म्हणजे पूर्णत: बाबा नव्हेत. फुलांचे जे अत्तराशी जे नाते असते, ते बाबांचे भाईशी आहे. मूलभूत नीती प्रस्थापित करू पहाणारयां प्रस्थापित नीतीचा विरोध नेहमीच सहन करावा लागतो. प्रस्थापित नीतीच्या (म्हणजे अनीतीच्या) पहारेकरयांशी झुंज देतच जगातल्या सर्व बाबांना आणि भाईना आपला मार्ग काढावा लागतो. वसन्तरावांचा 'भाई ' म्हणजे एक साशात वादळ आहे राघूशेटसारख्या जबरदस्ताला शरण आणणारे आणि शिवरामदादासारख्या सत्तांधांना अगतिक करणारे हे वादळ मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास निर्माण करील, असंख्य प्रेक्षकांना आणि वाचकांना झपाटून टाकील आणि मानवी जीवनाचा सुभग अर्थ त्यांचाकडे पोचता करील असा मला विश्वास वाटतो."
-
Himalayachi Savali (हिमालयाची सावली)
या नव्या नाटकात तुम्ही एका चांगल्या विषयाला हात घातला हे फार बरे झाले. वाईट आणि चांगले यांच्या संघर्षा पेक्षा चांगले आणि अधिक चांगले यांचा संघर्ष अधिक नाजूक असतो. तो रंगविणे ही कठीण असते. पण मराठी कथा, नाटक, कादंबरी यांनी आता या वाटा चोखाळल्या पाहिजेत. असे नाटक आपोआपच उत्कट स्वभावनिष्ठ होते. त्यामुळे नाट्याचा कृतीमपणा कमी होतो. ड्रिंकवॉटर, शेरवूड वैगेरेंच्या लिंकनवरल्या नाटकाचा हा अनुभव मी घेतला आहे. या नाटकात अनुषागाने सुचलेला एक विचार मी तुमच्या पुढे मांडतो, चरित्रात्मक नाट्य किव्हा कादंबरी लिहिणे हे एक प्रकारची कसरत अहे. मूळचि माणसे घेतली कि काल्पिताला, रचना कौशल्याला आणि संस्कार सामर्थ्याला मर्यादा पडतात. तुम्ही नावे, माणसांची नाती, व्यवसाय इत्यादी गोष्टी बदलल्या आहेत तरी तेवढ्याने फार मोठा बदल घडून येत नाही. मुळच्या माणसांच्या संबंधितांच्या हळव्या भवनांना अकारण जपावे लागते. अशा वेळी ज्या चरित्रा पासून आपल्याला आशयसंपन्न विषय मिळत असेल त्याचा आत्मा तेवढा कायम ठेवून बाकीचे सारे मूळ चरित्रापासून दूर नेणे अधिक हितकारक होणार नाही काय? या प्रश्नाचे उत्तर काहीही असो. वृद्ध नायक व नायिका यांच्याभोवति गुंफलेली कथानके आपल्याकडे फार थोडी असतात त्या दृष्टीने तुमचे नाटक एक नवीन पायंडा घालीत आहे. रामचंद्राची सीता आणि तुकारामाची जिजाई यांचे मिश्रण असलेली नायिका सुदैवाने तुम्हाला लाभलेली आहे. तिचे चित्रण तुम्ही फार कैशाल्याने केले आहे . वि. स. खांडेकर
-
Udhvastha Dharmashala (उध्वस्त धर्मशाळा)
माराठी रंगभूमीवर 'उध्वस्त धर्मशाळा' हे सर्व थौंव आगळेवेगळे असे नाटक! गो. पु देशपांडे यांनी या नाटकातून एक करारी, तत्वनिष्ठ मर्किस्ट नेत्याच्या (पराभूत थोरवीची गाथा) या नाटकातून रंगवलेली आहे. राजकारण मध्ये जी तत्व प्रणाली स्वीकारलेली आहे. ती कितीही कालबाह्य व अपयशी ठरो, तिलाच निर्धाराने चिटकून राहण्याची वृत्ती व त्यातून शेवटी निर्माण होणारी अटळ शोकांतिका स्वीकारण्याची जिद्द कुलकर्णी घराण्यात तीन पिढ्यापासुन चालत आलेली आहे. प्रत्येक पिढीची तिची स्वतःची विचारसरणी आहे, ह्या विचारसरणीला सवंग लोकप्रीयातेसाठी तत्वशुन्य तडजोड ठावूकच नाही. राजकीय तत्वाप्रनालीची एकच धार तिन्ही पिढ्यात हस्तांतरित होईल असेहि नाही.बाप से बेटा सवाई या न्यायाने बापापेक्षा बेट्याचे तत्वज्ञान वेगळेच आढळते. स्वीकारलेल्या तत्वाशी प्रामाणिकता एवढी कणखर, कि नाटकामध्ये पित्याचा प्रचारसभा पुत्र उधळून लावीत असल्याचे उल्लेख आढळतात. राजकीय ध्यायाच्या प्राप्तीसाठी झालेल्या व प्रथापितांच्या कळपात जाऊ पाहणाऱ्या आपल्या पत्नी कडून अथवा प्रेयासिकडून अव्हेरले जाण्याची तयारीहि कुलकर्णी कुटुंबातील दोघांनी दाखवली आहे. समान राजकीय विचारसरणी च्या धाग्यांनी दोन जीव एकत्र येतात आणि त्या ध्येयाच्या मार्गात तडजोडीची अपरिहार्य वेळ आली, की हे दोन पुरुष आपल्या साथिदारणीचा कायमचा निरोप घेतात. बापाची शोकांतिका तीच मुलाची! रंगभूमीवरिल अने लोकप्रिय नाटकांच्या प्रकृती धर्माशी ह्या नाटकाचे नाते जुळणारे असूनदेखील हे नाटक विशेष यशस्वी झाले नाही; त्याचे कारण ह्या नाटकातील निकाल वैचारिकता. रंगभूमीवरिल ह्या नाटकाचे व्यावसायिक अपयश गृहीत धरूनही महाराष्ट्रच्या वैचारिक जगात खळबळ माजाविलेली आहे. निखळ वैचारिक नाटके मराठीत तशी दुर्मिळच!
-
Shridnyaneshwaranchya Haripathache Amrutmantra (श्
डॉ. सौ. अनुराधा सधीर कुलकर्णी यांनी हरिपाठातल्या प्रत्येक अभंगाचा प्रथम सरलार्थ दिला आहे. आणि त्यानंतर विस्तृतपणे अभंगातल्या प्रत्येक चरणाचे अप्रतिम विवरण केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक अभंग वाचत असताना आपल्या त्वरित लक्षात येते की, पावसाच्या धारा जशा मातीमध्ये झिरपतात तसे आपले अभंग आपल्या मनात झिरपत आहेत. अर्थविवरणामुळे एक होते की, माउलींच्या अंत:करणातले भाव आपल्याला काहीसे कळतात. डॉ.सौ.कुलकर्णी यांचे अवघे ज्ञानमय आणि भक्तिमय आयुष्य ज्ञानदेवमय झालेले आहे. यांच्या संशोधनाचा अभ्यासाचा आणि ध्यासाचा विषय एकच, तो म्हणजे ज्ञानदेव. एक अप्रतिम असा भाष्यग्रंथ वाचल्याचे समाधान 'श्रीज्ञानेश्वरांच्या हरिपाठाचे अमृतमंत्र' ने मला निसंशयपणे दिला. एक वाचनीय, मननीय आणि चिंतनीय ग्रंथ म्हणून हा ग्रंथ मला अत्यंत महत्वाचा वाटतो. संत वाङ्यमयात या ग्रंथामुळे मोलाची भर पडली आहे.
-
Zen (झेन)
तणावात, चिंतेत किंवा अस्वस्थ असल्यावर, मार्ग सुचत नसेल, निर्णय घेता येत नसेल, मनात गोंधळ असेल तर झेन कथा एखादी लहानशीच पण लख्ख मर्मदृष्टी देऊ शकतात. असा मार्ग दाखवू शकतात, जो अंत:प्रेरणेने चिंता व तणावमुक्त करू शकतो. या कथा 'हाऊ टू…' सारख्या माहितीपर मार्गदर्शन करणारया नाहीत, तर आतूनच उजळत नेणारया, समृद्ध करणारया ज्ञानासारख्या आहेत. या कथा आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या कोलाहलात, जीवघेण्या, रणरणत्या प्रवासात विसाव्याला येणारया झाडाच्या दाट सावलीसारख्या आहेत. बसावं, शांत व्हावं, उर्जा प्राप्त करावी आणि पुढची वाटचाल जोमाने सुरु करावी. व्यक्तिमहत्व विकासासाठी एक वेगळा अर्थपूर्ण आयाम देण्याची क्षमता या कथांमध्ये आहे. मनुष्य जीवन आनंदी जगण्यासाठी आहे, ऊर फुटेस्तोवर धावण्यासाठी नाही. जगण्यातला आनंद नक्की कशात आहे, तो शोधण्याची सम्यक दृष्टी या कथांत आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदमय कसा करता येईल, ते या कथा सांगतात. 'आतला आवाज ऐकण्याची प्रेरणा देण्यारया या कथांमध्ये शेकडो पिढ्यांचा सजग, सम्यक ज्ञानाचा संचय झालेला आहे. जो हरक्षणी पथदर्शक म्हणून उपलब्ध आहे. अंधारलेला रस्ता उजळण्यासाठी हाती घेतलेल्या दीव्यासारख्या या कथा आहेत. बुद्धाच्या उपदेशाचे सार या कथांमध्ये आहे, ते म्हणजे अत्त दिप भव
-
Bhopalmadhil Kalratra (भोपाळमधील काळरात्र )
२ डिसेंबर १९८४ भोपाळच्या युनियन कार्बाइड कारखान्यात स्फोट. विषारी वायू भोपालभर पसरला. हजारो लोक मृत्युमुखी पडले. शेकडो लोक अपंग झाले. या कोलाहलात शेतमजूर ते पश्च्यात्य इंजिनियर सगळेच भरडले गेले. हे सारे कसे घडले ? का घडले? डेमिनिक लापिये आणि जविएर मोरो या दोघांनी कासून शोध घेतला. सरकारी अहवाल काय म्हणतात ? वर्तमानपात्रे काय सागंतात? पिडीत माणसे काय सांगतात? या सर्वांचा आधार घेऊन उधवस्त समाजजिवन, सामाजिक रेटे ही माणसाच्या आशेने चिवट कोंभ यांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी !