-
Ahitagni Rajwade - Aatmvrutt (अहिताग्नि राजवाडे -आत्मवृत्त )
ॐ शांती, शांती, शांती. माझि वाणि माझ्या मनी स्थित राहो। मन ठाव घेषो वाणीमाजी || १ ॥ प्रकट ब्रह्माचे प्रकट स्वरूप। देउनी समीप बेसो माझ्या ॥ २ ॥ मन बाणी दोन्ही घेउनी सांगाती। वेदांसी आणीती मजकडे ॥ ३ ॥ मी न जाता माझ्या कानांनी ऐकले. त्यांनी दिवसांत त्यांच्या मनाचा सराव केला. ४ ॥ ऋत मी बोलेन सत्य आचरीन। ते माझे रक्षण करो सदा ॥५॥ सदा करो माझे बक्त्याचे रक्षण। वक्त्याचे रक्षण करो सदा ॥ ६ ॥ वेद आपल्याला दोनदा सांगतात. त्रिवार शांतीसी बोला चाचे ॥ ७॥ ओम शांती शांती शांती. मी, शंकर रामचंद्र राजवाडे, आहिताग्मि, पुणे, जे येथे माझे आत्मचरित्र देण्याचे योजिले आहे त्यात मुख्यतः माझ्या गेल्या ३२ वर्षातील म्हणजे इ. स. १९१८ पासून १९५० (शके १८४० ते शके १८७२) पर्यतच्या काळातील महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र यांच्या मराठी भाषाक्षेत्रातील कार्याचा व्याप केवढा मोठा आहे ते दर्शविण्याचा संकल्प केला आहे व तदनुषंगाने बाकीचे माझे केवळ त्याच्या पुष्टी करणार्थ जीवनवृत्त येणार आहे. हे माझे कार्य विशेषेकरून धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि चाख्ययीन स्वरूपाचे आहे. या काळात भी उभ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर बहुतेक मोठमोठ्या शहरी, जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या ठिकाणी ष ठळक ठळक गाबी एकेकदा व क्वचित्त दोनदोनदा बा अधिक हिंडून आलेलो आहे. तथापि मी माझे कार्य केव्हाही स्वतः आपण होऊन स्थानिक वा बाहेरच्या पत्रांत जाहीर करण्यास दिले नाही.
-
The Modern Gurukul (द मॉर्डन गुरुकुल)
पारंपरिक संयुक्त कुटुंबाची जागा शहरी विभक्त कुटुंब घेत असल्यामुळे, एकाच आधाराखाली वाढणाऱ्या मुलांचे काय होते? 'द मॉडर्न गुरुकुल'मध्ये सोनाली बेंद्रे बेहल यांनी पालकत्वाची तीन तत्त्वे सांगितली आहेत, जी तुम्हाला परंपरा आणि आधुनिकता यांच्यात संतुलन साधण्यास मदत करतील आणि डिजिटल युगात आपल्या मुलाचे संगोपन कसे करावे हे दाखवतील. वैयक्तिक, अनुभवांवर आधारित आणि प्रामाणिक असलेले हे पुस्तक, एक निरोगी, जिज्ञासू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दयाळू मूल वाढवण्यासाठी आपल्या मुळांकडे परत जाण्याची गरज अधोरेखित करते.
-
Ashru Ani Shatkar (अश्रू आणि षटकार)
२०२१ - २०२४ हा काळ भारतीय क्रिकेटसाठी एका झंझावाता समान होता. ज्याची सुरवात २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून झाली. एकाच दौऱ्यात आपली कामगिरी राखरांगोळी होण्यापासून ते त्याच राखेतून फिनिक्स् पक्षाप्रमाणे भरारी घेण्याप्रमाणे झाली. वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप, इंग्लंडला धूळ चारणे आणि २०२३ वर्ल्ड कपची स्वप्नवत वाटावी अशी वाटचाल. परंतू शेवटच्या क्षणी हाता तोंडातला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. तरीही खचून न जाता रोहित शर्माच्या भारतीय संघाने २०२४ मध्ये, २०२३ च्या अश्रूवर षटकार ठोकून फुंकर मारली. भारतीय क्रिकेट मधील या चढ उताराचे संझगिरी शैलीतले खुमासदार लेख या पुस्तकातून एकत्रित समोर येत आहेत. हे पुस्तक क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी निश्चितच वाचनीय आहे.