-
J.R.D Tata Yanche Patra (जेआर.डी टाटा यांचे पत्र)
सध्याच्या वेगवान जगात ई-मेल्स ,सेलफोन, अशांसारख्या तत्पर संपर्कमाध्यमामुळे जग जवळ आणले आहे :पण एकेकाळी मुख्यत्वे पत्र या माध्यमातून संपर्क साधला जात असे पत्रांतून कामांच्या तपशीलाखेरीज आपुलकी व जवळीकही साधली जात असे . शिवाय हि पत्रे पत्रं त्या एका विशिष्ट कालखंडाचा दस्तएवज बनून इतिहास अभ्यासकांना व भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरत असत .पत्र हा कायमस्वरूपी माहितीस्त्रोत असतो . या पुस्तकातील सुमारे ३०० पत्र इतिहासाचा अनमोल ठेवा आहेत . जे .आर. डी. टाटा या विलक्षण व्यक्तिमत्वाच्या चिकित्सक लेखणीतून उतरलेली हि विविध विषांयान स्पर्श करणारी पत्र तत्कालीन सामाजिक , राजकीय, आर्थिक, औघोगिक अशा अनेक क्षेत्रंच दर्शन घडवतात आणि विसाव्या शतकातील एक महान, बहुआयामी व्याक्तीत्वंच अनेकपदरी अंतरंग उलगडून दाखवतात .
-
Vadal Matha Te 1965 Bharat-Pak Yuddha (वादळ माथा त
२० नोव्हेंबर, १९६२ ला यशवंतराव चव्हाण भारताचे 'सरंक्षण मंत्रिपद' भुषविण्यासाठीच दिल्लीला गेले. 'हिमालयाच्या संरक्षणसाठी सह्याद्री' या शब्दात मराठी जानतेने त्यांना निरोप दिला. पण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रिला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात पंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आपले विशिष्ट स्थान प्रस्थापित केले. चीन विरुद्ध १९६२ मधील युधातिल पराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधेर्य उच्वान्यसाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचालित बंदुका, दारूगोळा व सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्परतेने पार पाडले त्यामुळे १९६५ च्या भारत-पाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये सापडतील. या सर्व घटनांचा व युद्धानंतरच्या राजकीय घडामोडी उहापोह राम प्रधान यांनी या पुस्तकात केला आहे.
-
Pavitram (पवित्रम्)
"सोडून देतो मांझ काम.पण जसे जन्म होत राहतात,तसेच मृतयुही.मग त्या कलेवरांचं काय करायचं? कोण दशक्रिया करणार,अग्नि देणार?कारण ही कलेवरं जर अग्निरहित राहिली तर रोगराई पसरेल. प्रेत खालच्या जातीतलं की वरच्या ह्यांन काय फरक पडणार? सडताना जात दिसत नाही."सगळे स्तब्ध झाले. दत्तू पुजारी शांतपणे उठला... कालिंदी म्हणाली,"तुम्ही योग्य तेच केलंत.आत्तपर्यंत प्रत्येक शुभकार्यात मला टाळण्यत आलं.हीन वागणूक देण्यात आली.आता नदी पलीकडच्यांनीही मला टाळावं? शेवंताकडे बारसं होतं.मला नाही बोलावलं.ही एवदीशी होती शेवंता.जेव्हा हीला.वैद्य त्या वस्तीत यायला तायर नव्हते की तिला इथे आणलेलं त्यांना चालत नव्हतं.त्यांनाही आता पवित्र-अपवित्र जाणवू लागलं?" दाराआडून एकणारा गोविंदा मात्र दुखावला.जो त्रास वर्गातील मुलं आपल्याला देतात,तसाच त्रास ही मोठी माणसं आईबाबांनाही देतात? मग तयांचजवळ तक्रार ती काय करायची?
-
Parmeshwar: Ek Sanketik Nav (परमेश्वर:एक सांकेतीक
बरेच जन असे मानतात की , विज्ञानाने मानुस व परमेश्वर यांच्यामद्धे मारून त्या दोघातील अंतर वध्ह्वत नेले आहे. कुठे आहे तो परमेश्वर? तो मृत्यु पवल आहे का? धर्म आणि श्रद्धा या केवळ अफुसारख्या आहेत. चारशे वर्षा पूर्वी विज्ञानाची प्रगती होऊ लागली. तोपर्यंत दैवी शक्तिचा प्रभाव जगावर सर्वत्र होता. पण नंतर हळूहळू माणसाचा देवावार्चा विश्वास ढळू लागला. देवीची जागा विज्ञानाने घेतली. परंतु खुद्द विज्ञान हा एक भ्रामक देव ठरला. परिणामी मानवजात निराश झाली. मणि भौमिक या शास्त्राज्ञाने 'एक्सायमर लेसर ' चा शोध लावला. डोळ्याचा चश्मा घालवण्याची शस्त्रक्रिया परमेश्वराचे अस्तित्व विज्ञानाच्या आधारे शोधायचा प्रयत्न केला. त्याची ही एक थरारक कहानी !
-
Tantradnyanachi Mulakshare Bhag-2 (तंत्रज्ञानाची म
माणसाचे निसर्गाशी जन्मतः च अतूट नाते आहे. निसर्गाच्या विविध रुपांचे अनुभव घेत माणूस उत्क्रांत होत गेला. आपल्या तल्लख बुद्धीचा उत्तम उपयोग करत त्याने या अनुभवाचा विशेष अभ्यास केला. चुकतमाकत अनेक छोटे-मोठे प्रयोग केले. हे प्रयोग म्हणजेच विज्ञान-तंत्राज्ञानाची पाउलवात होती. या पाउलवाटेवरून माणसाने दमदार पावले टाकली आणि स्वत:साठी शेकडो-हजारो साधने कशी निर्माण केली, याबाबतची तपशीलवार व सुबोध शैलीत लिहिलेली माहित म्हणजे 'तंत्रज्ञानाची मुलाक्षारे'.
-
Dairy Of Anne Frank (डायरी ऑफ ऑन फ्रँक)
ऍन फ्रँक ही एक तेरा वर्षाची ज्यू बालिका. दुसर्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या ज्यू द्वेषामुळे घाबरून तिच्या कुटुंबातली चार व आणखी चार माणसे मिळून ऍम्स्टरडॅम येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जवळजवळ दीड दोन वर्षे लपून रहातात. या अवधीत त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तरीही आज ना उद्या आपली सुटका होईल या आशेवर ती जगत राहतात. ऍनला तिच्या तेराव्या वाढदिवशी तिचे वडील एक रोजनिशी बक्षीस देतात. त्या दिवसापासून ती रोजनिशी लिहायला सुरवात करते, ती त्या सर्व मंडळींना पकडून छळगृहात नेईपर्यंत. तिथे अतिशय हालअपेष्टा सोसताना त्या आठांपैकी सात जणंना मृत्यू गाठतो. फक्त ऍनचे वडील ऑटो फ्रँक जगून वाचून सुटून परत येतात. त्यांना ऍनची रोजनिशी सापडते. तिचे संकलन करून ती ते छापतात. त्यात व्यक्तींची नावे काल्पनिक होती. परंतु युद्धसमाप्तीला अर्धशतक लोटल्यानंतर परत संपूर्ण रोजनिशी काही काटछाट न करता छापलेली आहे. 1995 साली हे लोक ज्या ठिकाणी अज्ञातवासात राहिले होते ती इमारत आता विकत घेऊन तिथे ऍन फ्रँकचे स्मारक केले आहे. ऍन वापरत असलेल्या काही वस्तू, तिचे हस्ताक्षर तिथे ठेवलेले आहे. तिच्या रोजनिशीची आजपर्यंत जगातल्या जवळजवळ सत्तर (70) भाषेत भाषांतरे झाली आहेत. ती सर्व, त्या ऍम्स्टरडॅममधल्या तिच्या स्मारकाच्या ठिकाणी व्यवस्थित ठेवली आहेत.
-
Aamar Meyebela (आमार मेयेबेला)
तसलिमा नासरिन या बंगाली लेखिकेचे नाव गेली काही वर्षे जगभर गाजत आहे. सलमान रश्दीप्रमाणे तसलिमा नासरिनवरही देश सोडून जाण्याची वेळ आली. आपल्या 'लज्जा' या कादंबरीत बंगालमधील हिंदू शेजार्यांवर झालेल्या अत्याचाराचे वर्णन केल्यामुळे तिला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. आपली मते अभ्यासपूर्ण रीतीने, ठामपणे, निर्भीडतेने मांडणे हे तसलिमांच्या विचारसरणीचे बलस्थान आहे. तसलिमा अशा कशा घडल्या याचे उत्तर आपल्याला त्यांचे 'आमार मेयेबेला’ वाचून मिळते. आमार मेयेबेला म्हणजे 'माझा मुलगीपणाचा काळ’. वयाच्या तेरा-चौदा वर्षापर्यतच्या आठवणी या पुस्तकात आहेत. तिचे कुटुंब या लेखनातून वाचकांपुढे उभे राहते. त्यात कोठेही उदात्तीकरण केलेले नाही. व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शनच घडवलेले आहे. तसलिमाचे वडील रजब अली डॉक्टर आहेत. देखणे, बुद्धिवादी, अहंकारी आहेत. स्वत:च्या पुरुषपणाचा त्यांना अभिमान आहे. तर आई कुरूप, कमी शिकलेली आहे. आपला नवरा कधीही आपल्याला तलाक देईल या भीतीने कायम धास्तावलेली आहे. या विजोड जोडप्याला चार मुले आहेत. तसलिमा स्वत:चे पूर्वायुष्य, त्यातील व्यक्ती, त्यांचे वागणे, बोलणे, स्वभावविशेष याबद्दल औचित्य-अनौचित्याचे दडपण न ठेवता लिहिते. तसलिमांच्या व्यक्तिमत्त्वात आणि तिच्या पारिवारिक ताण्याबाण्याचा प्रभाव मोठाच पडलेला आहे. तसलिमांचे संवेदनशील मन पानोपानी प्रकट होते. तीच या लेखनाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रसंगातून तसलिमाचं बंडखोर व्यक्तित्व वाचकाला जागवत राहते.
-
Chicken Soup For The Soul-Indian Women
चिकन सूप फॉर द सोल : इंडियन विमेन' हे पुस्तक स्त्रिजतिला भेडसावनारे सार्वत्रिक प्रश्न आणि संदर्भ मात्र अस्सल भारतीय आहेत. या पुस्तकातील संवादी स्वर कन्या, बहिनी, माता, विद्यार्थिनी आणि कर्तुत्ववान स्त्रियां यांच आहे. ज्याना भोवतालच्या कोलाहलात कधी प्रयत्नाने तर कधी योगायोगान आपल्या जीवनसत्याचा साक्षात्कार झाला, अंधारात आशेचा किरण दिसला, प्रतिकूल परिस्थितीत धेर्य आणि प्रेम गवसल. वेगवेगळ्या भूमिका निभावणारे आणि आपापल्या संसारात व कामाच्या ठिकाणी एकाच जन्मात अनेक आयुष्ये जगणारे विविध स्त्रियांच्या पाककौशल्यातुन तयार झालेले हे ' चिकन सूप' तुम्हाला नक्कीच उल्हासित आणि प्रेरित करेल!
-
Akash Badaltana (आकाश बदलताना)
लंडन: तिशीच्या आसपासची ती मंडळी त्यांच्यातल्या एकाचा वाढदिवस साजरा करायला जमाली होती. वरवर बघायला हयात विशेष काही नहव्तं सगळं छान नार्मल वाटत होतं. पण ह्या चित्राचे अंतरंग मात्र वेगालेच होते. अखंड साधनेच्या जोरावर क्लेअरचे प्रथितयश नर्तिका म्हणून नाव कमविण्याचे चांगले आकाराला आलेले स्वप्न रस्त्यावरील एका अपघातामुळे अचानक धुळीला मिळाले होते. त्यातून सावरण्यासाठी तिला अँथनीची साथ मिलाली खरी; पण लग्नाला काही वर्ष होऊं गेली, तरी त्यांना मूल होत नव्हतं. मात्रुत्वाची आस असलेल्या क्लेअरला, ह्या समस्येवारिल खर्चिक उपाययोजनांना सामोरे जात असतानाच, आपल्या नोरा नावाच्या छोट्या विद्यार्थिनिचा ज़रा जास्तच लळा लागला होता. ही मानसिक उलघाल कमी होती म्हणून की के अँथनीच्या नोकरीवर गदा येउ घातली होती. ह्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे शहरात प्रचंड तणाव होता. दिवसेंदिवस बकाल होत चाललेल्या ह्या शहरात तग धरून राहणे आनाखिनाच कठीन होउ लागले होते. आपल्या अतिरेकी जखमांवर फुंकर घालणारे एक अशांत शहर, आर्थिक, सामजिक व् मानसिक तणावांनी ग्रासलेली एक विवाहिता ह्यांचे दहशदवादाच्या पार्श्वभुमिवारिल मनोवेदक चित्रण.
-
Dongri Te Dubai (डोंगरी ते दुबई)
मुंबईत ६० वर्षे गुंडांच्या टोळ्या चालवणा-या माफियांचा प्रभाव होता. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू सालेम होते. पण या सर्वांवर कडी केली ती दाऊदने. या सर्वांच्या तपशीलवार माहिती काढून अभ्यासपूर्वक त्यांच्यावर लिहिलेले पहिले पुस्तक आहे. एका साध्या शाळकरी पोरापासून टोळीच्या दादापर्यंत दाऊदची उत्क्रांती कशी होत गेली, दाऊदने पोलीसांचा उपयोग करून आपल्या प्रतिस्पर्धाना कसे निपटले आणि शेवटी तो मुंबई पोलिसांचा एकमेव सुडकरी कसा बनला याचे वर्णन यात आहे. हे पुस्तक म्हणजे मुंबईतील गुन्हेगारीचा एक इतिहास आहे. पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा दाऊद याने पठाणाच्या टोळीला कसे निपटले, पहिली सुपारी कशी दिली गेली व शेवटी दुबईतून दाऊद कसा पळून गेला, याचे थरारक वर्णन पुस्तकात आले आहे.