-
Valmiki Ramayanatil Paach Striya (वाल्मिकी रामायणा
राजा दशरथाच्या शांता या कन्येने असीम त्याग केला नसता, तर त्याला त्याचे हवेहवेसे वाटणारे पुत्र प्राप्त झाले असते का? कोण होती मंथरा ? राणीची धूर्त आणि दुष्ट दासी, की राजप्रासादातल्या षड्यंत्रापासून आपल्या पाल्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न करणारी प्रेमळ माता? मीनाक्षीच्या सुंदर डोळ्यांचं रूपांतरण कुरूपता आणि अनैतिक लालसेत कसं झालं? एका सदाचारी राजकुमाराभोवती फिरणाऱ्या महाकाव्यात स्त्रियांची भूमिका कोणती? आनंद नीलकंठन हे अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत. या पुस्तकात त्यांनी वाल्मिकींच्या कालातीत महाकाव्याचे अनेक पदर उलगडत महत्त्वाकांक्षा, प्रेम, समर्पण आणि धैर्य यांच्या कथा समोर आणल्या आहेत. रामायणातल्या स्त्रियांकडे नव्याने पाहण्याची दृष्टी ते त्यांच्या वाचकांना देऊ पाहतात. प्रेयसी, बहीण, पत्नी, माता अशा विविध रूपांत वावरणाऱ्या वाल्मिकींच्या रामायणातल्या या स्त्रिया गुंतागुंतीच्या ह्या महाकाव्याला एकत्र गुंफतात.
-
Ichapatra Kalachi Garaj (इच्छापत्र काळाची गरज)
इच्छापत्र हा थोडा भावनिक विषय आहे. या विषयाबद्दल अनेक समज- गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. मुळातच माहितीचा अभाव आणि जागरुकता नसल्यामुळे इच्छापत्र करण्याबाबत उदासीनता दिसून येते. सर्वसामान्य माणसाला या विषयावर सोप्या भाषेत कायदेशीर माहिती देणारे हे पुस्तक त्यासाठीच उपयुक्त आहे. आपल्या मृत्युपश्चात वारसांमध्ये वाद-विवाद टाळण्यासाठी आणि आपली मिळकत लाभार्थीपर्यंत पोहोचावी यासाठी आवर्जून वाचावे असे हे माहितीपर व मार्गदर्शनपर पुस्तक अत्यंत मोलाचे आहे.
-
Mazi Aatmakatha (माझी आत्मकथा)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि कायदा या विषयांमधील उच्च कोटीचे विद्वान होते. आर्थिक अडचणींवर मात करून दुहेरी पीएच.डी. प्राप्त करणारे आंबेडकर हे अत्यंत प्रतिभावंत विद्यार्थी होते. अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक, वकील अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी मूलभूत काम करताना वृत्तपत्रांची निर्मिती केली. कायमच दलितांच्याराजकीय हक्कांचा पुरस्कार केला. भारतीय स्वातंत्र्य मिळवताना इंग्रजांना फटकावण्यासही त्यांनी कमी केले नाही. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. त्यांच्या अनेक लेखांतून स्वतःबद्दलचे निवडक लेख वाचकांना निश्चितच प्रेरणादायी ठरतील. “सैन्यातील नोकरीमुळे आम्हाला आपले जीवनमान सुधारण्याची संधी लाभली होती. त्यामुळे बुद्धिमता चातुर्य आणि तडफ यांबाबतीत आम्ही इतरांपेक्षा वीतभरही कमी नाही, हे सिद्ध करू शकलो. आमच्या गुणांमुळेच सैन्यातील अधिकायांच्या जागी आमच्या नेमणुका झाल्या त्याकाळी सैन्य छावणीतील शाळांमध्ये हेडमास्तरांच्या जागी अस्पृश्य नेमले जात असत. सैन्य छावणी कॅम्पसमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे असल्याने त्याचा योग्य तो परिणाम जीवनावर झाला आहे. सैन्याचे दरवाजे महार जातीसाठी बंद करून ब्रिटिशांनी आमच्याशी विश्वासघात केला असून, ते कृतघ्नतेचे लक्षण आहे.’ अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक सडेतोड विधाने वाचताना वाचक अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत.
-
Angan Vishvache Avakash Manacha (अंगण विश्वाचे अवक
विज्ञानाने जनुकशास्त्रात केलेली प्रगती पाहून मनात येते, काही वर्षांतच असाध्य रोग नष्ट होऊन मनुष्य अमरत्व प्राप्त करेल; तर कधी भीती वाटते की, सत्तेच्या, पैशाच्या जोरावर जनुकीय प्रगतीचा वापर करून जगभर दहशतवादीच निर्माण होतील; पण माणसाची जनुके ठरतात तरी कशी? धर्माप्रमाणे? कलावंतांची जनुके वैज्ञानिकांच्या जनुकांपेक्षा वेगळी असतात का? महाभारतातल्या द्रोणाचार्यांचा जन्म आणि टेस्ट ट्यूब बेबी सारखे आधुनिक शोध पाहताना दंतकथा सत्य मानाव्यात का? अशा प्रश्नांच्या घोळात कादंबरीची नायिका नेमकी कशी अडकते आणि त्या प्रश्नकोशातून बाहेर पडते की नाही ?
-
Jallianwala Bagh 13 April 1919 (जालियनवाला बाग १३
मराठी साहित्यात पहिल्यांदाच उलगडणार... जालियनवाला बाग : इतिहासात अजरामर झालेल्या 'घटनेचा' लेखाजोगा 13 एप्रिल 1919, अमृतसरमध्ये जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या सामान्य लोकांवर ब्रिटिश लष्करी अधिकारी ब्रिगेडियर जनरल डायरच्या शिपायांनी केलेला निर्दयी गोळीबार हा इतिहासातील एक अजरामर प्रसंग ! या शोकांतिकेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात प्राण फुंकले. भारतातील ब्रिटिश राजवटीच्या अखेरीची ही सुरूवात ठरली. भगतसिंग, उधमसिंग या क्रांतिकारकांना जन्म देणार्या, समाजाच्या तळापर्यंत स्वातंत्र्याची उर्मी चेतवणार्या या ऐतिहासिक घटनेचा संपूर्ण लेखाजोखा मराठी साहित्यात प्रथमच या पुस्तकात ओघवत्या शैलीत मांडला आहे.
-
The Diary of a Young Girl(द डायरी ऑफ अ यंग गर्ल)
द डायरी ऑफ यंग गर्ल -‘माझ्यासारख्या एखादीच्या दृष्टीनं रोजनिशी लिहिणं हा खरोखरच एक अतिशय विलक्षण अनुभव आहे. मी याआधी काहीच लिहिलेलं नाही फक्त म्हणूनच नव्हे, तर पुढे मला किंवा इतर कोणालाही तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीच्या स्वप्नाळू चिंतनात स्वारस्य वाटणार नाही, म्हणून मला तसं वाटतं.’ अॅन फ्रँक, शनिवार, २० जून १९४२ ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’ हा एका लहान मुलींच्या दृष्टिकोनातून दुसऱ्या महायुद्धावर टाकण्यात आलेला अपूर्व, हेलावून टाकणारा दृष्टिक्षेप आहे. अॅननं ज्या वेळी हे शब्द लिहिले होते, त्या वेळी अर्थातच आपण स्वप्नाळूपणे केलेलं हे चिंतन नाझींनी ज्यूंच्या केलेल्या सामुदायिक कत्तलींच्या दरम्यानच्या आयुष्याविषयीची माहिती देणारं प्राथमिक संसाधन ठरेल, हे तिला माहीत नव्हतं. अन ही असामान्य, हुशार, विचारी कथाकार आहे आणि तिची रोजनिशी ही मनोरंजक आणि त्याबरोबरच ऐतिहासिक दस्तऐवज म्हणूनही लक्षणीय आहे. या रोजनिशीतील घटना दहशतीची फक्त ओझरती झलक दाखवत असल्या, तरी त्यांच्यातून युद्धाच्या काळातील मानवी स्वभावाचं, नातेसंबंधांचं आणि आशेचं ठसठशीत चित्रण समोर येतं. ‘या पुस्तकात अनेक महत्त्वाचे संदेश आहेत, पण सर्व लोकांना स्वातंत्र्यात मुक्तपणे जगण्याचा हक्क आहे, हा त्यातला सगळ्यांत महत्त्वाचा संदेश आहे. फक्त काही लोक वेगळ्या धर्माचे किंवा वंशाचे आहेत म्हणून त्यांना वेगळी वागणूक देता कामा नये, असं अॅनची ही कथा दाखवून देते: – द गार्डियन – ‘दुसऱ्या महायुद्धाविषयी कोणीही कुठेही सांगत असलेल्या कथांपैकी सर्वांत जास्त हेलावून टाकणाऱ्या कथांमध्ये या रोजनिशीचा समावेश होतो:
-
Jyotish Shabdagrantha(ज्योतिष शब्दग्रंथ)
ज्योतिषशास्त्र या विषयावर अनेक प्रकारचे भरपूर लिखाण उपलब्ध आहे; परंतु आश्चर्य म्हणजे या शास्त्राचा परिपूर्ण व शास्त्रशुद्ध असा शब्दकोश मात्र निघालेला नव्हता. या शास्त्राची परिभाषा, त्यातील शब्दांचे शास्त्रीय अर्थ हे लोकांपुढे आणण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नव्हता. म्हणूनच ज्योतिषशास्त्राचा एखादा समृद्ध असा शब्दकोश असावा, या विचाराने शोभा प्रभु यांनी सुमारे साडेचार हजार शब्दांच्या समाविष्टांसह या ज्योतिष शब्दग्रंथाची निर्मिती केली आहे. या शब्दग्रंथाची पहिली आवृत्ती २६. फेब्रुवारी २००२ रोजी प्रकाशित झाली. ग्रंथाची उपयुक्तता जाणून ही दुसरी आवृत्ती आता २०२२मध्ये प्रकाशित करीत आहोत. ज्योतिषशास्त्रातील हा एकमेव शब्दग्रंथ वाचकांना नक्की आवडेल आणि उपयुक्त ठरेल, याची खात्री वाटते.
-
Eka Yogyachi Atmakatha (एका योग्याची आत्मकथा)
परमहंस योगानंद भारताचे प्रथम योग गुरु होते ज्यांचे उद्देश्य पश्चिमेस राहून योग शिक्षण देणे हे होते . १९२० च्या दशकात जेव्हा त्यांनी संपूर्ण अमेरिकेचा दौरा केला, ज्यास ते "आधात्मिक आंदोलन " म्हणत , उत्साही श्रोत्यांनी अमेरीकेची मोठ्यात मोठी सभागृहे भरली.त्यांचा प्रारंभिक प्रभाव शक्तिशाली होता; पण त्यांचा स्थायी प्रभाव आणखीनच शक्तिशाली आहे . सर्वप्रथम १९४६ मध्ये छापलेल्या या पुस्तकाने जगात एका आध्यात्मिक क्रांतीचा प्रारंभ करून त्यास सतत प्रेरित केले आहे . परमहंस योगानंदांच्या स्तराचे संत आपल्या जीवनातील अनुभवांचा प्रत्यक्ष खुलासा कचितच लिहितात . अनेक धार्मिक परंपरांच्या अनुयायांनी ऑटोबायोग्राफी ऑफ ए योगी ला आध्यात्मिक साहित्यातील एक उत्कृष्ट रचना असे मानले आहे. तरीही त्याच्या संपूर्ण गहनतेत , ते सौम्य हास्य , चैतन्यपूर्ण गोष्टी व व्यावहारिक सामान्य ज्ञानाने परिपूर्ण आहे १९४६ च्या मूल आवृतीचे हे प्रथम मराठी मुद्रण आहे जरी नंतरचे पुनर्मुद्रण , १९५२ मधील लेखकाच्या देहावसनानंतरचे सुधारित बदल दर्शवतात , त्यांच्या लाखोंहून अधिक प्रती विकल्या गेल्या , आणि १९ हुन अधिक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले , सुरुवातीच्या काही हजार मूळ प्रती संग्रहकर्त्यांच्या हातात गायब झाल्या .या पुनर्मुद्रणामुळे १९४६ ची प्रत आपल्या सर्वशक्तीनिशी पुन्हा एकदा उपलब्ध झाली आहे .ज्या रुपात महान योग गुरूंनी त्याला प्रथम प्रस्तुत केले होते . "योगानंदांच्या जीवनात प्रकाशित मूळ , आवृत्तीमध्ये वाचक स्वत: योगानंदांच्या संपर्कात जास्त रहातो . जरी योगानंदांनी केंद्र आणि संस्था स्थापन केल्या तरी एका चर्चपेक्षा दुसऱ्या चर्चला महत्त्व देण्यापेक्षा व्यक्तीचा दिव्यत्वाशी संपर्क करून देण्यामध्ये त्यांना जास्त काळजी होती. या महान आध्यात्मिक व योगिक ग्रंथांच्या मूळ आवृत्तीमध्ये या भावनेला जास्त सहजपणे जाणता येते .
-
Vidnyanvrutti(विज्ञानवृत्ती)
विज्ञानाचे कार्य कसे होते, वैज्ञानिक कशा प्रकारे कार्य करतात, विज्ञानवृत्तीमुळे समाजाच्या आर्थिक, सामाजिक व तांत्रिक विकासात कसा बदल घडून येतो, अशा प्रकारची वैज्ञानिक वृत्ती जोपासणे कसे आवश्यक आहे या सर्वांचे महत्त्व विशद करणारे पुस्तक म्हणजे ‘विज्ञानवृत्ती’ होय. शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक आवड, कुतूहल निर्माण व्हावे व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण आहे. विज्ञानवृत्तीशिवाय समाजाचा विकास आणि मूलभूत परिवर्तन शक्य नाही. परिश्रम, जिद्द, प्रायोगिक वृत्ती, कल्पकता या गुणांचा विकास होण्यासाठी विज्ञानवृत्ती अतिशय आवश्यक असते. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असणे आवश्यक आहे.
-
Bahirji Naik (बहिर्जी नाईक)
"योग्य माहिती योग्य वेळी योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविणे, हा शिवरायांनी माझ्या गुप्तहेर पथकासाठी घालून दिलेला दंडक मी हयातभर कधीच मोडला नाही आणि आज हयात नसताना देखील तो मी मोडणार नाही. माझ्या राजांचा आदेश मानूनच मी बोलणार आहे; सर्व काही सांगणार आहे. स्वतःचे चरित्र स्वमुखाने सांगावे, असा मी कोणी महानायक किंवा युगपुरुष नाही. इतिहास कथन करू शकेल असा इतिहासकार तर मुळीच नाही; परंतु इतिहासाचे आणि जवळपास सर्वच दोस्त-दुश्मनांचे भेद जाणणारा आणि इतिहासाच्या पानांना माहीत नसलेला गूढ इतिहास डोळ्यांनी अनुभवलेला गुप्तहेर नक्कीच आहे. इतिहासाने या बहिर्जीची नोंद ठेवली नाही, ठेवू शकणारही नाही. कारण इतिहास कधीच गुप्तहेराचा साक्षीदार नसतो; परंतु हा गुप्तहेर बहिर्जी नाईक शिवकालीन इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार आहे."
-
Vithaichi Kanhaai(विठाईची कान्हाई)
सौ. आरती काळे यांची 'विठाईची कान्हाई' ही संत कान्होपात्रा यांच्या जीवनावरची कादंबरी आहे. संत कान्होपात्रा ही वारकरी संतांमधील सोनचाफ्याचे फूल आहे. ती शामा गणिकेची मुलगी असून अत्यंत सौंदर्यवती, नृत्यनिपुण व मधुर आवाज असणारी होती. तिच्या सौंदर्याची, नृत्याची, आवाजाची ख्याती दूरवर पसरली होती; पण ती मात्र विठ्ठलभक्तीत तल्लीन होती. पांडुरंगाशी तिची एकनिष्ठता, भक्ती इतकी श्रेष्ठ होती की, बिदरचा राजा तिच्या सौंदर्याने मोहित होऊन तिला पकडून आणण्यासाठी सरदार पाठवतो; पण ती शेवटचे दर्शन घ्यायला विठ्ठल मंदिरात जाते व आपला देह विठ्ठलचरणी समर्पित करते. मृत्यूलासुद्धा आपल्या इच्छेने, भक्तीने अधीन करून घेणारी कान्होपात्रा एक श्रेष्ठ भक्त आहे. ,P>सौ. आरती काळे यांच्या 'विठाईची कान्हाई' या कादंबरीत कान्होपात्रेच्या आयुष्यातील उत्कट भक्तीचा, विरक्तीचा प्रत्यय येतो. त्याचबरोबर तिच्या आयुष्यातील संघर्ष, गणिकेचे जीवन, तत्कालीन समाज व संस्कृती यांचे दर्शन घडते. कान्होपात्रा गणिका व सुंदर असल्याने तिच्या वाट्याला येणारे दुख, एक स्त्री म्हणून तिच्या वेदना, यातना आपल्याला जाणवतात; पण तिची भक्ती, एकनिष्ठता पाहून मन विस्मित होते, तिचा हा उत्कट प्रवास लेखिकेने आपल्या ओघवत्या शैलीत, अर्थपूर्ण संवादात व रसाळ भाषेत फार भावपूर्णरीत्या रेखाटला आहे. प्रा. डॉ. श्रुती श्री वगबाळकर
-
Jivachi Jan(जीवाची जाण)
आपले रोजचे जीवन सर्वतोपरी सुखाचे असावे असे प्रत्येकालाच वाटत असते; परंतु खरे सुख कोणते हे आपणास समजलेले नसते. आपल्या मन, बुद्धी, चित्ताच्या गुंतावळ्यात आपण भरकटत असतो. त्यासाठी जीवाने जाणिवेच्या स्तरावर यायला हवे. त्यासाठी करायच्या विचारांचे मंथन म्हणजे हे पुस्तक. जीवाच्या या जाणिवेतून अध्यात्माचा श्रीगणेशा सुरू होतो. अशा सर्व मुमुक्षूंना उपयुक्त ठरेल असे हे पुस्तक आहे हे निश्चित.
-
Marg Yashacha, Marg Sukhacha(मार्ग यशाचा, मार्ग सु
आपल्या सहवासात असलेले आपले मित्र, नातेवाईक किंवा शेजारी असे अनेक जण आपण पाहत असतो की, त्यांनी अनेक प्रकारे व प्रचंड प्रमाणात आर्थिक, सामाजिक यश मिळवले आहे; तरीही ते समाधानी असतातच असे नाही. माणसाची सर्वोच्च प्राथमिकता समाधान हीच असायला पाहिजे. आर्थिक, सामाजिक किंवा अन्य यश मिळवतानाच समाधान मिळवणे शक्य असते. त्यासाठी जगभरचे मानसशास्त्रज्ञ, व्यक्तिमत्त्वविकासतज्ज्ञ प्रचंड प्रयत्न करत आहेत. त्यावर शेकडो पुस्तके प्रकाशित झाली आहेत, शेकडो प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. अर्थात, यांतले बहुसंख्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि पुस्तके इंग्रजीत आहेत आणि ती पाश्चात्त्य मानसिकतेचा विचार करून लिहिलेली आहेत. मराठीत याची पोकळी जाणवत होती. ‘मार्ग यशाचा, मार्ग सुखाचा’ हे पुस्तक ही उणीव भरून काढते. जर तुम्ही तुमच्या स्वभावातल्या छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या, तर संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलते आणि यशासोबत समाधानही लाभते, हे सांगणारं अतिशय उपयुक्त, साध्या सरळ सोप्या भाषेतलं, मराठी वाचकांना थेट भिडणारं हे लिखाण. कोणताही बदल सहजी स्वीकारण्याची माणसाची तयारी नसते. ज्यांना कुणाला जाणवतंय की, मला आता बदलणं आवश्यक आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे, मार्गदर्शक आहे आणि लगेच परिणाम दाखवणारं आहे.
-
Shunyatoon Suryakade(शून्यातून सूर्याकडे)
'शून्यातून 'सूर्या'कडे' ही मृत्यूशी झुंज देणाऱ्या फिनिक्सच्या उड्डाणाची वास्तव कहाणी आहे. जीवघेण्या, भीषण अपघाताच्या संकटानं खचून न जाता, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रखर आशाबाद, कमालीची जिद्द व दुर्लभ सहनसिद्धी या भक्कम खांबांवर उभी असलेली ही यशोगाथा आहे. ही कहाणी म्हणजे, भावनांची उत्कट अभिव्यक्ती आहे. ही कहाणी केवळ वेदना, संकटं, दुःखं सांगणारी नाही; तर संकटांवर स्वार होऊन यशाच्या शिखराकडे झेपावणाऱ्या जिद्दीची कहाणी आहे. संकट म्हणजे भगवंताचं रूप. या रूपाच्या दर्शनानं जगण्याचं नवं, डोळस भान येतं. संकटरूपी आकाश कोसळलं, तर तेच पायाखाली घेऊन ताठ मानेनं जगायचं. प्रतिकूलतेचं प्रखर वास्तव मान्य करून अनुकूलतेचं स्वप्न रंगवायचं, ध्येयाकडे झेप घ्यायची व सत्यासाठी अपार कष्ट, अविरत प्रयत्न, गो बियाँड फेल्युअर या त्रिसूत्रीचा अवलंब करायचा. आपल्या प्रत्येकाचं जीवन म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. भूतकाळाची चक्रं आपण उलटी फिरवू शकत नाही; पण भविष्यकाळाला वळण लावणं आपल्या हातात असतं. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' म्हणजे वास्तव शांतपणे मान्य करून स्वत:ला स्वतःची झालेली खरी ओळख!
-
Jani Janardan- Vinchudanshavaril Lasiche Pravartak
देवमाणूस म्हणून प्रसिद्ध असलेले विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक,माजी आमदार कै. डॉ. श्रीधर दत्तात्रय उपाख्य तात्यासाहेब नातू यांचा जीवनपट या चरित्रलेखनातून त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसह सामोरा येत आहे. त्या काळी विंचवाच्या दंशामुळे होणारे आजार व मृत्यू यांवर योग्य उपचार होण्यासाठी तात्यासाहेबांनी प्रचंड परिश्रम घेतले. विविध भूमिकांमध्ये समाजासाठी काम करीत राहिलेल्या तात्यासाहेबांचे काम आता दंतकथा वाटावे, इतक्या विलक्षण घटनांनी भरलेले आहे. त्या साऱ्यांचे संकलन या चरित्राच्या निमित्ताने करण्यात या पुस्तकाचे लेखक श्री. धीरज वाटेकर यांना यश आले आहे. संदर्भांची रेलचेल असलेला हा अवडंबरहीन व रसाळ दस्तावेज आहे. सर्वार्थाने सार्थक असलेले ध्येयवेड्या, निष्ठावेड्या लोकसेवकाचे जीवन कसे असते, याचा वस्तुपाठ या चरित्राच्या निमित्ताने असंख्य वाचकांच्या समोर जात आहे, याबद्दल मी अतिशय समाधानी आहे. तात्यासाहेबांसारखी लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वे व्यक्ती, कुटुंबे आणि समाजाच्या कल्याणासाठी स्वत:च्या अद्वितीय गुणांचा निःस्वार्थ वापर करतात. अशा व्यक्तिमत्त्वांमध्ये केवळ इच्छा असून चालत नाही. त्यांच्यात सहानुभूती, करुणा, लवचीकता, समर्पण, संवाद-विश्लेषण व समस्या सोडवण्याची कौशल्ये असे सगळे असावे लागते. ते सारे तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात होते, याचा प्रत्ययकारी अनुभव जनी जनार्दन वाचताना येतो. – श्री. नितीन गडकरी (केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय)
-
Mahamaya Nilavanti (महामाया निळावंती)
४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. ह्या निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. जो वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो. अलीकडच्या काळात, १९९२ साली घडलेली एक अजब घटना. एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो. त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलाचा बर्फात अन मिठात ठेवलेला मृतदेह. ह्या जतन केलेल्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी बाप जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंतीचा खून केला नव्हता का? तिचा खून कोणी केला होता? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत, 'महामाया निळावंती'त. अठरा पौराणिक पोथ्या, अनेक ऐतिहासिक दस्तऐवज, तांत्रिक आख्यायिका व निळावंतीच्या दंतकथांचा अभ्यास करून लेखक सुमेध ह्यांनी निर्माण केलेली ही अद्भुत, जादुई, थरारक व मेंदूसोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी. ' महामाया निळावंती '
-
Videshi Guptaher Katha (विदेशी गुप्तहेर कथा)
पंकज कालुवाला यांचे नाव विदेशी गुप्तहेर व त्यांच्या कारवाया त्यांनी त्यांच्या देशासाठी केलेली कामे या सगळ्यांचे सविस्तर दस्तावेजीकरण म्हणता येईल अशी त्यांनी पुस्तके लिहिली आहेत आणि या पुस्तकांशी त्यांचे नाव जोडले गेले आहे. त्यांच्या या पाचही पुस्तकांतील कारवाया व त्यांची वर्णने ही पुराव्यानिशी यांनी केली आहेत या पुस्तकांच्या शेवटी मोठी संदर्भ सूची दिली आहे. आणि आता असे काही गुप्तहेर त्यांना आढळले की त्यांनी केलेल्या कारवायांचे पुरावे किंवा संदर्भ त्यांना मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीने काही गुप्तहेर कथा लिहिल्या आणि त्याच परममित्र पब्लिकेशन्स काल प्रकाशित केल्या ते पुस्तक म्हणजे पंकज कालुवाला लिखित विदेशी गुप्तहेर कथा. नावाप्रमाणेच वेगळ्यावेगळ्या विदेशी गुप्तहेर यांच्या या पुस्तकामध्ये दहा कथा आहेत त्यामध्ये वाचक गुंतून जातो.
-
Khisekapuchya Mishya Ani Anya Rahasyamayi Katha -
पंकज कालुवाला यांची दोन पुस्तके नव्याने आली आहे रहस्यमय कथा भाग एक आणि भाग दोन. पुस्तकाच्या प्रस्तावना मध्ये मनोगतामध्ये त्यांनी म्हटलंय की रहस्य कथा लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे वाचकाला वाचत ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. खरोखरच आपण मी जेव्हा हे पुस्तक जेव्हा वाचतो त्यावेळेला आपल्या हे लक्षात येतं. रहस्य कथा मध्ये त्या कथेतील रहस्य कथेच्या शेवटी कुठेतरी उलगडतं . उदाहरणार्थ डुकरांचे खून या कथेमध्ये आपल्याला इतकं गुंतायला होतं की डुकरांचे खून कसं काय आणि आपण वाचत वाचत कथेच्या शेवटी येतो त्या वेळेला या सगळ्या रहस्याचा उलगडा होतो. आम्ही आणि अशाच प्रकारच्या कथा या पहिल्या भागात व दुसऱ्या विभागात आहेत पंकज कालुवाला यांची लेखन शैली लेखक वाचकांना फिरवून ठेवते याचा अनुभव आला . पंकज कालवाल्यांचे जे चाहते आहेत त्यांनाही निश्चितच येईल असं निश्चित वाटतं.