-
Ek Hoti Aaji (एक होती आजी)
कोकणाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिचित्रे साकार करण्यात ख्यातकीर्त असलेले महान कादंबरीकार श्री. ना. पेंडसे यांची ही कादंबरी. आजीचे लग्न तिच्या पंधराव्या वर्षी, तिच्याहून पस्तीस वर्षांनी वयाने मोठया असलेल्या बिजरावाशी होते. तेव्हापासून तिला, नातवंडे, पणतवंडे होईतोपर्यंतच नव्हे तर ती अखेरचा श्वास घेईतोपर्यंतचा आजीचा अवघा जीवनपट या कादंबरीत उलगडून दाखविलेला आहे. ती प्रेमळ, परोपकारी, निःस्वार्थी, निःपक्षपाती होती, हे तर खरेच. या तिच्या स्नेहार्द स्वभावामुळे ती सर्वांच्या सदैव स्मरणात कशी राहिली याचे अनेक चित्ताकर्षक घरेलू प्रसंग लेखकाने नवरा, दीर, भाऊ, भावजय, दिराची मुले, सुना, जावई आदी नातेसंबंधांभोवती मोठ्या तन्मयतेने गुफलेले आहेत. तरीसुद्धा मनात प्रश्न येतोच आजी कशी होती-? लग्नापूर्वी ओढवलेल्या `त्या’ प्रसंगामुळे आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तर्हने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `ते’ अमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध प्रत्येक वाचकाला घ्यावासा वाटेल-
-
Mothe Lok Chote Hote Tevha
`नोबेल पुरस्कारप्राप्त बंगाली कवी-लेखक रवींद्रनाथ टागोर, चित्रकार पिकासो, शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन, आल्बर्ट आइन्स्टाइन, चार्ल्स डार्विन, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, स्वामी विवेकानंद, युरी गागारीन, मार्क ट्वेन, पं. जवाहरलाल नेहरू, नेपोलिअन, कार्ल मार्क्स, स्वा. सावरकर, मार्टिन ल्यूथर किंग, म. धोंडो केशव कर्वे, नेताजी सुभाषचंद्र बोस, लिओ टॉलस्टॉय, राजा राममोहन रॉय, जॉर्ज बर्नार्ड शॉ, हेलन केलर, साने गुरुजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार्ली चॅप्लिन, रामकृष्ण परमहंस... या जगद्विख्यात व्यक्तींच्या थोरत्वाच्या चाहूलखुणा बालपणीच्याच पाऊलवाटेवर उमटू लागल्या. सर्व शक्तिनिशी ते धडपडले, अनेक आघात सहन केले, संघर्ष झेलला, गरिबी सोसली, अथक जिद्दीने, ध्यासाने, ध्येयपूर्तीसाठी त्यांनी जिवाचे रान केले आणि ज्ञानाचा समुद्र पिऊन टाकण्यासाठी ते आतुर झाले. आदर्श नाहीसे होत चाललेल्या आजच्या काळात छोट्यांना ही व्यक्तिचित्रे मानसिक ताकद देतील.
-
Ekala Bolo Re (एकला बोलो रे)
रंगमंचावरून प्रेक्षकांशी थेट किस्सेवजा संवाद साधताना आपल्या प्रयोगाची गती, चलती फजिती आणि टवाळीही मनमोकळेपणी मांडणारे पुस्तक.
-
Sobat.... (सोबत)
कवितेचे लेणे हृदयामध्ये घेऊन जन्मलेला लेखक नकळत गद्यातही कविता लिहू लागतो. मधु मंगेश कर्णिक हे असे एक काव्यात्म गद्य लिहिणारे लेखक आहेत. अनेक वर्षापूर्वी, `सत्यकथे’मध्ये `चेहरा असलेली झाडे’ या शीर्षकाने त्यांचे काही अगदी वेगळे लेखन प्रसिद्ध झाले; आणि त्याने साहित्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. आजूबाजूच्या, नेहमी दिसणार्या झाडापेडांवर कर्णिकांनी मोठ्या काव्यात्मतेने लिहिले होते. कर्णिकांनी ज्या नजरेने वृक्षवल्लरींना, प्राणिजगताला, निसर्गाला न्याहाळले, त्या नजरेत अजाण बालकाचे कुतूहल, जाणत्याची जिज्ञासा, कलाकाराची संवेदना, रसिकाची तन्मयता आणि कवीची सहृदयता होती. आज जवळ जवळ चार दशकांनंतरही `सोबत’मधील लेखन त्या वेळेएवढेच ताजे, टवटवीत आढळते, हा मधु मंगेश कर्णिकांच्या अमोघ लेखणीचा महिमा होय.
-
Kalndar (कलंदर)
'ह्त्या' कादंबरीचा 'कलंदर' हां पुधील भाग;- पण किती तरी वेगळा. 'ह्त्या' तील आत्मकथानाची शैलीच केवळ इथे बदलली आहे, असे नाही, तर पेंडसे यांच्या कालेने आपल्या विकासाचा पुढील टप्पा गाठला आहे. निसर्ग येथे कथेच्या भावगुणाशी एकजीव आणि म्हणून अधिक समृध्हा झाला आहे.; व्यक्तिचित्रणाचे सामर्थ्य तसेच रसरशीत आहे. पण ते अधिक विविध रुपे धारण करते आहे; कथानाकाची गुंफण अधिक सूक्ष्म आणि म्हणून अधिक वेधक झाली आहे. 'एल्गार','हृदयपार' गारंबीचा बापू' ,'ह्त्या' या आपल्या पूर्वीच्या कादंबर्यात पेंडसे यांनी रंगविलेले जीवनाचे चित्र अधिकाधिक सुक्ष्म व् संमिश्र होत गेले आहे. 'कलंदर'मध्ये तर पाचात्य संगीतातील अनेक वाद्यांच्या स्वरामेलाची आठवां व्हावी, इतके ते संमिश्र, चढ़ते आणि अनेक बिंदुभोवती रुंजी घालुनाही एक केंद्राकडे झेप घेणारे व् अनेक पाताल्यान्वर विकास पावुन्देखील एकात्म व् सुसंवादी आहे.
-
Samrat Nepolian (सम्राट नेपोलियन)
"कॉर्सिका या छोट्या बेटावर जन्मलेल्या नेपोलियनचा केवळ आठव्या वर्षी वडिलांचं बोट धरून फ्रान्समध्ये प्रवेश. प्रथम ब्रीनी आणि नंतर इकोल मिलिटिएरमध्ये लष्करी शिक्षण. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बुर्बान राजा सोळावा लुई आणि मेरी आन्तवान यांना सुळी चढवल्यानंतर नव्या राज्यघटनेनुसार आणि स्वकर्तृत्वावर भराभर चढत जाऊन सम्राटपद पटकावलं… आणि ते वंशपरंपरागत टिकवण्यासाठी जोसेफाईनला घटस्फोट देऊन ऑस्ट्रियन राजकन्येशी विवाहबद्ध-पुत्रप्राप्ती. संपूर्ण युरोप एकछत्राखाली आणून शासन आणि कायद्याने एकजूट करायची या एका अत्यंत व्यापक आणि विधायक कल्पनेने प्रेरित. एक धडाडीचा योद्धा, कुशल प्रशासक आणि बलाढ्य सम्राट या नात्याने देदीप्यमान कामगिरी. केवळ 22 वर्षांत 60 लहानमोठे संग्राम. वॉटर्लूच्या युद्धात सपशेल हार. आयुष्याच्या उत्तरार्धात सेंट हेलेना इथं हद्दपारीची शिक्षा भोगत असताना तिथेच अकाली मृत्यू. उण्यापुर्या 52 वर्षांच्या आयुष्यात संपूर्ण युरोपाला धारेवर धरणार्या या सम्राटाचा अंत संशयास्पद व्हावा हा केवळ दैवदुर्विलासच म्हणावा लागेल."
-
Pariman (परिमाण)
विविध नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेल्या सानिया यांच्या कथांचा `परिमाण’ हा नवा कथासंग्रह. मध्यम किंवा उच्चमध्यमवर्गीयांचे जीवन, त्यातले भोगोपभोग, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या कौटुंबिक किंवा वैवाहिक जीवनातले ताण आणि तणाव यांची सूक्ष्मचित्रणे सानिया यांच्या या कथांमधून येतात. प्रौढ स्त्री-पुरुषांमधले अनुबंध हा विषय त्यांच्या कथांमधून येतो. मात्र व्यक्ती, परिसर व त्यांचे व्यवसाय भिन्न भिन्न राखल्याने कथा रोचक व सुरस होतात. खूप काही चांगले, अर्थवाही, पृथगात्म वाचल्याचा प्रत्यय या कथा देतात. रूढार्थाने कथानक नसलेल्या या कथा एक प्रकारच्या आंतरिक उसळीतून, उमाळ्यातून आलेल्या असतात. कथा आकर्षक होण्यासाठी घ्यायचे विषय, लेखनात चलाखी किंवा दिखाऊ कारागिरी या कथांमध्ये दिसत नाही. व्यक्तींमधील मानसिक, भावनिक संबंधांना त्यांच्या कथांमध्ये महत्त्व असते. समकालीन तरुण पिढीचं चित्रण त्यांच्या या कथांमधून आढळतं.
-
Hatya (हत्या)
श्री.ना. पेंडसे यांच्या कादंमबरीविश्वात 'ह्त्या' ही कादंमबरी विशेषत्वाने उठून दिसते; ती तिच्यातील वेगळेपणाने. वास्तावाच्य्या पातळीवरील, तर्कसंगत आणि ह्रदय अशी ही कथा पेंडसे यांनी आपल्या कादाम्बरिसाठी निवडली आणि पेंडसे यांची कादंबरी खर्या अर्थाने जीवनाशी पहिल्यांदा अधिक समरस झाली;परिस्थितीने आबाळलेला, शारीरिक व्यंगामुळे अव्हेरलेला आणि गरिबीने, पिचलेला असा हा कुठल्याही अर्थाने तत्कालीन 'नायक' न शोभणारा, पौगंडावस्थेतील मुलगा या कादंबरीचा नायक झाला ही तत्कालीन वाडःमयाभिरुचिच्या चौकटीत न बसणारी गोष्टी होती. आपल्या वेदनेची आणि परिस्थितीने दिलेल्या चटक्यांची खालच्या सुरात दू:खार्त अशी मान्दानी करणारी आणि काळजाला हात घालणारी ही कादंबरी आहे. पेंडसेविश्वातील पुढील कादंबर्यांच्या विकासाची बिजी या कादंबरीत सुप्त्पने विखुरलेली दिसतात. 'ह्त्या' च्या निमित्ताने पेंडसे यांनी मराठी कादंबरीतील 'हीरो' ची प्रतिमा पार बदलवून टाकण्याचे जे धाडस केले, त्यासाठी तरी या कादंबरीचे मोल आपण मान्य करायला हवे.
-
Charles Dickens (चार्ल्स डिकन्स)
' पिकविक पेपर्स ', ' ऑलिव्हर ट्विस्ट', ' डेव्हिड कॉपरफील्ड', ' ए टेल ऑफ टू सिटीज' या कादंब-यानी पाश्चत्य साहित्यविश्वात अजरामर झालेल्या चार्ल्स डिकन्सने कादंबरीकार म्हणून मानाचे स्थान मिळवले. साहित्याच्या क्षेत्रात त्याने सातत्याने केलेले विविध प्रयोग व त्याचा विविधांगी कार्यातुन प्रकटनारे सामाजिक बहन यांमुळे त्याला न भूतो न भविष्यात अशी प्रसिद्धी मिळाली. १८१२ साली इंगलैंडमध्ये जन्माला आलेल्या डिकन्सने तत्कालीन सामाजिक परिस्थितच्या पार्श्वभूमीवर आपले महत्वपूर्ण लेखन केले. घरच्या आत्यंतिक गरीबीमुळे लहानपानीच हलाकिसलकी कामे करण्याची वेळ त्याच्यावर आली. त्या परिस्तिथिवर कष्टपूर्वक मात करत त्याने आपले कर्तुत्व सिद्ध केले. पत्रिकारितेपासून सुरवात करत कादंबरी, कथा, कविता, नाटक, अशा बहुविध साहित्यप्रकारांत त्याने आपला कायमचा ठसा उमटवला. त्यावेळच्या इंगलैंडमधील बालकामगारांचे शोषण, गुन्हेगारी, दारिद्र्य, निरक्षरता , राज्यकत्यांची अनास्था यांकडे त्याने आपल्या लिखानापासुन सार्र्या जगाचे लक्ष वेधले. डिकन्सच्या या जीवन यात्रेची, त्याचा साहित्यसेवेची, त्याचा प्रेमजीवनाची, समग्र कहानी प्रदीप कुलकर्णी ह्यानी अतिशय प्रासादिक शैलीत शब्दबद्ध केली आहे.
-
Ramabai Mahadevrao Ranade-Vyaktitva Aani Kartutav
एकोणिसावे शतक हा महाराष्ट्राचा प्रबोधनाचा कालखंड . थोर विचारवंत आणि समाजसुधारकांचा परिसस्पर्श लाभलेला महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा गौरवशाली कालपट . याच काळात स्त्रियांच्या दुःस्थिती - निवारणाचे महत्त्वपूर्ण कार्य ज्या काही मोजक्या स्त्रियांकडूनही घडले , त्यांपैकी रमाबाई रानडे हे एक ठळक नाव . खरेतर सावित्रीबाई फुले आणि पंडिता रमाबाई यांच्या बरोबरीने घेण्यायोग्यतेचे नाव . मात्र त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा जेवढा परिचय देशवासियांस व्हावयास हवा होता तेवढा दुर्दैवाने झालेला दिसत नाही . खुद्द महाराष्ट्रालाही त्यांचे विस्मरण झाले आहे की काय अशीच परिस्थिती अपवाद वगळता जाणवू लागली होती . २०१२ हे वर्ष रमाबाईंचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्म - वर्ष . या निमित्ताने त्यांचे असाधारण जीवन आणि अतुलनीय कार्य परिचित करून देण्याचा स्तुत्य उपक्रम मॅजेस्टिक प्रकाशनने हाती घेतला आणि विलास खोले यांच्यासारख्या जाणकार , संशोधक प्रवृत्तीच्या लेखकाने रमाबाईंचे चरित्र सिद्ध करून तो तडीस नेला .
-
Chakra (चक्र)
मध्यमवर्गीय मराठी साहित्याला एका नव्या अनुभवविश्र्वाची जोड सहज, सफाईदार आणि सामर्थ्यशील शैलीने मिळवून देणारी ही कादंबरी. गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्याकडेशी जीवजंतूंप्रमाणे वळवळणार्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुर्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थितीच्या निष्ठूर, अप्रतिहत चक्रात त्यांचा चक्काचूर होतो. जयवंत दळवी यांची ही पहिलीच कादंबरी असली, तरी मराठी वाचकांना ते अपरिचित नाहीत. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रकाशित साहित्यातील खुसखुशीत अनुभवांच्या चुरचुरती चित्रणाने आणि प्रवाही भाषाशैलीने वाचक प्रभावित झाले. परंतु `चक्र’ कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत.
-
Sundaryasadhana (सौंदर्यसाधना)
स्त्रीच्या प्रसन्न व आकर्षक व्यक्तिमत्त्वाची पहिली पायरी म्हणजे तिचे दर्शनी सौंदर्य. निसर्गतः प्रत्येक स्त्रीमध्ये ते कमी-अधिक प्रमाणात असते. त्याचे संवर्धन कसे करावे, चेहरा, केस, शरीरबांधा अशा विविध अंगांची प्रसाधना कशी करावी, याची शास्त्रोक्त माहिती तपशीलवारपणे येथे सांगितली आहे. या पुस्तकात आपल्याकडील परंपरागत घरगुती औषधींची जशी दखल घेतली आहे. तशीच विदेशी पद्धतीच्या ब्यूटी थेरपीच्या डौलदार हालचालींबाबतही पुरेसे विवेचन केले आहे. अनेक खुलासेवार आकृती आणि सहज संवादासारखी भाषा यांमुळे हे पुस्तक म्हणजे प्रत्येक तरुण स्त्रीला व मुलीला आपली जिवलग मैत्रीण वाटेल!
-
Suhana Safar (सुहाना सफर)
नूरजहाँ, लता मंगेशकर, सुरैया, मन्नाडे, गीता दत्ता, अनिल विश्वास, मंगेश देसाई, दिनानाथ मंगेशकर, ते थेट आजच्या जमान्याचं संगीत देताना एक आब राखून असलेला रहमान.... अशा अनेकांवर लिहिलेले हे लेख वाचकांनाही एक सुंदर सफर घडवून आणतील.
-
Picasso (पिकासो)
पिकासोचे कलाजीवन जितके रोमहर्षक तितकेच त्याचे प्रेमजीवनही चित्तथरारक ! फर्नान्द ऑलिव्हिए आणि फ्रान्स्वाज गिय्यो यांच्यासारख्या त्याच्या प्रेयसींनी त्याच्याबरोबर व्यतीत केलेल्या दिवसांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या लिहून ठेवलेल्या आहेत. जाकेलीन रॉकसारख्या सहधर्मचारिणीने पिकासोच्या उतारवयात त्याची नेकीने साथ केली. ज्या दिलदारपणाने आपल्या मुलाबाळांचा सांभाळ केला त्याच नेकीने त्याने शिल्पकला, मुद्राचित्रे आणि मातीकाम या कलांना आपले सर्वस्व वाहिले. विसाव्या शतकाच्या कलेच्या इतिहासात पिकासो एखाद्या उत्तुंग खडकासारखा उभा आहे. नव्वदपेक्षा जास्त वर्षे कार्यक्षम राहिलेल्या या अलौकिक कलावंताच्या जीवनाचे आणि प्रतिभेचे रहस्य शोधून काढण्याचा हा एक सच्चा प्रयत्न आहे.
-
Bonsay (बॉनसाय)
आधुनिक काळात अनीतिमान व्यवहाराला प्रतिष्ठेचे स्वरूप येऊ लागले आहे. स्वाथी मनोवृत्ती वाढू लागली आहे. मोठ्या मानाच्या प्रतिष्ठेचा जागेवर फार छोटी, खुरट्या मनोवृत्तीची, अनीतिने वागणारी माणसे स्थानापत्र होऊ लागली आहेत... शिक्षण-क्षेत्रातही नैतिक मूल्यांची घसरण होत आहे. सत्तास्पर्धा, भ्रष्टाचार शिक्षणक्षेत्रात बोकाळला आहे. शिक्षणक्षेत्रातील अशा भ्रष्ट व्यवहाराचे चित्रण सुभाष भेण्डे यांनी समर्थपणे `बॉनसाय’ या कादंबरीतून केले आहे. -विश्र्वनाथ शिंदे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर कादंबरीतील प्रसंग, प्रसंगांचा तपशील, त्यांत वावरणारी आणि भाग घेणारी पात्रे कादंबरी वाचत असताना माझ्या डोळ्यांसमोर पिंगा घालत होती. त्यातील प्रत्येक पात्र पुणे विद्यापीठातीलच आहे, असा मला भास होत होता. कादंबरीमध्ये विद्यापीठ कारभाराच्या अनेक प्रकरणांचे पुरेपूर प्रतिबिंब पडलेले आहे हे कोणाही जाणकाराच्या सहज ध्यानात येईल. प्रा. एन. सी. (शरद) जोशी कार्यकारिणीचे माजी सदस्य, पुणे विद्यापीठ आशय, विषय आणि मांडणी या सर्वच दृष्टींनी कादंबरी सुदृढ झाली आहे. अशा लेखनातून आत्मिक समाधानाबरोबरच चिंतनाला एक दिशासुद्धा मिळत असते यात शंका नाही. - प्रा. सदानंद देशमुख - जानेफल, जि. बुलढाणा `बॉनसाय’मधील प्रवृत्ती मूलतः मानवी प्रवृत्ती आहे. आजही ही किडलेली प्रवृत्ती समाजातील इतर क्षेत्रांप्रमाणे पवित्र समजल्या जाणार्या विश्र्वविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्रात कशी फोफावली आहे याचे अत्यंत प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीत आले आहे. - प्रा. विद्या प्रभुदेसाई - फोंडा, गोवा
-
Attar Aani Gulabpani (अत्तर आणि गुलाब पाणी)
ललितलेखक रवींद्र पिंगे हे हरहुन्नरी लेखणीचे धनी आहेत. व्यक्तिचित्रं रेखाटणं हा त्यांचा हातखंडा. जयवंत दळवी, प्रभाकर माचवे, हमीद दलवाई, सुमती पायगावकर, सेतु माधवराव पगडी अशा भिन्न पिंडांच्या साहित्यसेवकांची ही जिवंत दर्शनं. आस्वादक दृष्टिकोन, माहितीचे बारीकसारीक कण आणि स्वयंभू बाजाची आकर्षक भाषाशैली हे पिंगे ह्यांचे व्यक्तिरेखाटनाचे विशेष आहेत.